शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

कोल्हापूर, पुणे येथे सर्किट बेंचची शिफारस

By admin | Updated: March 25, 2016 00:54 IST

विधान परिषद : सतेज पाटील यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई, कोल्हापूर : सातत्याने होणाऱ्या मागणीचा विचार करून कोल्हापूर व पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ स्थापन करण्यास मान्यता मिळावी, अशी शिफारस राज्य सरकारने हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ अथवा सर्किट बेंच सुरू करण्याबाबत राज्य शासनाने मान्यता दिली आहे का? नसल्यास विलंबाची कारणे काय? असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केले. प्रलंबित खटल्यांची संख्या व मुंबई शहरापासूनचे अंतर आणि लोकसंख्या या निकषांवर कोल्हापूर व पुण्यात फिरते खंडपीठ देण्याची मागणी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, राज्य पुनर्रचना अधिनियम १९५६ च्या कलम ५१/२ मधील तरतुदीनुसार संबंधित राज्याचे राज्यपाल व संबंधित उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्याशी विचारविनिमय करून एखाद्या ठिकाणी उच्च न्यायालयाचे नवीन खंडपीठ स्थापन करण्याबाबतचे आदेश राष्ट्रपतींमार्फत निर्गमित केले जातात. राज्यातील विविध भागांतून मुुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन होण्याबाबत सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे या मागणीच्या अनुषंगाने मुख्य न्यायमूर्तींनी मुंबई उच्च न्यायालयातील तीन न्यायमूर्तींची समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. राज्यात उच्च न्यायालयाचे नवीन खंडपीठ स्थापन करण्यास बराचसा कालावधी लागू शकतो, ही बाब विचारात घेऊन प्रलंबित खटल्यांची संख्या, लोकसंख्या या निकषांवर कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ (सर्किट बेंच) स्थापन करण्यास मान्यता देण्यात यावी. पुणे येथेही मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ स्थापन करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा, अशी शिफारस मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय, मुंबई यांना शासनाने केली आहे.सर्किट बेंच हीच मागणी : चव्हाणगेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्किट बेंचसाठी उन्हाळी अधिवेशनात अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी केली होती, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र एल. चव्हाण यांनी गुरुवारी दिली. सातत्याने होणाऱ्या मागणीचा विचार करून कोल्हापूर व पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ स्थापन करण्यास मान्यता मिळावी, अशी शिफारस राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना केली असल्याचे बुधवारी (दि. २३) मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती धीरेंद्र वाघेला यांच्याबरोबर सर्किट बेंचप्रश्नी पत्रव्यवहार सुरू आहे.