शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

सेवेचा ‘भाव’ मोजणाऱ्यांना लगाम

By admin | Updated: November 2, 2014 00:46 IST

कारवाईबाबत स्पष्टता हवी : नागरिकांना सेवा अधिकार कायद्याचे संरक्षण मिळण्याची आशा निर्माण

भारत चव्हाण ल्ल कोल्हापूर नवीन नेतृत्व, नवा जोश, नवीन संकल्पना या न्यायाने नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी ‘सेवा अधिकार कायदा’ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्या आणि कामाची टाळाटाळ करणाऱ्या सरकारीबाबूंना चाप बसेल, असा विश्वास व्यक्त करतानाच या कायद्यात कोणत्या कामाला किती कालावधी लागेल, तसेच निर्धारित वेळेत ते पूर्ण झाले नसल्यास संबंधितांवर कोणती कारवाई होणार, याची स्पष्टता झाली नाही, तर मात्र सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार नाही, अशी भीतीही व्यक्त केली जाते. असा कायदा अस्तित्वात आल्यानंतर सरकारीबाबूंच्या गळ्यातील ‘नकारघंटा’ काढून टाकण्याची जबाबदारी कायदा घेईल का, असा सवालही यानिमित्ताने पुढे आला आहे. नागरिकांना सेवा अधिकार कायद्याचे संरक्षण मिळण्याची आशा निर्माण झाल्यामुळे भ्रष्टाचारास पायबंद बसेल, कामे वेळेत होतील, शासकीय कार्यालयातील फेऱ्या व त्रास कमी होईल, शासनावरील जनतेचा विश्वास मजबूत होईल, वशिलेबाजीचे प्रमाण कमी होईल, अधिकाऱ्यांवरील नैतिक जबाबदारी वाढेल, लालफितीचा कारभार बंद होऊन प्रशासन कार्यक्षम होईल, अशा चांगल्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त झाल्या. परंतु शासकीय कर्र्मचारी, अधिकाऱ्यांची मानसिकता, त्यांच्यावरील कामांचा व्याप, भ्रष्टाचाराची अंगवळणी पडलेली सवय, कामे टाळण्याची मनोवृत्ती यांचा पूर्वानुभव असल्यामुळे कसलेही कायदे आणि नियम आणले तरी त्यांची काटेकोर अंमलबजावणी केल्याशिवाय त्याचा लाभ सामान्य नागरिकांना खऱ्या अर्थाने होणार नाही. नव्या मुख्यमंत्र्यांनी सेवा अधिकार कायदा आणण्याचा निर्णय घेतला असला तरी अशा स्वरूपाची नियमावली पूर्वीपासूनच शासकीय कार्यालयात अस्तित्वात आहे. त्याला कायद्याचे स्वरूप देण्यात येत आहे. नागरिकांची सनद (सिटिझन चार्टर) या नावाने सध्या शासकीय कार्यालयाचे नियम आहेत. प्रशासन लोकाभिमुख होण्यासाठी तसेच शासनाच्या दैनंदिन कामकाजात पारदर्शकता आणून शासकीय धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी नागरिकांची सनद तयार केली आहे. नागरिकांची कामे जलद व्हावीत, गैरसोय टाळली जावी, भ्रष्टाचाराला लगाम बसावा या हेतूने ही सनद तयार केली असली तरी तिला अधिकारी कर्मचाऱ्यांकडून हरताळ फासलेला आहे.