शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

दररोज अडीच कोटी रुपये वसुलीची गरज

By admin | Updated: February 12, 2016 23:58 IST

जिल्हा बँक : एक अब्ज १३ कोटींची थकबाकी; उद्दिष्टपूर्तीसाठी ४५ दिवसांची मुदत

रमेश पाटील -- कसबा बावडा --जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची थकबाकी एक अब्ज १३ कोटी रुपये इतकी आहे. आगामी ४५ दिवसांत दररोज सरासरी अडीच कोटी रुपये थकबाकी वसुलीचे टार्गेट बँकेला पूर्ण करावेच लागेल, तरच बँकेची गाडी रुळावर येईल. तसेच पारंपरिक पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात धन्यता मानणाऱ्या जिल्हा बँकेला इतर बँकांप्रमाणे व्यवसाय वाढविण्याचे पर्याय शोधल्याशिवाय संचित तोटा भरून काढता येणार नाही. ही वस्तुस्थिती आहे.जिल्हा बँकेची ही वाढलेली थकबाकी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. तेच ते थकबाकीदार आणि त्यांच्या संस्था यांची नावे थकबाकीच्या यादीतून कमी झालेली नाहीत. प्रत्येक वर्षी बँकेचे कर्मचारी वसुलीसाठी दारात जातात आणि थकबाकीदार संस्थांकडून तीच ती गाऱ्हाणी ऐकून परत येतात. वसुली होते. मात्र, डोंगर पोखरून उंदीर निघाल्यासारखी. यंदाही वसुलीचा जोर संचालक मंडळाने सनई-चौघडा घेऊनच लावला. सनई-चौघड्याची चर्चाच खूप झाली; पण अपेक्षित वसुली मात्र पदरी पडली नाही.मार्च एंडिंगची तारीख जवळ येत चालली आहे. कसेबसे ४५ दिवस बाकी आहेत. थकबाकी तर तब्बल एक अब्ज १३ कोटी रुपये वसूल करायची आहे. ही प्रचंड असलेली थकबाकी वसूल करणे तितके सोपे काम नाही; परंतु तरीही बँकेने ‘ओटीएस’चा अवलंब करण्यासाठी मोठ्या थकबाकीदार संस्थांची मने वळविली, तर निश्चितच आशादायक चित्र तयार होऊ शकते. याशिवाय सध्या तरी बँकेला पर्याय नाही. तसेच ज्या संस्थांच्या मालमत्ता जप्त करून विक्री करण्याचे आदेश न्यायालयाकडून प्राप्त झाले आहेत, अशा संस्थांची मालमत्ताही बँकेने त्वरित विक्री करून आपल्या थकबाकी वसुलीचा दबदबा कायम ठेवल्यास अन्य कर्जदारांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.जिल्हा बँकेने पारंपरिक पीक कर्जाशिवाय अन्य उत्पन्नाचे मार्ग निवडावेत, अशा सूचना रिझर्व्ह बँक व ‘नाबार्ड’ने यापूर्वीच सर्व बँकांना केल्या आहेत. त्यानुसार जिल्हा बँकेने व्यक्तिगत कर्जपुरवठा करण्याचे धोरण अवलंबिले. त्यामध्ये हौसिंग, वाहन खरेदी, आदी कर्जांचा समावेश होता. मात्र, बँकेत अशा प्रकारची कर्जे मिळतात याची म्हणावी तशी जनजागृती करण्यात बँकेला अपयश आले. परिणामी, अशा कर्जांना बँकेकडे फारशी मागणी झाली नाही.बँकेच्या ठेवी या बँकेच्या मोठा आर्थिक कणा असतात. जिल्हा बँकांनी ठेवी वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न करायला हवे होते. सध्या जिल्हा बँकेच्या ठेवी वाढल्या की घटल्या, यावरून राजकारणात उलट-सुलट आरोप-प्रत्यारोप होत आहेत. असे जरी असले तरी ज्या वेगाने ठेवी वाढायला पाहिजे होत्या, तो वेग बँकेने अद्याप घेतलेला नाही. ठेवी वाढविण्यासाठी काऊंटरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असते. त्याच्या बोलण्यावर व देण्यात येणाऱ्या सर्व्हिसवर ठेवी वाढत असतात....तरच लाभांशबँकेची वसूल झाल्याशिवाय बँक सभासदांना लाभांश देऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. गेली अनेक वर्षे सभासदांना लाभांश न मिळाल्याने संस्थांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.