शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
2
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
4
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
5
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
6
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
7
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
8
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
9
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
10
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात
11
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
12
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
13
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
14
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
15
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
16
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?
17
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
18
ऑफ-रोड आणि लक्झरीची बादशाह! अभिषेक शर्माला मिळालेल्या चायनीज SUV कारची ८ खास वैशिष्ट्ये
19
Mumbai Metro 3: भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
20
Atlanta Electricals Ltd Listing: ₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल

नोकर भरतीने नव्या संचालकांचा श्रीगणेशा

By admin | Updated: May 22, 2015 00:13 IST

जिल्हा बँक : पहिल्याच बैठकीत होणार ठराव; भरतीचा फेरप्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील नोकर भरतीबाबत फेरप्रस्ताव तयार करण्याचा ठराव पहिल्याच बैठकीत होणार आहे. नोकर भरतीच्या प्रस्तावापासूनच नव्या संचालक मंडळाच्या कारभाराचा श्रीगणेशा होणार आहे. एकूण दोनशे कर्मचाऱ्यांच्या भरतीचा फेरप्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील प्रशासकराज बुधवारी संपुष्टात आले असून, संचालक मंडळाचा कारभार आता सुरू झाला आहे. रिक्त जागांवरील भरती प्रक्रिया राबविण्यासाठी प्रशासकांच्या कालावधित बराच पाठपुरावा झाला होता. प्रशासकांच्याच कालावधित नोकरभरती होईल, अशी शक्यताही वर्तविली जात होती. तसे प्रयत्नही झाले होते. दीड वर्षापूर्वी याबाबतचा प्रस्ताव सहकार विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाली नाही. आता प्रशासकराज संपुष्टात आल्याने नव्या संचालक मंडळामार्फत यासाठी विशेष प्रयत्न होण्याची चिन्हे दिसत आहेत. संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत याबाबतचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची उलाढाल गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तुलनेने कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे सध्याच्या सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. नव्याने काही योजना राबवायच्या असतील, तर अपुऱ्या संख्याबळाचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यामुळे कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी गेल्या दीड वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. नव्या संचालक मंडळामार्फत याबाबतचा पाठपुरावा आता केला जाणार आहे. अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी निवडीनंतर नोकर भरतीविषयी प्रतिक्रिया दिली होती. बॅँकेतील नोकरभरती अत्यंत पारदर्शीपणाने पार पाडली जाईल, असे आश्वासन देतानाच त्यांनी नोकर भरतीला प्राधान्य देण्याचे संकेत दिले होते. त्यांच्या संकेतानुसार आता बॅँकेत कर्मचारी भरतीबाबतच्या फेरप्रस्तावाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. (प्रतिनिधी)असे आहे बळ...जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्ह्यात २१७ शाखा आहेत. एकूण मंजूर असलेल्या पदांची संख्या १४०४ आहे. सध्याची कर्मचारी संख्या १०२८ इतकी आहे. अजून सुमारे पावणेचारशे कर्मचाऱ्यांची गरज बॅँकेला आहे. तरीही सुरुवातीच्या टप्प्यात प्रशासक कालावधित २०० कर्मचाऱ्यांच्या भरतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. आता प्रशासकराज संपुष्टात आल्याने नोकरभरतीसाठी फेरप्रस्ताव पाठविण्याची गरज आहे. त्यामुळे त्यादृष्टीने आता तयारी सुरू झाली आहे.