शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

लाल मिरचीचा दर आवाक्यात: खरेदीसाठी गर्दी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 11:16 IST

वर्षभराच्या बेगमीची लाल चटणी करण्यासाठी घराघरांत लगबग सुरू आहे. मिरची खरेदीसाठी लक्ष्मीपुरीत महिलांची झुंबड उडाली आहे. लालभडक दर्जेदार मिरची १०० ते १५० रुपये दराने मिळत आहे. चटणीसाठी मागणी वाढल्याने लसूण, आले, कोथिंबिरीचे दरही या वर्षभरात पहिल्यांदाच वाढले आहेत. लसूण ६० रुपये, तर आले १२० रुपये किलो झाले आहे.

ठळक मुद्देलाल मिरचीचा दर आवाक्यात: खरेदीसाठी गर्दी वाढलीलसूण, आल्याच्या दरात दुपटीने वाढ

कोल्हापूर : वर्षभराच्या बेगमीची लाल चटणी करण्यासाठी घराघरांत लगबग सुरू आहे. मिरची खरेदीसाठी लक्ष्मीपुरीत महिलांची झुंबड उडाली आहे. लालभडक दर्जेदार मिरची १०० ते १५० रुपये दराने मिळत आहे. चटणीसाठी मागणी वाढल्याने लसूण, आले, कोथिंबिरीचे दरही या वर्षभरात पहिल्यांदाच वाढले आहेत. लसूण ६० रुपये, तर आले १२० रुपये किलो झाले आहे.उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्याचा परिणाम बाजारपेठेवरही दिसत आहे. दुपारच्या वेळी बाजार ओस पडू लागला असून, विक्रेतेही सावलीचा आधार घेत आहेत. कडक ऊन असले तरी मिरची लाईनमध्ये मात्र खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळी चटणीसाठी लागणाऱ्या मिरचीचे दर फारच कमी झाले आहेत. एक नंबरची मिरची १५० रुपयांना प्रतिकिलो मिळत आहे.

संकेश्वरी मिरचीचे दर ४०० रुपयांवरच असले तरी उर्वरित काश्मिरी ब्याडगी, साधी ब्याडगी, हैदराबादी मिरचीचा दर १२० ते १५० रुपये आहे. गुंटूर १०० ते १३० रुपये, लवंगी १०० ते १३० असे सर्वसाधारण दर आहेत. चटणीसाठी लागणारा लसूण व आल्याचा दर वाढला आहे. २० ते २५ रुपये किलो असणारा दर आता ६० रुपये किलोवर पोहोचला आहे. आलेही ३० रुपये पाव किलो झाले आहे. पाच रुपयांना मिळणारी कोथिंबीर १५ रुपयांवर पोहोचली आहे.

कलिंगडांचे दर कमी, लिंबूच्या दरात वाढउन्हाचा तडाखा वाढल्याने काकडी, कलिंगड, अननसांची बाजारात रेलचेल वाढली असून त्यांचे दरही कमी झाले आहे. काळ्या पाठीचे कलिंगड १० ते २० रुपये, तर हिरव्या पट्ट्यांचे कलिंगड ४० ते ८० रुपये असा दर आहे. काकडीचे दर ४० ते ५० रुपये प्रतिकिलोवर टिकून आहेत. लिंबूची मागणी वाढल्याने दरातही वाढ झाली आहे.

उच्च प्रतीचा लिंबू पाच रुपयांना एक, तर कमी प्रतीचे दोन रुपयांना एक याप्रमाणे विक्री होत आहे. नीलम आंब्याचे आगमन झाले असून डझनाचा दर शंभर रुपये आहे. कर्नाटक हापूस बाजारात दिसत आहे; पण ४०० ते ६०० रुपये डझन दर असल्याने त्याला म्हणावे तसे गिºहाईक दिसत नाही.

हिरव्या मिरचीचा भडकाचटणीसाठीच्या लाल मिरचीचे दर ९० ते १०० रुपयांपर्यंत गडगडले असताना हिरव्या मिरचीचे दर मात्र वाढले आहेत. ३० ते ४० रुपये किलो असणारी हिरवी मिरची ८० रुपयांवर पोहोचली आहे. बाजारातही हिरव्या मिरच्यांची आवक कमी झाल्याचे दिसत आहे. आता उन्हाळी मिरचीचा हंगाम सुरू झाल्यानंतर आवक वाढून दरात घट होईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत.पालेभाज्या कडाडल्याकडक ऊन आणि पाण्याच्या कमतरतेमुळे पालेभाजी व फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे दरातही वाढ झाल्याचे दिसत आहे. मेथीची जुडी १५ रुपये, कांदेपात, शेपू, अंबाडा १० ते १५ रुपये असे दर आहेत. वांग्याचे दर स्थिर आहेत. ढबू मिरची, गवारी, दोडका ८० रुपये किलो आहे. कोबी, फ्लॉवरचाही दर २० ते ४० रुपये झाला आहे. 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर