शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

आंघोळीच्या पाण्याचा पुनर्रवापर

By admin | Updated: May 19, 2016 00:50 IST

महालक्ष्मी नगरातील चौगुले कुटुंबीयांचा उपक्रम : दिवसाकाठी दोनशे लिटर पाण्याची बचत

कोल्हापूर : आंघोळीचे पाणी एकत्रितपणे साठवून ते फरशी पुसण्यासह बाथरुमसाठी पुनर्रवापर करण्याचा उपक्रम महालक्ष्मी नगरमधील चौगुले कुटुंबीय राबवित आहेत. त्यासह जेवल्यानंतर झाडांच्या कुंड्यांमध्ये हात धुणे, आठवड्यातून एकदा जेवणासाठी ताटाऐवजी पत्रावळीचा वापर करणे याद्वारे पाणी बचत करीत आहेत.या उपक्रमाबाबत ‘निसर्ग मित्र’चे कार्यवाह अनिल चौगुले यांनी सांगितले की, माझ्या कुटुुंबामध्ये अकरा सदस्य आहेत. दुष्काळी स्थितीमुळे पाणी बचतीचा केवळ कोरडा संदेश न देता कृतीतून लोकांचे प्रबोधन करावयाचे असे आम्ही ठरविले. त्यात घरात आंघोळ, भांडी धुणे, आदी स्वरूपांतील दैनंदिन वापरातील पाण्याचा पुनर्रवापर करण्याचे निश्चित केले. त्यानुसार प्रत्येकाने १८ लिटर पाणी असणाऱ्या एका बादलीमध्ये आंघोळ करण्याचा आम्ही अलिखित नियम केला. शिवाय आंघोळीचे पाणी एका टबामध्ये साठविले जाते. याद्वारे आम्ही प्रतिमाणसी १५ लिटर पाण्याची बचत करतो. हे पाणी बाथरूमसह घरातील फरशी पुसणे, अंगणात सडा मारणे यासाठी करतो. त्यासह घराच्या परिसरात लावलेल्या कुंड्यांमधील झाडांना पाणी देण्यासाठी आम्ही ‘कुंड दत्तक’ उपक्रम राबविला आहे. त्यात आम्ही प्रत्येकजण जेवल्यानंतर एका कुंडीमध्ये हात धुतो. त्यातून हात धुतल्यानंतरचे पाणी वाया जात नाही. ते झाडांना मिळते. त्यासह आठवड्यातून एकदा ताट धुण्याच्या पाण्याची बचत व्हावी यासाठी जेवणासाठी पळसाच्या पानांच्या पत्रावळीचा वापर करतो. या सर्व उपक्रमांतून आम्ही दिवसाकाठी सुमारे दोनशे लिटर पाण्याची बचत करीत आहोत. (प्रतिनिधी) पाणी बचत महत्त्वाचीपाण्याबाबत स्वयंपूर्ण असलेल्या कोल्हापूरला सध्या पाणीटंचाई भासत आहे. भविष्यात या टंचाईची तीव्रता वाढू नये यासाठी प्रत्येकाने पाण्याची बचत करणे महत्त्वाचे असल्याचे अनिल चौगुले यांनी सांगितले. ते म्हणाले, प्रत्येकाने गरजे इतके आणि कमीत कमी पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे. पाणी बचतीबाबत निसर्ग मित्र संस्थेच्या माध्यमातून प्रबोधन केले जात आहे. त्यात एक लिटरमध्ये दुचाकी धुणे, आंघोळीच्या पाण्याचा पुनर्रवापर करणे, आदींचा समावेश आहे. छोट्या-छोट्या प्रयत्नांतून सहजतेने पाणी बचत करणे शक्य आहे.