शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
6
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
7
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
8
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
9
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
10
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
11
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
12
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
13
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
14
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
15
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
16
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
17
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
18
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
19
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
20
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता

वीज कंपनीच्या तक्रारी कमी व्हाव्यात

By admin | Updated: November 18, 2014 23:21 IST

प्रलंबित कामे वेळीच मार्गी लावा : आजऱ्यातील वीज कंपनीच्या तक्रार निवारण सभेतील सूर

आजरा : वीज वितरण कंपनी व तालुक्याचा विकास याचा निकटचा संबंध असून, तालुक्याचा विकास व्हावयाचा असेल, तर वीज वितरण कंपनीबाबतच्या सर्वसामान्यांच्या तक्रारी कमी होण्याबरोबरच प्रलंबित कामे वेळीच मार्गी लागण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती विष्णुपंत केसकर यांनी केले. यामध्ये उपस्थित मान्यवरांनीही आपला सूर मिसळला.आजरा तालुक्यातील वीज वितरण कामातील अडी-अडचणी, ग्राहक व शेतकऱ्यांच्या असणाऱ्या तक्रारी या पार्श्वभूमीवर आयोजित तक्रार निवारण सभेमध्ये सभापती केसरकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते.यावेळी धामणे येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी गावातील विजेचा प्रश्न मांडला. चिकोत्रा धरणातील पाणीसाठ्याचा प्रश्न असून, येथील ट्रान्स्फॉर्मर नदीपासून लांब असल्याने दुसरा ट्रान्स्फॉर्मर देण्याची गरज आहे. प्रस्ताव देऊनही वीज वितरण कंपनीकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.वीज बिले वेळेवर देण्याबाबत सदस्या अनिता नाईक, कामिनी पाटील यांनी प्रश्न मांडला. नादुरुस्त मीटर्स, वाढीव येणारी वीज बिले याबाबतही उपस्थितांनी प्रश्न केले.शिवाजी गुरव यांनी राजीव गांधी योजनेंतर्गत येणारे बिल, तांत्रिक बिघाड व दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांवर होणारा अन्याय याबाबतचे प्रश्न उपस्थित केले.कार्यकारी अभियंता डी. एम. पवार म्हणाले, धोरणात्मक निर्णयामुळे काही प्रस्ताव प्रलंबित आहेत, ते मार्गी लावण्याचा प्रयत्न असून कृषिपंप, नळपाणी पुरवठा, घरगुती वीज जोडण्या २५ मार्चपूर्वी जोडून दिल्या जातील. गणेश देसाई, अनिरुद्ध रेडेकर, बयाजी मिसाळ, सुनील देसाई, शिवाजी देसाई, छाया केसरकर, दीपिका सुतार, लक्ष्मण सावंत यांच्यासह विविध गावचे सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)