शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

शेतीपंपाच्या वीजपुरवठ्यात कपात

By admin | Updated: May 10, 2017 00:50 IST

ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांवर पुन्हा अन्याय : आणखी दोन तास वीज कपात वाढ, शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क --कोपार्डे : शासन कोणाचेही असू दे कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी करायची असेल तर त्याची सुरुवात शेतकऱ्यांपासूनच करावयाची हा जणू अजेंडाच ठरला आहे. ५ मेपासून शेतीपंपासाठी १२ तास सुरू असलेला वीजपुरवठा दोन तास कमी करण्याबरोबर त्याच्या वेळेत बदल करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार ‘महावितरण’ने केल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहेत.पावसाळा संपताच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी सलग बारा तास वीज देण्याची घोषणा केली. मात्र, ही घोषणा हवेतच विरली. जानेवारी महिन्यात १२ तासांची वीज आठ तासांवर आणून शासनाने शेतकऱ्यांना धक्का दिला. यावर माध्यमांनी शेतकऱ्यांच्या संतापाला वाचा फोडल्यानंतर महावितरणने हा वीजपुरवठा दहा तास केला. मात्र, काही दिवसांतच रात्रीच्या वीजपुरवठ्यात बदल न करता दिवसा होणाऱ्या वीजपुरवठ्यात पुन्हा दोन तास कपात करून दिवसा आठ तास वीज देण्याचा निर्णया झाला, तर रात्री दहा तास वीजपुरवठा शेतीपंपांना देण्यास सुरुवात केली.यामध्ये पुन्हा बदल करून महावितरणने ५ मेपासून रात्री शेतीपंपांना दिला जाणारा वीजपुरवठा आठ तास केला असून रात्री ९ ते सकाळी ७ ऐवजी मध्यरात्री १२.४५ ते सकाळी ८.४५ असा वीजपुरवठा वेळेत बदल केला असून मध्यरात्री शेतकऱ्यांना पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. एवढेच नाही तर ही आठ तास केला जाणारा वीजपुरवठा सलगपणे नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.सध्या ऊसपिकाबरोबर सूर्यफुल, भात, मका या रब्बी पिकांना उन्हाच्या तडाख्याने पाण्याची गरज असते. अशावेळी सलग वीजपुरवठा मिळत नसल्याने पाणी देण्यास अडचणी निर्माण होत आहेत. नदी, विहिरीमध्ये पाणी असून देखील विजेअभावी शेतकऱ्यांना शेतीला पाणी देणे अवघड झाले आहे. वीज आल्यानंतर अर्ध्या तासानंतर पाटात पाणीजिल्ह्यातील बहुतांश भागात नदीपासून दूरवर असणाऱ्या क्षेत्रासाठी काही शेतकऱ्यांनी बँकांची कर्जे काढून नऊ ते दहा हजार फूट पाईपलाईन टाकल्या आहेत. लाईट आली की, किमान अर्ध्या तासानंतर पाटात पाणी पडते. यामुळे मध्येच अचानक वीज गेल्यास हीच अवस्था होत असल्याने सलग वीज मिळत नसल्याने व जेवढी वेळ वीज गेली तेवढी वाढ मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे.पाण्याची आवश्यकता असताना महावितरणने अचानक वीजपुरवठ्यात कपात करण्याबरोबर वेळेत बदल केल्याने पाणीपुरवठ्यात अडचणी येत आहेत. त्याचबरोबर सलग वीजपुरवठा होत नसल्याने पाण्याच्या फेरांमध्ये अंतर वाढत असून, संस्थाचालक व शेतकऱ्यांमध्ये वादावादीचे प्रकार होत आहेत. दिवसा दहा तास सलग वीज दिली तरच ऊसपीक वाचणार आहे.- सुभाष पाटील, अध्यक्ष केदारलिंगपाणीपुरवठा संस्था, वाकरे, ता. करवीर.