शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

जयंती नाल्यावर पुन्हा बांध

By admin | Updated: June 5, 2015 00:30 IST

आंदोलनाचा परिणाम : उंची कायमची वाढविण्याची मागणी

कोल्हापूर : आंदोलकांच्या धास्तीने जयंती नाल्यावरील बंधाऱ्याची उंची वाढविण्याचे महापालिका प्रशासनाने पुन्हा गुरुवारी जुजबी प्रयत्न केले. बंधाऱ्यावर खर-मातीची पोती भरून रचून नदीत जाणारे पाणी अडविण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला. पंधरा दिवसांपूर्वी असाच घातलेला तात्पुरता बांध हलक्या पावसाने वाहून गेला होता. जुजबी प्रयत्न करण्यापेक्षा बंधाऱ्याची उंची कायमची वाढविण्याबाबत ठोस निर्णय व्हावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींतून होत आहे.जयंती नाल्यातून मैला थेट नदीत सोडण्याचा प्रकार बुधवारी (दि. ३) उघड झाला होता. यानंतर आंदोलकांनी महापालिका प्रशासनास धारेवर धरले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही महापालिका प्रशासनाला नोटीस बजावून ठोस उपाय योजण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार महापालिकेने नाल्यावरील बंधाऱ्यावर पोती रचून ठेवून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला.कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने दोन महिन्यांत अनेक वेळा जयंती नाल्यातील सांडपाणी पंचगंगेत गेले. शहरात पडलेल्या हलक्याशा पावसानेही नाला नदीत मिसळत असल्याचे चित्र आहे. अवकाळी पावसाने जयंती नाला ‘ओव्हरफ्लो’ होऊन सांडपाणी प्रक्रियेविना नदीत मिसळल्याने नदीकाठच्या गावांचा आरोग्याचा धोका निर्माण होत असल्याची सद्य:स्थिती आहे. हलक्या पावसाचे मिसळणारे पाणी रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने तात्पुरती यंत्रणा उभारली आहे. मात्र, जयंती नाल्यावरील बंधाऱ्याची उंची वाढविण्याचा प्रस्ताव धूळ खात पडला आहे. कसबा बावड्यातील सांडपाणी केंद्रातून सध्या जयंती नाल्यातून उपसा होणाऱ्या ५० ते ६० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्यानेच नाला ओसंडून वाहत आहे. वीस वर्षांपूर्वीची लोकसंख्या व सांडपाणी अडवून धरण्याची क्षमता असलेल्या नाल्याची उंची कायमची वाढविण्याची मागणी होऊनही निव्वळ काही बांधकाम व्यावसायिकांचे हित सांभाळण्यासाठीच प्रशासन बंधाऱ्याची उंची वाढविण्याचा निर्णय प्रलंबित ठेवत असल्याचा आरोप प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी केला आहे. आठवड्यासाठी जुजबी उपाययोजनाआता बंधाऱ्याची उंची तात्पुरती वाढविल्याने हलक्या पावसाने किंवा वीजपुरवठा खंडित झाल्याने सांडपाणी नदीत मिसळण्याचा प्रकार बंद होईल. पावसाळा सुरू झाल्यानंतर १० जूनच्या दरम्यान बंधाऱ्याचे बरगे काढण्यात येणार आहेत. तोपर्यंत येत्या आठ दिवसांसाठी जुजबी उपाययोजना करून नदीप्रदूषण रोखण्याचे प्रयत्न करण्यासाठी महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू आहे.