शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

‘आर.सी.’ गँगला आणले ताळ्यावर

By admin | Updated: January 30, 2015 00:16 IST

पोलिसी खाक्या : हात जोडून मागितली माफी; दहाजणांची टोळी

कोल्हापूर : खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, आदी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ‘आर. सी.’ गँगच्या दहाजणांच्या टोळीला आज, गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पोलीस मुख्यालयात बोलावून घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी खाकीचा प्रसाद दाखवीत चांगलेच ताळ्यावर आणले. एरव्ही रुबाबात वावरणारे आरसी गँगचे संशयित रवी शिंदे, योगेश पाटील, रणजित कांबळे, प्रकाश कांबळे, संदीप गायकवाड, जावेद सय्यद, श्रीकांत तेलवेकर, आकाश कदम, साई लाखे, रमेश पाटील हे गुडघ्यावर बसून, हात जोडून ‘आम्ही पुन्हा गुन्हेगारी करणार नाही,’ अशी विनवणी यावेळी करीत होते. जवाहरनगर परिसरातील आरसी गँगच्या टोळीचा शहरात सुपारी घेऊन खून, खुनाचा प्रयत्न, लूटमार करणे, घरफोडीसारख्या गुन्ह्यांत सहभाग वाढू लागला आहे. टोळीवर्चस्व मोडीत काढण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी घेतला आहे. त्यानुसार त्यांनी राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांना आरसी गँगच्या सदस्यांना पोलीस मुख्यालयात घेऊन बोलाविले. देशमुख दहाजणांच्या टोळीला घेऊन मुख्यालयात आले. याठिकाणी डॉ. शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासमोर सर्वजण खाली माना घालून उभे होते. इतर वेळी बाहेर रुबाबात वावरणारे स्वयंघोषित गुंड याठिकाणी म्यॉँव झाले होते. ‘शहरात भाईगिरी चालणार नाही. पुन्हा एखाद्या गुन्ह्यात आढळून आलात तर कायमचे तुरुंगात पाठवीन,’ असा दम देत खाकीचा प्रसाद दिला. यावेळी गुडघ्यावर बसून, दोन्ही हात जोडून ‘आम्ही पुन्हा गुन्हेगारी करणार नाही,’ अशी विनवणी ते करू लागले. ‘ही शेवटची समज असून, सुधारा; अन्यथा गंभीर परिणाम होतील,’ असा इशारा डॉ. शर्मा यांनी या टोळीला दिला.आर.सी.गँग असा बनला...जवाहरनगर परिसरात राहुल चव्हाण याने दहशतीच्या जोरावर आपले या भागात वर्चस्व निर्माण केले होते. परिसरात कोणाचे वर्चस्वावरून २००७ ला राहुल चव्हाण याचा एका केश कर्तनालय दुकानामध्ये खून झाला. त्या वेळेपासून राहुल चव्हाण याच्या साथीदारांनी त्याचे नावे शहरात ‘आरसी’ गँगच्या नावाने दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या गँगचा दबदबा वाढत गेला. वेळोवेळी पोलीस प्रशासनाने या गँगच्या मुसक्या आवळल्या. पण, राहुल चव्हाणचा खुनाचा बदला घेण्यासाठी त्यांनी विरोधी गटाच्या प्रमुखावर दसरा चौक परिसरात प्राणघातक शस्त्राने हल्ला करून निर्घृण खून केला. त्यानंतर आर.सी.गँंगचा दबदबा वाढला. हळूहळू या गँगमध्ये फूट पडू लागली.कडक कारवाईची गरजआर.सी. गँगच्या गुंडांना याअगोदरही खाक्या दाखविला आहे. तरीही या टोळीतील तरुणांची गुन्हेगारी कृत्ये कांही थांबलेली नाहीत. कांहीजणांचा आता व्हॉईट कॉलर गुन्हेगारीकडेही प्रवास सुरू आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या या कारवाईमुळे या गुंडांना जरी चपराक बसली असली तरी या टोळीचा बिमोड करण्यासाठी आणखी कठोर कारवाईची गरज असल्याची प्रतिक्रिया या परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.