शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांचा विक्रम

By admin | Updated: October 24, 2015 01:18 IST

नवरात्रौत्सव : भाविकांनी गाठला २१ लाखांचा आकडा; असुविधांचाही त्रास

कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक देवता असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून आलेल्या भाविकांच्या संख्येने मंदिराच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच २१ लाखांचा टप्पा पार केला आहे. भक्तांच्या संख्येचा हा विक्रमी आकडा असला तरी त्यांना सामना करावा लागलेल्या गैरसोयींनीही असाच विक्रम गाठला आहे, असे म्हणावे लागेल. गेल्या काही वर्षांत अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. नवरात्रात ही आकडेवारी १५ लाखांच्या आसपास जाते. दोन वर्षांपूर्वी हा आकडा १६ लाखांपर्यंत गेला होता. यंदा मात्र त्यात तब्बल पाच लाख भाविकांची भर पडली असून नवरात्रौत्सवाच्या पहिल्या माळेपासून दसऱ्यापर्यंत म्हणजे १३ ते २२ आॅक्टोबर या दहा दिवसांच्या कालावधीत देवस्थान समितीने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार तब्बल २१ लाख ६ हजार ६५३ इतक्या भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे. अंबाबाईची सर्वदूर पसरलेली ख्याती, कोल्हापूरसह कल्याण-डोंबिवली येथील महापालिकेच्या निवडणुका, पुण्यासह, सांगलीतून मोठ्या संख्येने आलेले भाविक या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून ही उच्चांकी गर्दी झाली. मात्र दर्शनासाठी आलेल्या भाविकांना तितक्याच गैरसोयींचा सामना करावा लागला. पार्किंगची व्यवस्था, रस्त्यांचे नियोजन, स्वयंसेवी संस्थांंच्या तातडीच्या आरोग्य सुविधा आणि भाविकांना पाण्याची सोय या सुविधा वगळता बाकी सगळ्या नियोजनाचा बोजवारा उडाला होता. पूजांतून छुपा अजेंडा...नवरात्रौत्सवात शक्तिरूपी दुर्गेची विविध रूपे अंबाबाईच्या माध्यमातून साकारली जातात. यंदा मात्र श्रीपूजकांनी अंबाबाईची केवळ कमळातीलच बैठी पूजा बांधून जणू अंबाबाईच्या ‘लक्ष्मीकरणा’चा चंग बांधल्याचे जाणवले. आता ठरवून कमळातील बैठी पूजा बांधल्याने भक्तांमध्ये मात्र पुजाऱ्यांबद्दल अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याशिवाय केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. ‘आता महापालिकेवरही कमळ फुलवा,’ असा प्रचारच या पूजांतून केला गेल्याचा आरोप होत आहे. आडमार्गांनी दर्शन निवडणुकांमुळे कोल्हापुरातील राजकीय व्हीआयपी नसले तरी स्वयंघोषित व्हीआयपींमुळे भाविकांना अंबाबाईच्या दर्शनासाठी तब्बल पाच तासांहून अधिक काळ वाट पाहावी लागली. शनिमंदिर, सटवाई मंदिर येथून भाविकांना सोडण्यात पोलीस आणि खासगी सुरक्षारक्षक आघाडीवर होते. त्यामुळे परराज्यांतून, शहरांतून आलेल्या भाविकांवर अन्याय झाला.