शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
MNS Morcha: मनसेचा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
4
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
5
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
6
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
7
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
8
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
9
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
10
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
11
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
12
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
13
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
14
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
15
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
16
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
17
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
18
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
19
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
20
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र

सहकारी धरणांना ३३ लाखांचा निधी प्राप्त

By admin | Updated: July 7, 2016 00:38 IST

जिल्ह्यात आठ धरणे : अखेरच्या घटका मोजणाऱ्या सहकारी संस्थांना संजीवनी

प्रकाश पाटील -- कोपार्डे --कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी तत्त्वावर बांधलेल्या आठ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांसाठी काँग्रेस आघाडी सरकारने खास बाब म्हणून ७६ लाखांचा निधी मंजूर केला होता. या निधीच्या मंजुरीची पत्रे हातात पडण्यापूर्वी काँग्रेस सरकार पायउतार झाले होते. दरम्यान, युती सरकार सत्तेत येऊन एक वर्ष झाले तरी हा निधी या संस्थांना मिळाला नव्हता. अखेर एक वर्षांनंतर यातील ५० टक्के रक्कम धरण दुरुस्तीसाठी या संस्थांकडे अदा केल्याने या सहकारी धरणांना नवसंजीवनी मिळाली आहे.६० वर्षांपूर्वी पावसाळ्यात पडणारे पाणी वाहून गेल्याने अतिपावसाचा जिल्हा असूनही उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्यासाठीही मोठे दुर्भिक्ष निर्माण होत होते. हे टाळण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सांगरूळ येथे कुंभी नदीवर पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधण्याची संकल्पना पुढे आली. यासाठी सांगरूळसह ११ गावांतील शेतकरी एकत्र आले. १९५० मध्ये यातून सहकारी तत्त्वावरील पहिल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची निर्मिती झाली. याला ६५ वर्षांचा काळ लोटला आहे. हाच आदर्श घेत जिल्ह्यासह देशात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्याचा ट्रेंड आला. यातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश देशाला मिळाला. शेतकऱ्यांना माफक दरात पाणीपुरवठा करणे एवढ्याच एका सहकार्यामुळे या संस्था कधी नफ्यात आल्याच नाहीत. यामुळे गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरुस्ती झालीच नाही. याचा परिणाम या सहकारी तत्त्वावरील बंधाऱ्यांची डागडुजी झालीच नाही. यामुळे या धरणांची मोठी पडझड झाली. ऐतिहासिक ठेवा असणारे हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दगडी पिलर ढासळल्याने ढासळू लागले होते. हे पिलर कमकुवत झाल्याने पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करणे अवघड झाले होते. बहुतांश पाणी वाहून गेल्याने बंधारे कार्यक्षमतेने पाणी अडवू शकत नव्हते. पर्यायाने संस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्या. निधी मिळण्यात अडचण निर्माण झाली होती. तरीही संस्थांनी प्रयत्न सोडले नव्हते. शेवटच्या टप्प्यात तत्कालीन पाटबंधारेमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील सांगरूळ, कोगे, तिरपण, सिद्धनेर्ली, सुरुपली, बाचणी, कळे या सहकारी बंधाऱ्यांना ७६ लाखांचा निधी मंजूर केला; पण निधीच्या मंजुरीची पत्रे संस्था चालकांच्या हातात पडतात, तोपर्यंत आघाडी सरकार पायउतार झाले. यानंतर आलेल्या युती सरकारने एक वर्षाचा काळ लोटला तरी हा निधी दिला नव्हता. मात्र, संस्थाचालकांच्या रेट्यामुळे अखेर ७६ लाखांपैकी ५० टक्के रक्कम नुकतीच सरकारने या संस्थांना वितरित केली असल्याने या ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या धरणांना संजीवनी मिळाली आहे. यामुळे संस्थाचालकांत समाधान व्यक्त होत आहे.