शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

पैसे वाचले; पण भ्रष्टाचार थांबला तरच फायदा

By admin | Updated: June 16, 2014 00:40 IST

कामास गती शक्य : पाणी योजनांची लोकवर्गणीची अट रद्द

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूरउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी असलेली दहा टक्के लोकवर्गणीची अट काढून टाकल्याने कंत्राटदारांचे पैसे वाचले; परंतु मूळ योजनांतील भ्रष्टाचार थांबल्याशिवाय या योजनांची कामेही चांगली होणार नाहीत व त्यांना गतीही येणार नाही, अशी भीती जाणकारांतून व्यक्त होत आहे.काम कोणतेही असो; त्यामध्ये गावांचा हिस्सा असल्याशिवाय ते काम आपले आहे असे वाटणार नाही; म्हणून शासनाने पाणी योजनांना दहा टक्के लोकवर्गणीची अट लागू केली. परंतु गावे किती हुशार! त्यांनी हे पैसे कंत्राटदाराला भरायला लावले. त्यामुळे योजनेची कामे निकृष्ट होत राहिली. एक पाणी योजना सरासरी एक कोटी रुपयांची असते. त्यामुळे दहा टक्के पैसे भरायचे म्हटल्यावर दहा लाख रुपये लागतात. बहुतांश ग्रामपंचायतींची तेवढी रक्कम भरायची ताकद नाही. कारण त्यांच्याकडे उत्पन्नाचे मार्ग नाहीत. लोकांना सगळे सरकारनेच फुकट द्यावे असे वाटते. राजकारण्यांनी त्यांना तशी सवयच लावून दिली आहे. त्यामुळे एक कोटीच्या कामात दहा लाख लोकवर्गणी व आणखी चार-सहा लाख पाकिटातून घालून द्यावे लागत असल्याने कामे निकृष्ट झाली. जिथे ही वर्गणी भरता आली नाही तिथे योजनांना खीळ बसत होती. आता हे सगळेच बंद होणार हे खरे असले तरी वाचलेली रक्कम योजनेच्या कामाला लागली तर सोने होईल; नाहीतर सरकार पैसे देणार आणि कंत्राटदाराला टक्केवारी द्यावी लागली तर सरकारच्या निर्णयाचा ना गावांना फायदा, ना सरकारला. काहीजणांचे फक्त खिसे भरले जातील, अशीच भीती अनेक वर्षे सरपंच म्हणून काम केलेल्या जाणकारांनी व्यक्त केली. लोकवर्गणीची अट अर्थसंकल्पीय अधिवेशनात रद्द झाली; त्यामुळे यंदाच्या वर्षासाठी ती लागू होणार असेल तर एकट्या कोल्हापूर जिल्ह्याात ५३६ योजनांना त्याचा फायदा होऊ शकेल. जिल्हा परिषदेला वर्षाला सरासरी ७५ कोटी रुपयांचा निधी या योजनांसाठी मंजूर होतो. निधी नाही म्हणून योजना रखडली असे एकही उदाहरण नसल्याचे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकृत सूत्रांनी प्रस्तुत प्रतिनिधीस सांगितले.