शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

आंघोळीच्या पाण्याचा पुनर्रवापर

By admin | Updated: May 19, 2016 00:50 IST

महालक्ष्मी नगरातील चौगुले कुटुंबीयांचा उपक्रम : दिवसाकाठी दोनशे लिटर पाण्याची बचत

कोल्हापूर : आंघोळीचे पाणी एकत्रितपणे साठवून ते फरशी पुसण्यासह बाथरुमसाठी पुनर्रवापर करण्याचा उपक्रम महालक्ष्मी नगरमधील चौगुले कुटुंबीय राबवित आहेत. त्यासह जेवल्यानंतर झाडांच्या कुंड्यांमध्ये हात धुणे, आठवड्यातून एकदा जेवणासाठी ताटाऐवजी पत्रावळीचा वापर करणे याद्वारे पाणी बचत करीत आहेत.या उपक्रमाबाबत ‘निसर्ग मित्र’चे कार्यवाह अनिल चौगुले यांनी सांगितले की, माझ्या कुटुुंबामध्ये अकरा सदस्य आहेत. दुष्काळी स्थितीमुळे पाणी बचतीचा केवळ कोरडा संदेश न देता कृतीतून लोकांचे प्रबोधन करावयाचे असे आम्ही ठरविले. त्यात घरात आंघोळ, भांडी धुणे, आदी स्वरूपांतील दैनंदिन वापरातील पाण्याचा पुनर्रवापर करण्याचे निश्चित केले. त्यानुसार प्रत्येकाने १८ लिटर पाणी असणाऱ्या एका बादलीमध्ये आंघोळ करण्याचा आम्ही अलिखित नियम केला. शिवाय आंघोळीचे पाणी एका टबामध्ये साठविले जाते. याद्वारे आम्ही प्रतिमाणसी १५ लिटर पाण्याची बचत करतो. हे पाणी बाथरूमसह घरातील फरशी पुसणे, अंगणात सडा मारणे यासाठी करतो. त्यासह घराच्या परिसरात लावलेल्या कुंड्यांमधील झाडांना पाणी देण्यासाठी आम्ही ‘कुंड दत्तक’ उपक्रम राबविला आहे. त्यात आम्ही प्रत्येकजण जेवल्यानंतर एका कुंडीमध्ये हात धुतो. त्यातून हात धुतल्यानंतरचे पाणी वाया जात नाही. ते झाडांना मिळते. त्यासह आठवड्यातून एकदा ताट धुण्याच्या पाण्याची बचत व्हावी यासाठी जेवणासाठी पळसाच्या पानांच्या पत्रावळीचा वापर करतो. या सर्व उपक्रमांतून आम्ही दिवसाकाठी सुमारे दोनशे लिटर पाण्याची बचत करीत आहोत. (प्रतिनिधी) पाणी बचत महत्त्वाचीपाण्याबाबत स्वयंपूर्ण असलेल्या कोल्हापूरला सध्या पाणीटंचाई भासत आहे. भविष्यात या टंचाईची तीव्रता वाढू नये यासाठी प्रत्येकाने पाण्याची बचत करणे महत्त्वाचे असल्याचे अनिल चौगुले यांनी सांगितले. ते म्हणाले, प्रत्येकाने गरजे इतके आणि कमीत कमी पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे. पाणी बचतीबाबत निसर्ग मित्र संस्थेच्या माध्यमातून प्रबोधन केले जात आहे. त्यात एक लिटरमध्ये दुचाकी धुणे, आंघोळीच्या पाण्याचा पुनर्रवापर करणे, आदींचा समावेश आहे. छोट्या-छोट्या प्रयत्नांतून सहजतेने पाणी बचत करणे शक्य आहे.