शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

जिल्ह्यातील सव्वादोन लाख ग्राहकांच्या घरात पुन्हा प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:26 IST

कोल्हापूर : महापुराच्या आपत्तीने खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणच्या यंत्रणेने अहाेरात्र काम करून अल्पावधीत पूर्ववत करण्यात यश मिळवले आहे. मंगळवारपर्यंत ...

कोल्हापूर : महापुराच्या आपत्तीने खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणच्या यंत्रणेने अहाेरात्र काम करून अल्पावधीत पूर्ववत करण्यात यश मिळवले आहे. मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील २ लाख २४ हजार ग्राहकांच्या घरात पुन्हा प्रकाश पडला आहे. पूरबाधित गावांपैकी २०६ गावांतील वीजपुरवठा सुरळीत झाला असून अजून १५ गावे पूर्णत: व ३७ अंशत: बाधित गावांतील वीजपुरवठा सुरू होऊ शकलेला नाही.

महापुरामुळे जिल्ह्यातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. जिवाची बाजी लावून कर्मचारी पुरवठा सुरळीत करण्याचे काम करीत आहेत. वीज नसल्याने गावगाड्याचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळावी, याकरिता पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरू करण्याबाबत प्राधान्य देण्याच्या सूचना अधीक्षक अभियंत्यांनी दिल्या होत्या. तसेच आवश्यक साधनसामग्री व मनुष्यबळाचाही पुरवठा केला होता. सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील ग्राहकांच्या भेटी घेऊन वीजपुरवठा सुरळीत होण्यातील अडचणी व नेमका किती कालावधी लागू शकतो, ही वस्तुस्थिती ग्राहकांना अवगत करावी, असे सूचित केले.

चौकट

कोल्हापूर जिल्ह्यातील चार उपकेंद्रे (गांधीनगर, थावडे, आवाडे मळा, शिरदवाड) बंद आहेत. अद्याप १५ गावे पूर्णत: व ३० गावे अंशत: तेथील ३७ हजार ६३० घरगुती, वाणिज्य, औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांच्या वीजपुरवठा सुरळीत होणे बाकी आहे. १०१ वीजवाहिन्या पूर्ववत केल्या असून सात वीजवाहिन्या बंद आहेत. २८६५ वितरण रोहित्रे पूर्ववत केली असून अजून ४२६ बंद आहेत. उच्चदाब वीजवाहिनीचे १३६ व लघुदाब वाहिनीचे २१० वीज खांब पडले आहेत. नागाळा पार्क, पाटपन्हाळा व शिरटी या उपकेंद्रांचा वीजपुरवठा पूर्वपदावर आला आहे.