शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली बँकांची वसुली

By admin | Updated: June 9, 2016 00:14 IST

यंदाचा खरीप हंगाम या आठवड्यात सुरू होत आहे. आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी पीककर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवीत आहे.

नितीन भगवान -- पन्हाळा नगरपरिषदेत पूर्वीपासून गटातटाचे राजकारण सुरू आहे. या गटांना एकत्र करून जनसुराज्य शक्ती पक्षाने गेली दहा वर्षे राजकारण केले; पण गट-तट त्यांना संपविता आले नाहीत. उलट प्रत्येक गटाला कोणत्या ना कोणत्या कारणास्तव गोंजारत बसल्याने गट प्रबळ झाले. या गटाच्या राजकारणात गावाकडे दुर्लक्ष झाले आणि गट सत्तेसाठी भांडू लागल्याने विकासकामे रखडली आहेत.पन्हाळा गिरिस्थान नगर परिषदेची सत्ता गेली दहा वर्षे जनसुराज्य शक्ती पक्षाकडे आहे. २००८-२०१२ सालातील सत्ता संपूर्ण गावाने एकत्र येऊन बिनविरोध करून एकहाती दिली. २०१२ ते २०१६ साली निवडणूक होऊन त्यातही जनसुराज्य शक्ती पक्षाने बाजी मारली; पण या दहा वर्षांच्या कालावधीत या पक्षाने पन्हाळ्याचा विकास कोणताच केला नाही. उलट सत्ता संघर्षात दहा वर्षे वाया गेल्याने यावर्षी होणारी निवडणूक जनसुराज्य शक्ती पक्षाला वजा करूनच होण्याचे संकेत आहेत.२००८ साली विनय कोरे यांनी आपण मंत्रिपदावर आहे, पन्हाळा शहराचा कायापालट करू असे आश्वासन दिल्याने संपूर्ण गाव एकत्र येऊन बिनविरोध निवडणूक करून त्यांच्या हाती सत्ता दिली. बिनविरोध निवडीमुळे महाराष्ट्र शासनाकडून विशेष बक्षीस स्वरूपात रक्कम देण्याचे त्यांनी आश्वासित केले, पण ती रक्कम आजअखेर आलेली नाही. ते मंत्री असल्याने पन्हाळावासीय पन्हाळा सुशोभीकरणासाठी आणि पुरातन खात्याची घरे बांधकामाची अट शिथिल होण्यासाठी मोठ्या आशेने त्यांच्याकडे पाहत होते; पण कोरे ते कोरेच, त्यांनी पन्हाळ््यासाठी कुठला शासकीय फंड दिला नाही, की पुरातन खात्याकडे प्रस्ताव दिला नाही.यामुळे २०१२ च्या निवडणुकीत कोरेंना बऱ्यापैकी विरोध झाला आणि निवडणूक लागली; पण विरोधी बाजू राष्ट्रवादीची भक्कमपणे काम करू शकली नाही. यामुळे पुन्हा कोरेंच्या जनसुराज्य शक्ती पक्षाकडे सत्ता राहिली. नगराध्यक्ष पदाच्या सत्तेसाठी गट विभागले. यात मोकाशी गट प्रबळ ठरला. पहिल्या अडीच वर्षांत मागासवर्गीय अध्यक्ष पदातील सव्वा वर्ष विजय पाटील गटाला नगराध्यक्ष पद व सव्वा वर्ष मोकाशी गटाला नगराध्यक्ष पद मिळाले. त्यानंतरची अडीच वर्षे सर्वसाधारण नगराध्यक्ष पद राहिले. पुन्हा स्वत: असीफ मोकाशी विरुद्ध विजय पाटील असा सामना झाला. यात प्रत्येकी सव्वा वर्षा ठरले; पण या निवडीवेळी मोकाशी यांचा विनय कोरेंनी केलेला अपमान ते विसरले नाहीत. पर्यायाने त्यांनी आपल्या कार्यकालानंतर राजीनामा दिला नाही आणि विनय कोरेंना आमदारकीमध्ये साथ दिली नाही. पर्यायाने मोकाशी गटामुळे त्यांचे आमदार पद गेले,अशी तालुक्यात चर्चा होत आहे. मोकाशी यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाल्यावर आमदार सत्यजित पाटील यांनी आपली ताकद त्यांच्यामागे उभी केली.नगरपरिषदेस २००८-०९ साली संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात प्रथम पुरस्कार मिळाला, २०१५-१६ साली स्वच्छ भारत अंतर्गत हागणदारीमुक्त पुरस्कार प्राप्त झाला आहे. पन्हाळा शहरात पर्यटकांची वार्षिक भेट अंदाजे दहा लाख इतकी आहे. नगरपरिषदेचे कविवर्य गोरोपंत ग्रंथालय असून, या ठिकाणी ५० हजार पुस्तके उपलब्ध आहेत. अत्यंत दुर्मीळ ग्रंथ आणि पुस्तकांबरोबरच गोरोपंतांची हस्तलिखिते आहेत.