शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

शेतीपंपाच्या वीजपुरवठ्यात कपात

By admin | Updated: May 10, 2017 00:50 IST

ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांवर पुन्हा अन्याय : आणखी दोन तास वीज कपात वाढ, शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क --कोपार्डे : शासन कोणाचेही असू दे कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी करायची असेल तर त्याची सुरुवात शेतकऱ्यांपासूनच करावयाची हा जणू अजेंडाच ठरला आहे. ५ मेपासून शेतीपंपासाठी १२ तास सुरू असलेला वीजपुरवठा दोन तास कमी करण्याबरोबर त्याच्या वेळेत बदल करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार ‘महावितरण’ने केल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहेत.पावसाळा संपताच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी सलग बारा तास वीज देण्याची घोषणा केली. मात्र, ही घोषणा हवेतच विरली. जानेवारी महिन्यात १२ तासांची वीज आठ तासांवर आणून शासनाने शेतकऱ्यांना धक्का दिला. यावर माध्यमांनी शेतकऱ्यांच्या संतापाला वाचा फोडल्यानंतर महावितरणने हा वीजपुरवठा दहा तास केला. मात्र, काही दिवसांतच रात्रीच्या वीजपुरवठ्यात बदल न करता दिवसा होणाऱ्या वीजपुरवठ्यात पुन्हा दोन तास कपात करून दिवसा आठ तास वीज देण्याचा निर्णया झाला, तर रात्री दहा तास वीजपुरवठा शेतीपंपांना देण्यास सुरुवात केली.यामध्ये पुन्हा बदल करून महावितरणने ५ मेपासून रात्री शेतीपंपांना दिला जाणारा वीजपुरवठा आठ तास केला असून रात्री ९ ते सकाळी ७ ऐवजी मध्यरात्री १२.४५ ते सकाळी ८.४५ असा वीजपुरवठा वेळेत बदल केला असून मध्यरात्री शेतकऱ्यांना पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. एवढेच नाही तर ही आठ तास केला जाणारा वीजपुरवठा सलगपणे नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.सध्या ऊसपिकाबरोबर सूर्यफुल, भात, मका या रब्बी पिकांना उन्हाच्या तडाख्याने पाण्याची गरज असते. अशावेळी सलग वीजपुरवठा मिळत नसल्याने पाणी देण्यास अडचणी निर्माण होत आहेत. नदी, विहिरीमध्ये पाणी असून देखील विजेअभावी शेतकऱ्यांना शेतीला पाणी देणे अवघड झाले आहे. वीज आल्यानंतर अर्ध्या तासानंतर पाटात पाणीजिल्ह्यातील बहुतांश भागात नदीपासून दूरवर असणाऱ्या क्षेत्रासाठी काही शेतकऱ्यांनी बँकांची कर्जे काढून नऊ ते दहा हजार फूट पाईपलाईन टाकल्या आहेत. लाईट आली की, किमान अर्ध्या तासानंतर पाटात पाणी पडते. यामुळे मध्येच अचानक वीज गेल्यास हीच अवस्था होत असल्याने सलग वीज मिळत नसल्याने व जेवढी वेळ वीज गेली तेवढी वाढ मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे.पाण्याची आवश्यकता असताना महावितरणने अचानक वीजपुरवठ्यात कपात करण्याबरोबर वेळेत बदल केल्याने पाणीपुरवठ्यात अडचणी येत आहेत. त्याचबरोबर सलग वीजपुरवठा होत नसल्याने पाण्याच्या फेरांमध्ये अंतर वाढत असून, संस्थाचालक व शेतकऱ्यांमध्ये वादावादीचे प्रकार होत आहेत. दिवसा दहा तास सलग वीज दिली तरच ऊसपीक वाचणार आहे.- सुभाष पाटील, अध्यक्ष केदारलिंगपाणीपुरवठा संस्था, वाकरे, ता. करवीर.