शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक विकास आराखडा उपसमितीच्या बैठकीत मंजूर

By admin | Updated: March 29, 2017 01:00 IST

शासनाकडे पाठविणार : १५ आॅगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण होईल; चोक्कलिंगम यांची माहिती

कोल्हापूर : कोल्हापूरचा प्रादेशिक विकास आराखडा काही शिफारशी करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्याचा निर्णय सोमवारी (दि. २७) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. पुणे विभागाचे आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ३१ मार्चपर्यंत हा आराखडा शासनाकडे सादर करण्यात येणार असून, १५ आॅगस्ट २०१७ पर्यंत शासनाकडून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुरुवातीला चोक्कलिंगम यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर याबाबत नेमण्यात आलेल्या उपसमितीसोबत बैठक झाली. काही शिफारशी करून हा आराखडा ३१ मार्चपूर्वी शासनाकडून मंजूर होणे क्रमप्राप्त असल्याने तो पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार सुजित मिणचेकर, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, प्रादेशिक योजना नगररचनाचे उपसंचालक एम. आर. खान, इचलकरंजी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अलका स्वामी, पन्हाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रूपाली धडेल, प्रादेशिक वनसंरक्षक अरविंद पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, नगररचना विभागाचे सहसंचालक प्रकाश पाटील, आर्किटेक्चर कॉलेजचे प्राचार्य संदीप दिघे, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने यांची प्रमुख उपस्थिती होती. चोक्कलिंगम म्हणाले, या आराखड्याबाबत ५३९० हरकती आल्या होत्या. याबाबत चर्चा करून शिफारशी करण्यासाठी उपसमिती नेमण्यात आली होती. प्रत्येक तालुक्यासाठी आणि दहा हजार लोकसंख्येपेक्षा जादा लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी बायपास रोड सक्तीचा करण्यात आला आहे. या रस्त्यांसाठीच जाणारी जागा, विहिरी यांबाबत मोठ्या प्रमाणावर हरकती होत्या. मात्र चार-पाच घरे जाणार असतील तर काही बदल होणार नाही. मोठ्या संख्येने नागरिकांचे विस्थापन होणार असेल तरच विचार करावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. शेतजमीन औद्योगिक क्षेत्रामध्ये वर्ग करण्याबाबत मागणी करण्यात आली होती. मात्र तसा शासनाचाच निर्णय असल्याने याबाबत स्वतंत्र सूचना करण्याची गरज नसल्याची चर्चा यावेळी झाली. टोप, संभापूर, कासारवाडी, अंबप व अंबपवाडी परिसरातील सुमारे १८३ हेक्टर जमिनीमध्ये एकात्मिक नगर वसाहत प्रकल्प वसाहतीसाठी जमीन वापर विभागात बदल करून तिचा रहिवास विभागात समाविष्ट करण्यासाठी विनंती करण्यात आली होती. याबाबत प्रादेशिक आराखड्यांतर्गत निर्णय होऊ शकत नाही; त्यामुळे टाऊनशिप पॉलिसीखाली अर्ज करावेत, असे समितीने संबंधितांना सूचित केले. छोट्या गावांसाठी ७५० मीटरच्या आणि मोठ्या गावांसाठी १५०० मीटर परिघातील वसाहती या गावठाणाअंतर्गत येतील, अशी शिफारस या बैठकीत करण्यात आली. नदीकिनाऱ्यांवर ब्लू लाईन आणि रेड लाईन ठरविण्याबाबत पाटबंधारे विभागाला सूचना करण्यात येणार आहेत. नियमांप्रमाणे रस्ते होणारअनेक ठिकाणी रस्त्यांची रुंदी करण्याची मागणी होती. मात्र शासकीय नियमाप्रमाणे ६० मीटरचे राष्ट्रीय महामार्ग आणि ४५ मीटरचे राज्य मार्ग याप्रमाणेच नियोजन होणार आहे. रेल्वेमार्ग कुठून न्यायचा हे रेल्वे ठरविणारसध्या कऱ्हाड-बेळगाव रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरू असून, हा मार्ग शहरापासून १० किलोमीटर अंतरावरून जाणार आहे. हा मार्ग शहराजवळून जावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र याबाबतचा निर्णय केवळ रेल्वे खातेच घेऊ शकते, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. इचलकरंजीतील नवीन रहिवाशी क्षेत्रामध्ये यंत्रमागांसाठी परवानगी द्यावीइचलकरंजी शहरामध्ये रहिवासी क्षेत्रामध्ये अनेक यंत्रमाग आहेत. त्याच पद्धतीने नवीन रहिवासी क्षेत्रामध्येही यंत्रमाग व्यवसाय करण्यासाठीची परवानगी मिळावी, अशी मागणी आमदार सुरेश हाळवणकर यांनी केली होती. मात्र वस्त्रोद्योगापुरताच हा निर्णय राहणार असून, इचलकरंजीतील नवीन वसाहतीत यंत्रमागाला परवानगी मिळावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. आजऱ्यातील ‘ती’ चूक दुरुस्तीचे आदेशआजरा नागरी संकुलामध्ये औद्योगिक वसाहत सुचविण्यात आली होती. सदरचे आरक्षण हे तांत्रिक चुकीमुळे दर्शविण्यात आले असून, याबाबत तत्काळ सुधारणा करून, ज्या ठिकाणी औद्योगिक वसाहत अस्तित्वात आहे, त्याच ठिकाणी दर्शविण्यात यावी व नवीन दर्शविण्यात आलेले ठिकाण तत्काळ वगळावे, असे आदेशही विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी दिले. ट्रक टर्मिनस शासनाच्या जागांवर व्हावेतकोल्हापूर, इचलकरंजी येथे मोठ्या संख्येने ट्रक्स आणि लक्झरी बसची ये-जा असते. त्यामुळे शहरांमधील वाहतुकीवर त्याचा मोठा ताण पडतो. यावर उपाय म्हणून ट्रक, लक्झरी गावाबाहेर थांबविण्यासाठी कोल्हापूर आणि इचलकरंजी येथे टर्मिनस उभे करण्यात येणार आहेत. त्यासाठी आरक्षण टाकण्यात आले आहे. रस्त्यांलगत जर शासनाची किंवा महामंडळाची जमीन उपलब्ध असेल, तर त्या ठिकाणी हे टर्मिनस उभारण्यासाठी प्राधान्य द्यावे. जेणेकरून भूसंपादनासाठीही वेळ जाणार नाही, अशी शिफारस करण्यात आली आहे. या विकास आराखड्यातील अनेक बाबींना आपण विरोध केला आहे. मी याबाबत माझे लेखी म्हणणे दिले आहे. १५ मुद्द्यांच्या आधारे याबाबतचे आक्षेप मी घेतले आहेत. ३१ मार्चपर्यंत हे आराखडे शासनाकडून मंजूर होणे क्रमप्राप्त असल्याने ते पाठविण्याचा निर्णय झाला; परंतु याबाबत वेळ पडल्यास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. - चंद्रदीप नरके, शिवसेना आमदारया विकास आराखड्याबाबत जनजागृती करण्यामध्ये आम्हांला चांगले यश आले. गावागावांमध्ये विकास आराखड्याचे डिजिटल फलक लावले गेले. त्यामुळे जो आराखडा तयार करण्यात आला होता, त्यावर अखेर आज शिक्कामोर्तब झाले आहे. - एम. आर. खान, उपसंचालक, नगररचना