शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

राज्यात १००० बालगृहांची नोंदणी दोन वर्षांपासून रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 04:13 IST

राज्यातील १०४२ बालगृहांची नोंदणी दोन वर्षांपासून रखडली आहे. कायद्याने शक्य नसूनही राज्य सरकारने त्यांना मुदतवाढ दिली आहे.

विश्वास पाटील कोल्हापूर : राज्यातील १०४२ बालगृहांची नोंदणी दोन वर्षांपासून रखडली आहे. कायद्याने शक्य नसूनही राज्य सरकारने त्यांना मुदतवाढ दिली आहे. त्यांच्या नोंदणी प्रमाणपत्रांचे पाच वर्षांत नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. पण मूळ नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यास दोन वर्षे लागत आहेत.बाल न्याय कायद्यानुसार बालकांसाठी विनापरवाना निवासी संस्था चालविणे शिक्षापात्र गुन्हा आहे. तरीही सरकारकडून नोंदणी प्रमाणपत्र देण्यास चालढकल होत आहे. महिला व बालविकास विभाग ही प्रमाणपत्रे देते. त्यासाठी मार्च २०१८ मध्ये अर्ज मागवण्यात आले होते. दोन टप्प्यांत ११७३ संस्थांचे अर्ज आले. सरकारने नियमित कामकाज व नीट कागदपत्रे असलेल्या १३१ संस्थांना मार्च२०१९ मध्ये प्रमाणपत्रे दिली. ज्यांना ही प्रमाणपत्रे दिली नाहीत,त्यापैकी मुले असलेल्या संस्थांना १ मार्च २०१९ रोजी पुढील आदेर्शापर्यंत मुदतवाढ मिळाली. परंतु एक वर्ष उलटूनही नोंदणी प्रमाणपत्र दिलेली नाहीत. बालकांसाठी विनापरवाना निवासी संस्था चालविल्यास एक वर्षापर्यंत कैद आणि एक लाखापेक्षा कमी नाही इतका दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे.अनुदान किती ?या संस्थांतील एका मुलामागे सरकार दरमहा १२३५ रुपये अनुदान देत होते. ते दोन हजार रुपये झाले आहे. या संस्थांमध्ये मुलांची क्षमता १० पासून १०० आहे.कारण असेही...या संस्था बीड, लातूर,नांदेड जिल्ह्यांत जास्त आहेत. बालकांचे कल्याण करण्याची खरेच किती संस्थांची इच्छ आहे, हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे अशा संस्थांची छाननी करून नोंदणी प्रमाणपत्र देताना सरकारपुढे अडचणी येत आहेत.>काय आहे अडचण ?अनेक संस्थांना इमारती नाहीत । आवश्यकता नसताना संस्थांची मागणी । मुलांसाठी प्राथमिक साधन-सुविधांची वानवाआलेल्या प्रस्तावांची छाननी करून ते सरकारकडे सादर केले आहेत. तिथे तपासणी सुरू आहे. तोपर्यंत कार्यरत संस्थांना मुदतवाढ दिली आहे.- रवि पाटील, उपायुक्त, महिला व बालविकास विभाग, पुणे