शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

जिल्ह्यातील सव्वादोन लाख ग्राहकांच्या घरात पुन्हा प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:26 IST

कोल्हापूर : महापुराच्या आपत्तीने खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणच्या यंत्रणेने अहाेरात्र काम करून अल्पावधीत पूर्ववत करण्यात यश मिळवले आहे. मंगळवारपर्यंत ...

कोल्हापूर : महापुराच्या आपत्तीने खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणच्या यंत्रणेने अहाेरात्र काम करून अल्पावधीत पूर्ववत करण्यात यश मिळवले आहे. मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील २ लाख २४ हजार ग्राहकांच्या घरात पुन्हा प्रकाश पडला आहे. पूरबाधित गावांपैकी २०६ गावांतील वीजपुरवठा सुरळीत झाला असून अजून १५ गावे पूर्णत: व ३७ अंशत: बाधित गावांतील वीजपुरवठा सुरू होऊ शकलेला नाही.

महापुरामुळे जिल्ह्यातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. जिवाची बाजी लावून कर्मचारी पुरवठा सुरळीत करण्याचे काम करीत आहेत. वीज नसल्याने गावगाड्याचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळावी, याकरिता पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरू करण्याबाबत प्राधान्य देण्याच्या सूचना अधीक्षक अभियंत्यांनी दिल्या होत्या. तसेच आवश्यक साधनसामग्री व मनुष्यबळाचाही पुरवठा केला होता. सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील ग्राहकांच्या भेटी घेऊन वीजपुरवठा सुरळीत होण्यातील अडचणी व नेमका किती कालावधी लागू शकतो, ही वस्तुस्थिती ग्राहकांना अवगत करावी, असे सूचित केले.

चौकट

कोल्हापूर जिल्ह्यातील चार उपकेंद्रे (गांधीनगर, थावडे, आवाडे मळा, शिरदवाड) बंद आहेत. अद्याप १५ गावे पूर्णत: व ३० गावे अंशत: तेथील ३७ हजार ६३० घरगुती, वाणिज्य, औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांच्या वीजपुरवठा सुरळीत होणे बाकी आहे. १०१ वीजवाहिन्या पूर्ववत केल्या असून सात वीजवाहिन्या बंद आहेत. २८६५ वितरण रोहित्रे पूर्ववत केली असून अजून ४२६ बंद आहेत. उच्चदाब वीजवाहिनीचे १३६ व लघुदाब वाहिनीचे २१० वीज खांब पडले आहेत. नागाळा पार्क, पाटपन्हाळा व शिरटी या उपकेंद्रांचा वीजपुरवठा पूर्वपदावर आला आहे.