शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तमदलगे-अंकली ‘बायपास’ पुन्हा वादात

By admin | Updated: November 16, 2016 00:01 IST

शासनाचे धोरण कागदावरच : ‘शासकीय काम सहा महिने थांब’ याचा अनुभव, कोणत्याच उपाययोजना नाहीत

जयसिंगपूर : रस्ते चांगल्या दर्जाचे व खड्डेमुक्त करण्याचे धोरण शासनाकडून राबविले जात असताना सांगली-कोल्हापूर महामार्गावरील तमदलगे बसवान खिंड ते अंकली या बायपास रस्त्यावरील प्रश्न प्रलंबित आहेत. निमशिरगावच्या शाळा स्थलांतराचा प्रश्न, जैनापूर-चिपरी रस्ता, जयसिंगपूर रेल्वेस्थानकाजवळ रस्त्याची झालेली दुरवस्था अशा समस्यांच्या गर्दीत रस्ता सापडला असताना शासनाकडून कोणत्याच उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे दिसून येते. चार वर्षांपूर्वी सांगली-कोल्हापूर महामार्गाअंतर्गत तमदलगे बसवान खिंड ते अंकली रस्ता सुप्रीम कंपनीकडे वर्ग झाला होता. सध्या या मार्गावरील काम बंद आहे. जयसिंगपूर येथील रेल्वे स्थानकाजवळील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. जैनापूर येथे चौपदरीकरणांतर्गत कामच झालेले नाही. शिवाय निमशिरगावच्या शाळा स्थलांतराचा प्रश्नदेखील जैसे थेच आहे. रस्त्याचे काम सुरू असताना धुळीमुळे रस्त्याकडील शेतीपिकांना फटका बसून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ‘शासकीय काम सहा महिने थांब’ याप्रमाणे गेली चार वर्षे रस्त्याचे काम सुरू होते. अर्धवट रस्त्याचे काम झालेले असतानादेखील सुप्रीम कंपनीकडून टोलनाका सुरू करण्याची घाई झाल्यानंतर सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातून या टोलला मोठा विरोध झाला. सध्या सांगली-कोल्हापूर महामार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्यात आला असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे तूर्ततरी टोलनाका व अर्धवट राहिलेल्या रस्त्याचे काम ठप्प आहे. सुमारे ३४० कोटी रुपये या रस्त्याचे मूल्यांकन करण्यात आले आहे. ठेकेदार कंपनीकडून तमदलगे बसवान खिंड ते अंकली या मार्गावरील अर्धवट कामे झाली आहेत. अनेक समस्यांना या भागातील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, अंकली टोलनाक्यापासून तमदलगेकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर ९०० मीटर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. २९ लाख ५० हजार रुपयांचा निधी रस्ता डांबरीकरणासाठी मंजूर झाला आहे. सोमवारपासून ठेकेदाराने काम सुरू केले आहे. (प्रतिनिधी) टोलनाक्याजवळ रस्त्याचे काम ४सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंकली टोल नाका ते बायपास मार्गावरील ९०० मीटरचा रस्ता केला जात आहे. ४सुप्रीम कंपनीच्या आराखड्यात हा रस्ता नसल्यामुळे शिवाय रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्यामुळे २९ लाख रुपयांचा निधी या रस्त्यावर खर्च केला जात आहे. अभियान नावालाच एकीकडे शासनाकडून राज्यातील रस्ते चांगल्या दर्जाचे व खड्डेमुक्त करण्याचे धोरण राबविले जात आहे, तर दुसरीकडे गेल्या चार वर्षांपासून तमदलगे ते अंकली बायपास रस्त्यावर प्रश्नांची मालिका सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग सुप्रीम कंपनीकडे बोट दाखविते. यामुळे शासनाचे खड्डेमुक्त अभियान नावालाच अशी परिस्थिती आहे. मंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज जयसिंगपूर रेल्वेस्थानकाजवळील व चिपरी-जैनापूर रस्ता सुप्रीम कंपनी व बांधकाम विभागाच्या वादात अडकला आहे. अंदाजे ८०० मीटरच्या या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. दानोळी, कोथळी, कवठेसार, उमळवाड, जैनापूर या गावांतील नागरिकांना सोयीस्कर असणारा हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाल्यामुळे वाहतुकीस अडचणीचा ठरला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी याप्रश्नी लक्ष घालण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.