शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘वारणा-आजरा’बाबत आयुक्तांकडे दाद

By admin | Updated: January 6, 2015 00:58 IST

विष्णुपंत केसरकर : भागीदारी कालावधीतील हिशेब अपूर्ण; आजरा कारखान्यावर ‘स्वाभिमानी’तर्फे मोर्चा

आजरा : वारणा-आजरा साखर कारखान्यातील झालेल्या भागीदारी तत्त्वावरील कालावधीतील हिशेब अद्याप वारणा व्यवस्थापकाकडून पूर्ण होत नसल्याने साखर आयुक्तांकडे दाद मागितली असून, याबाबत लवकरच निर्णय होईल, अशी माहिती आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष विष्णुपंत केसरकर यांनी ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांसोबत बोलताना दिली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राजेंद्र गड्यान्नावर यांच्या नेतृत्वाखाली आजरा कारखान्यावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी झालेल्या चर्चेवेळी ते बोलत होते.आजरा येथून साखर कारखाना कार्यस्थळी स्वाभिमानीच्यावतीने मोर्चा नेण्यात आला. यावेळी ‘आजरा’चे संचालक मंडळ व ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांमध्ये बैठक पार पडली.‘स्वाभिमानी’चे आजरा तालुकाप्रमुख तानाजी देसाई म्हणाले, वारणा-आजरा कराराचे हिशेब अद्याप अपूर्ण आहेत. २०१३-१४ मध्ये गळीत झालेल्या उसाचे अंतिम बिल अद्याप मिळालेले नाही. अंतर्गत विस्तारीकरणाला नेमका किती व कशाकरिता खर्च आला, असे प्रश्नही उपस्थित केले.भागातील तोडणी यंत्रणेबाबतचा प्रश्न निवृत्ती कांबळे यांनी उपस्थित केला. यावेळी गुरुदत्त गोवेकर, सखाराम केसरकर, कृष्णा पाटील यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. राजेंद्र गड्यान्नावर यांनी कारखान्याच्या कारभाराबाबत सभासदांत उलटसुलट चर्चा सुरू असल्याने संचालकांनी सभासदांच्या मनातील शंका दूर कराव्यात, असे सांगितले.चर्चेत उपाध्यक्ष मारुती घोरपडे, सुधीर देसाई, अशोक चराटी यांनी भाग घेतला. यावेळी कार्यकारी संचालक पी. एल. हरेर, सचिव व्यंकटेश ज्योती, ‘स्वाभिमानी’चे नंदकुमार सरदेसाई यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्रकल्पग्रस्त, स्वाभिमानी, संचालकांची परिषदअध्यक्ष विष्णुपंत केसरकर म्हणाले, शेतकरी संघटनेमुळे संचालकांना कोणीतरी जाब विचारत आहे, ही समाधानाची बाब आहे. गेल्या १८ वर्षांमध्ये जी यंत्रसामग्री हवामानामुळे बाद झाली होती, ती यंत्रसामग्री बदलण्यात आली आहे. स्क्रॅपची यंत्रे रितसर निविदा मागवून विक्री करण्यात आली आहेत. प्रकल्प मार्गी लागल्याशिवाय तालुक्यातील ऊस उत्पादनात वाढ होणार नसल्याने प्रकल्पग्रस्तांच्या संघटना, स्वाभिमानीचे कार्यकर्ते व कारखाना संचालकांची संयुक्त परिषद घेतली जाईल. कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांकडून तोडणी व वाहतुकीकरिता पैशाची मागणी झाल्यास अशांची कारखान्याकडे लेखी तक्रार केल्यास संबंधित शेतकऱ्यांना ऊस तोडणी ठेकेदरांकडून रक्कम वसूल करून दिली जाईल, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.