शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

वीज कंपनीच्या तक्रारी कमी व्हाव्यात

By admin | Updated: November 18, 2014 23:21 IST

प्रलंबित कामे वेळीच मार्गी लावा : आजऱ्यातील वीज कंपनीच्या तक्रार निवारण सभेतील सूर

आजरा : वीज वितरण कंपनी व तालुक्याचा विकास याचा निकटचा संबंध असून, तालुक्याचा विकास व्हावयाचा असेल, तर वीज वितरण कंपनीबाबतच्या सर्वसामान्यांच्या तक्रारी कमी होण्याबरोबरच प्रलंबित कामे वेळीच मार्गी लागण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती विष्णुपंत केसकर यांनी केले. यामध्ये उपस्थित मान्यवरांनीही आपला सूर मिसळला.आजरा तालुक्यातील वीज वितरण कामातील अडी-अडचणी, ग्राहक व शेतकऱ्यांच्या असणाऱ्या तक्रारी या पार्श्वभूमीवर आयोजित तक्रार निवारण सभेमध्ये सभापती केसरकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते.यावेळी धामणे येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी गावातील विजेचा प्रश्न मांडला. चिकोत्रा धरणातील पाणीसाठ्याचा प्रश्न असून, येथील ट्रान्स्फॉर्मर नदीपासून लांब असल्याने दुसरा ट्रान्स्फॉर्मर देण्याची गरज आहे. प्रस्ताव देऊनही वीज वितरण कंपनीकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.वीज बिले वेळेवर देण्याबाबत सदस्या अनिता नाईक, कामिनी पाटील यांनी प्रश्न मांडला. नादुरुस्त मीटर्स, वाढीव येणारी वीज बिले याबाबतही उपस्थितांनी प्रश्न केले.शिवाजी गुरव यांनी राजीव गांधी योजनेंतर्गत येणारे बिल, तांत्रिक बिघाड व दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांवर होणारा अन्याय याबाबतचे प्रश्न उपस्थित केले.कार्यकारी अभियंता डी. एम. पवार म्हणाले, धोरणात्मक निर्णयामुळे काही प्रस्ताव प्रलंबित आहेत, ते मार्गी लावण्याचा प्रयत्न असून कृषिपंप, नळपाणी पुरवठा, घरगुती वीज जोडण्या २५ मार्चपूर्वी जोडून दिल्या जातील. गणेश देसाई, अनिरुद्ध रेडेकर, बयाजी मिसाळ, सुनील देसाई, शिवाजी देसाई, छाया केसरकर, दीपिका सुतार, लक्ष्मण सावंत यांच्यासह विविध गावचे सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)