शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

सेवेचा ‘भाव’ मोजणाऱ्यांना लगाम

By admin | Updated: November 2, 2014 00:46 IST

कारवाईबाबत स्पष्टता हवी : नागरिकांना सेवा अधिकार कायद्याचे संरक्षण मिळण्याची आशा निर्माण

भारत चव्हाण ल्ल कोल्हापूर नवीन नेतृत्व, नवा जोश, नवीन संकल्पना या न्यायाने नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी ‘सेवा अधिकार कायदा’ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्या आणि कामाची टाळाटाळ करणाऱ्या सरकारीबाबूंना चाप बसेल, असा विश्वास व्यक्त करतानाच या कायद्यात कोणत्या कामाला किती कालावधी लागेल, तसेच निर्धारित वेळेत ते पूर्ण झाले नसल्यास संबंधितांवर कोणती कारवाई होणार, याची स्पष्टता झाली नाही, तर मात्र सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार नाही, अशी भीतीही व्यक्त केली जाते. असा कायदा अस्तित्वात आल्यानंतर सरकारीबाबूंच्या गळ्यातील ‘नकारघंटा’ काढून टाकण्याची जबाबदारी कायदा घेईल का, असा सवालही यानिमित्ताने पुढे आला आहे. नागरिकांना सेवा अधिकार कायद्याचे संरक्षण मिळण्याची आशा निर्माण झाल्यामुळे भ्रष्टाचारास पायबंद बसेल, कामे वेळेत होतील, शासकीय कार्यालयातील फेऱ्या व त्रास कमी होईल, शासनावरील जनतेचा विश्वास मजबूत होईल, वशिलेबाजीचे प्रमाण कमी होईल, अधिकाऱ्यांवरील नैतिक जबाबदारी वाढेल, लालफितीचा कारभार बंद होऊन प्रशासन कार्यक्षम होईल, अशा चांगल्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त झाल्या. परंतु शासकीय कर्र्मचारी, अधिकाऱ्यांची मानसिकता, त्यांच्यावरील कामांचा व्याप, भ्रष्टाचाराची अंगवळणी पडलेली सवय, कामे टाळण्याची मनोवृत्ती यांचा पूर्वानुभव असल्यामुळे कसलेही कायदे आणि नियम आणले तरी त्यांची काटेकोर अंमलबजावणी केल्याशिवाय त्याचा लाभ सामान्य नागरिकांना खऱ्या अर्थाने होणार नाही. नव्या मुख्यमंत्र्यांनी सेवा अधिकार कायदा आणण्याचा निर्णय घेतला असला तरी अशा स्वरूपाची नियमावली पूर्वीपासूनच शासकीय कार्यालयात अस्तित्वात आहे. त्याला कायद्याचे स्वरूप देण्यात येत आहे. नागरिकांची सनद (सिटिझन चार्टर) या नावाने सध्या शासकीय कार्यालयाचे नियम आहेत. प्रशासन लोकाभिमुख होण्यासाठी तसेच शासनाच्या दैनंदिन कामकाजात पारदर्शकता आणून शासकीय धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी नागरिकांची सनद तयार केली आहे. नागरिकांची कामे जलद व्हावीत, गैरसोय टाळली जावी, भ्रष्टाचाराला लगाम बसावा या हेतूने ही सनद तयार केली असली तरी तिला अधिकारी कर्मचाऱ्यांकडून हरताळ फासलेला आहे.