शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

पैसे वाचले; पण भ्रष्टाचार थांबला तरच फायदा

By admin | Updated: June 16, 2014 00:40 IST

कामास गती शक्य : पाणी योजनांची लोकवर्गणीची अट रद्द

विश्वास पाटील ल्ल कोल्हापूरउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी असलेली दहा टक्के लोकवर्गणीची अट काढून टाकल्याने कंत्राटदारांचे पैसे वाचले; परंतु मूळ योजनांतील भ्रष्टाचार थांबल्याशिवाय या योजनांची कामेही चांगली होणार नाहीत व त्यांना गतीही येणार नाही, अशी भीती जाणकारांतून व्यक्त होत आहे.काम कोणतेही असो; त्यामध्ये गावांचा हिस्सा असल्याशिवाय ते काम आपले आहे असे वाटणार नाही; म्हणून शासनाने पाणी योजनांना दहा टक्के लोकवर्गणीची अट लागू केली. परंतु गावे किती हुशार! त्यांनी हे पैसे कंत्राटदाराला भरायला लावले. त्यामुळे योजनेची कामे निकृष्ट होत राहिली. एक पाणी योजना सरासरी एक कोटी रुपयांची असते. त्यामुळे दहा टक्के पैसे भरायचे म्हटल्यावर दहा लाख रुपये लागतात. बहुतांश ग्रामपंचायतींची तेवढी रक्कम भरायची ताकद नाही. कारण त्यांच्याकडे उत्पन्नाचे मार्ग नाहीत. लोकांना सगळे सरकारनेच फुकट द्यावे असे वाटते. राजकारण्यांनी त्यांना तशी सवयच लावून दिली आहे. त्यामुळे एक कोटीच्या कामात दहा लाख लोकवर्गणी व आणखी चार-सहा लाख पाकिटातून घालून द्यावे लागत असल्याने कामे निकृष्ट झाली. जिथे ही वर्गणी भरता आली नाही तिथे योजनांना खीळ बसत होती. आता हे सगळेच बंद होणार हे खरे असले तरी वाचलेली रक्कम योजनेच्या कामाला लागली तर सोने होईल; नाहीतर सरकार पैसे देणार आणि कंत्राटदाराला टक्केवारी द्यावी लागली तर सरकारच्या निर्णयाचा ना गावांना फायदा, ना सरकारला. काहीजणांचे फक्त खिसे भरले जातील, अशीच भीती अनेक वर्षे सरपंच म्हणून काम केलेल्या जाणकारांनी व्यक्त केली. लोकवर्गणीची अट अर्थसंकल्पीय अधिवेशनात रद्द झाली; त्यामुळे यंदाच्या वर्षासाठी ती लागू होणार असेल तर एकट्या कोल्हापूर जिल्ह्याात ५३६ योजनांना त्याचा फायदा होऊ शकेल. जिल्हा परिषदेला वर्षाला सरासरी ७५ कोटी रुपयांचा निधी या योजनांसाठी मंजूर होतो. निधी नाही म्हणून योजना रखडली असे एकही उदाहरण नसल्याचे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकृत सूत्रांनी प्रस्तुत प्रतिनिधीस सांगितले.