शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

पैसे वाचले; पण भ्रष्टाचार थांबला तरच फायदा

By admin | Updated: June 16, 2014 00:40 IST

कामास गती शक्य : पाणी योजनांची लोकवर्गणीची अट रद्द

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूरउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी असलेली दहा टक्के लोकवर्गणीची अट काढून टाकल्याने कंत्राटदारांचे पैसे वाचले; परंतु मूळ योजनांतील भ्रष्टाचार थांबल्याशिवाय या योजनांची कामेही चांगली होणार नाहीत व त्यांना गतीही येणार नाही, अशी भीती जाणकारांतून व्यक्त होत आहे.काम कोणतेही असो; त्यामध्ये गावांचा हिस्सा असल्याशिवाय ते काम आपले आहे असे वाटणार नाही; म्हणून शासनाने पाणी योजनांना दहा टक्के लोकवर्गणीची अट लागू केली. परंतु गावे किती हुशार! त्यांनी हे पैसे कंत्राटदाराला भरायला लावले. त्यामुळे योजनेची कामे निकृष्ट होत राहिली. एक पाणी योजना सरासरी एक कोटी रुपयांची असते. त्यामुळे दहा टक्के पैसे भरायचे म्हटल्यावर दहा लाख रुपये लागतात. बहुतांश ग्रामपंचायतींची तेवढी रक्कम भरायची ताकद नाही. कारण त्यांच्याकडे उत्पन्नाचे मार्ग नाहीत. लोकांना सगळे सरकारनेच फुकट द्यावे असे वाटते. राजकारण्यांनी त्यांना तशी सवयच लावून दिली आहे. त्यामुळे एक कोटीच्या कामात दहा लाख लोकवर्गणी व आणखी चार-सहा लाख पाकिटातून घालून द्यावे लागत असल्याने कामे निकृष्ट झाली. जिथे ही वर्गणी भरता आली नाही तिथे योजनांना खीळ बसत होती. आता हे सगळेच बंद होणार हे खरे असले तरी वाचलेली रक्कम योजनेच्या कामाला लागली तर सोने होईल; नाहीतर सरकार पैसे देणार आणि कंत्राटदाराला टक्केवारी द्यावी लागली तर सरकारच्या निर्णयाचा ना गावांना फायदा, ना सरकारला. काहीजणांचे फक्त खिसे भरले जातील, अशीच भीती अनेक वर्षे सरपंच म्हणून काम केलेल्या जाणकारांनी व्यक्त केली. लोकवर्गणीची अट अर्थसंकल्पीय अधिवेशनात रद्द झाली; त्यामुळे यंदाच्या वर्षासाठी ती लागू होणार असेल तर एकट्या कोल्हापूर जिल्ह्याात ५३६ योजनांना त्याचा फायदा होऊ शकेल. जिल्हा परिषदेला वर्षाला सरासरी ७५ कोटी रुपयांचा निधी या योजनांसाठी मंजूर होतो. निधी नाही म्हणून योजना रखडली असे एकही उदाहरण नसल्याचे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकृत सूत्रांनी प्रस्तुत प्रतिनिधीस सांगितले.