शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगलेतील जिल्हा परिषद मतदारसंघाची पुनर्रचना होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 00:50 IST

ज्या गावचे रहिवाशी आहोत त्या समावेश असलेल्या गावांतूनच जिल्हापरिषद किंवा पंचायत समिती लढवण्याचा आनंद कार्यकर्त्यांना मिळणार

आयुब मुल्ला -- खोची -हातकणंगले तालुक्यातील शिरोली व हुपरी गावांना नगरपंचायत होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे आगामी जिल्हापरिषद मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे. यातून ही दोन गावे वगळल्याने किमान एकतरी मतदारसंघ कमी होईल. अकरा ऐवजी दहा मतदार संघ होतील. साहजिकच पुनर्रचनेचा फायदा गृहीत धरून मतदारसंघाचे आखाडे बांधले जात आहेत. इच्छुकांनी त्यादृष्टीने जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे.जिल्ह्यात सर्वांत जास्त म्हणजे अकरा जिल्हा परिषद मतदारसंघ हातकणंगले व करवीर तालुक्यात आहेत. त्यामुळे प्रमुख पदाधिकारी होण्यात याच तालुक्यातील कार्यकर्ते अग्रेसर असतात. पण या दोन्ही तालुक्यांची भौगोलिक रचना आता मतदारसंघामुळे बदलण्याची शक्यता आहे. जर हद्दवाढ झाली तर करवीरची रचनाच व्यापक प्रमाणात बदलेल पण सध्यातरी याबाबत ठोस असे काही दिसत नाही. याउलट हातकणंगले तालुक्यातील शिरोली, हुपरी या मोठ्या गावांना नगरपालिका मंजुरीचे संकेत शासनाने दिले आहेत. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच तसा निर्णय होणार आहे, असे समजते. त्यामुळे सर्वच पक्षांचे इच्छुक आपल्या सोयीनुसार मतदारसंघ कसा बसेल अशी प्राथमिक चर्चा करू लागले आहेत. दहा वर्षांपूर्वी झालेल्या पुनर्रचनेमुळे बहुतांश प्रस्थापितांची अडचण झाली होती. आपला हक्काचा मतदारसंघ सोडून दुसरीकडून निवडणूक लढवावी लागली. परंतु आता मात्र, पुन्हा पुनर्रचना होणार हे निश्चित आहे. आपण ज्या गावचे रहिवाशी आहोत त्या समावेश असलेल्या गावांतूनच जिल्हापरिषद किंवा पंचायत समिती लढवण्याचा आनंद कार्यकर्त्यांना मिळणार आहे.त्यामुळे जुन्या जनसंपर्काचा, गटाच्या बांधणीचा, पक्षीय प्रभावाचा उपयोग होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पूर्वीसारखे पक्षीय राजकारण असेलच परंतु नेत्यांच्या बिघाडीमुळे स्वतंत्र आघाड्याही निर्माण होतील. यामध्ये अनेक पक्षांचे कार्यकर्ते असतील. भक्कम आघाडी तालुक्याच्या पश्चिम भागात बांधण्याचे काम किंबहुना चाचपणी सुरू आहे. चर्चाही सुरू आहे. त्यास प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पक्षीय संघर्षाबरोबरच आघाडीतही निवडणुकीच्या लढाई होणार आहेत.