शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

जबाबदारी ओळखून काम करा

By admin | Updated: September 6, 2015 22:37 IST

सुशांत खांडेकर : शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सक्त सूचना

राजापूर : गणेशोत्सवाच्या काळात प्रत्येक शासकीय कार्यालयाने आपली जबाबदारी ओळखून काम करावे व जनतेला चांगले सहकार्य करावे, अशी स्पष्ट सूचना प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी आयोजित बैठकीत दिली.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजापूर प्रांत कार्यालयात खास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राजापूरचे तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे, लांजाचे तहसीलदार कांबळे, राजापूर व लांजाचे मुख्याधिकारी, दोन्ही तालुक्यांचे पोलीस निरीक्षक, विविध शासकीय विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.गणेशोत्सव काळात राजापूर शहरातील मार्गावरील विद्युत व्यवस्था सुरळीत राहील, याची खबरदारी घ्या, अशी सूचना नगर परिषद प्रशासनाला देण्यात आली. तसेच गणेश विसर्जन घाटासहीत तालुक्यातील विविध ठिकाणी होत असलेल्या गणपती विसर्जन घाटाच्या स्वच्छतेसह त्या ठिकाणी कायमस्वरुपी सौरऊर्जेचे दिवे असावेत, अशीही सूचना संबंधितांना देण्यात आली.राजापूर शहरातील गणेश विसर्जन मार्गावरील अडथळे ठरणारे विद्युत पोल हटवले जावेत, यासहत उत्सवाच्या काळात वीजपुरवठा कायम सुरळीत राहण्याच्या दृष्टीने सर्वांनी खबरदारी घ्या, अशी सूचना विद्युत वितरण विभागाला देण्यात आली. त्यासाठी तुमच्या कार्यालयात २४ तास फोनवर उपलब्ध होईल, असा कर्मचारी तैनात ठेवा, असेही बजावण्यात आले आहे. केवळ महावितरणच नाही तर प्रत्येक कार्यालय सणाच्या काळात २४ तास उघडे असायलाच हवे, अशा स्पष्ट शब्दात प्रांताधिकाऱ्यांनी संबंधितांना बजावले.महामार्गावर वाटूळ, लांजा, ओणी, राजापूर या दरम्यान चेकपोस्ट उभारली जाणार आहेत. एमएच-०७ व एमएच-०८ या क्रमांकाच्या गाड्या वगळून परजिल्ह्यातून येणाऱ्या अन्य क्रमांकाच्या गाड्यांना दररोज रात्री १२ वाजल्यानंतर या चेकपोस्टवर थांबवले जाईल. त्यांना चहापाणी देऊन त्यांचा पुढील प्रवास कसा सुखकारक ठरेल, यादृष्टीने लक्ष दिले जाणार आहे. नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या चेकपोस्टजवळ एक रूग्णवाहिकादेखील तैनात ठेवली जाईल. त्यादृष्टीने आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. गणेशोत्सव काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. लांजा तालुक्यातील आडवली, विलवडे व राजापूर तालुक्यातील राजापूर रोड स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची आपापल्या गावी जाण्यासाठी खासगी वाहनांकडून होणाऱ्या लुटीचा मुद्दा या बैठकीत आला. त्यावेळी राजापूर आगाराने या रेल्वे स्थानकाकडे जादा फेऱ्या सोडून प्रवाशांची व्यवस्था करावी, अशा सूचना राजापूर आगाराला देण्यात आली. शिवाय परजिल्ह्यातून येणाऱ्या चालकांना येथील भौगोलिक परिस्थितीचा अंदाज नसतो. त्यामुळे वाहने चालवताना त्यांना अडथळे ठरु नयेत किंवा धोका निर्माण होऊ नये, यासाठी अशा चालकांचे समुपदेशन करा, असेही प्रांताधिकाऱ्यांनी एस. टी. आगाराला बजावले.गणेशोत्सव काळात प्रत्येक कार्यालयाने आपापली जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे, असे स्पष्ट शब्दात प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना बजावले. (प्रतिनिधी)तालुक्यात विविध ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी बैठक घेतली.