शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांवरील कराचा बोजा घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2016 00:58 IST

गुडस् अँँड सर्व्हिस टॅक्स चर्चासत्र : एस. जयकुमार यांचे प्रतिपादन; उद्योजक, व्यावसायिकांशी साधला संवाद

कोल्हापूर : ‘जीएसटी’मुळे करांवरील कर लागू होणे थांबणार असून, ग्राहकांवरील छुप्या कराचा बोजा घटण्याची शक्यता आहे. शिवाय कररचनेत सुसूत्रता येण्यासह करचुकवेगिरीला आळा बसण्यास मदत होईल, असे प्रतिपादन चेन्नईतील करतज्ज्ञ अ‍ॅड. एस. जयकुमार यांनी गुरुवारी येथे केले. येथील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात गुड्स अ‍ॅँड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी)बाबतच्या चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय अबकारी कर व सेवाकर विभागाचे आयुक्त वसा शेषागिरी राव, तर उपायुक्त श्रद्धा जोशी, सहआयुक्त शामधर प्रमुख उपस्थित होते. कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स, केंद्रीय अबकारी कर व सेवाकर विभाग आणि विविध औद्योगिक संघटनांतर्फे हे चर्चासत्र आयोजित केले होते.अ‍ॅड. एस. जयकुमार म्हणाले, सध्या करांवरील कराचा बोजा ग्राहकांवर पडत आहे. जीएसटीमुळे वस्तूच्या मूळ किमतीवर कर लावण्यात येणार असल्याने ग्राहकांवरील कराचा बोजा घटणार आहे. कॅनडा, आॅस्ट्रेलिया अशा प्रगत देशांतील करप्रणालीचा अभ्यास करून आपल्या देशाने ‘जीएसटी’चे प्रारूप बनविले आहे. यात केंद्र, राज्य आणि आंतरराज्य असे जीएसटीचे प्रारूप आहे. जीएसटी लागू झाल्यास कररचनेत सुसूत्रता येण्यासह करचुकवेगिरीला आळा बसण्यास मदत होईल. शिवाय सर्वांनाच समान कर रचना लागू असणार आहे.वसा शेषागिरी राव म्हणाले, जीएसटीमुळे उद्योजक, व्यावसायिकांनी घाबरून जाऊ नये. त्यांनी केंद्रीय अबकारी कर व सेवाकर विभागाकडून मार्गदर्शन घ्यावे. शिवाय काही सूचना असल्यास द्याव्यात. त्या केंद्राकडे पाठविल्या जातील. कार्यक्रमास नितीन वाडीकर, कमलाकांत कुलकर्णी, संजय जोशी, समीर परीख, योगेश कुलकर्णी, प्रदीपभाई कापडिया, चार्टर्ड अकौंटंट गिरीश कुलकर्णी, आदींसह उद्योजक, व्यावसायिक उपस्थित होते. कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने यांनी स्वागत केले. गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष देवेंद्र दिवाण यांनी आभार मानले. दरम्यान, सुमारे दीड तास रंगलेल्या या चर्चासत्रात अ‍ॅड. जयकुमार यांनी उद्योजक, व्यावसायिकांशी ‘जीएसटी’तील विविध पैलूंबाबत संवाद साधला. (प्रतिनिधी)‘एलबीटी’ राहणारचजीएसटीमध्ये एलबीटी, व्यावसायिक कर यांचा समावेश केलेला नाही. ५० कोटींवरील उलाढालीवर एलबीटी लागणार आहे. त्यामुळे जीएसटी लागू झाला तरी, एलबीटी राहणारच असल्याचे अ‍ॅड. एस. जयकुमार यांनी सांगितले.