शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी शहर होणार ‘स्मार्ट सिटी’

By admin | Updated: April 1, 2015 00:00 IST

पनवेलचाही समावेश : पाच वर्षांत स्वयंपूर्ण होणार; राज्यातील १२ पालिकांचा समावेश

प्रकाश वराडकर - रत्नागिरी -‘स्मार्ट सिटी’ योजनेसाठी राज्यातील १२ नगरपालिकांची निवड झाली असून त्यात पनवेल व रत्नागिरी या कोकणातील दोन नगरपालिकांचा समावेश आहे. या योजनेच्या निकषात बसणाऱ्या राज्यातील १२ पालिकांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना मुंबई येथे पालिका प्रशासन संचालकांच्या दालनात योजनेबाबतचे मार्गदर्शन केले असून, येत्या पाच वर्षांत या १२ नगरपालिकांची शहरे सुविधांबाबत स्वयंपूर्ण बनविली जाणार आहेत. स्मार्ट सिटीसाठी काय निकष आहेत, ते पूर्ण करण्याबाबत व कोणत्या विकासाच्या योजना त्यातून साकार करता येतील याबाबतचे मार्गदर्शन संचालकांनी घेतलेल्या बैठकीत करण्यात आले. त्याचबरोबर नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांची त्यांच्या शहरांमधील संभाव्य विकासाबाबतची मतेही जाणून घेण्यात आली. रत्नागिरी शहराची लोकसंख्या ७७ हजार असून हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने दररोज बाहेरगावाहूून येथे नोकरी व शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांमुळे शहरात दररोज लाख ते सव्वा लाख लोकांचा भार पडतो. त्यासाठी सध्याच्या सर्वच मूलभूत सुविधांवर ताण पडत आहे. पाणी व्यवस्थेचे पूर्णत: नूतनीकरण करण्याची आवश्यकता आहे. रत्नागिरी शहरात मध्यमवर्गीयांची संख्या अधिक आहे. मच्छिमारी व आंबा, काजू बागायतीवर अर्थव्यवस्था असलेल्या या शहरातील व्यापारीपेठही मोठी आहे. कोकण रेल्वेमुळे हे शहर मुंबईशी काही तासांच्या अंतराने जोडले गेले आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायही मोठा आहे. शैक्षणिक सुविधांमध्येही रत्नागिरी आघाडीवर आहे.शहरातील भूूमिगत गटारे, वीजवाहिन्या भूमिगत उभारणे, पाण्याची परिपूर्ण सुविधा, वाहतूक, दळणवळणाबाबत सक्षमता आणणे, उद्योगांना चालना देऊन रोजगार निर्मिती करणे व सर्वच बाबतीत शहर स्वयंपूर्ण करण्याबाबतची योजना रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी मांडली आहे.निकषांची पूर्तता केल्यामुळेच निवडस्मार्ट सिटीसाठी घरफाळा व पाणीपट्टी करवसुली ही ९० टक्केवर असणे आवश्यक आहे. तसेच अन्य विकासकामे, सध्याच्या सुविधा याबाबतचे निकष पालिकेकडून पूर्ण होणे आवश्यक होते. या निकषात रत्नागिरी नगरपालिका बसत असल्याने निवड झाली आहे. स्मार्टसिटीअंतर्गत सुविधा भविष्यकालीन दृष्टिकोन समोर ठेवून आखणे, शहर सर्व सुविधांबाबत स्वयंपूर्ण करणे अशी ही योजना असून, त्यासाठी राज्य व केंद्र निधी देणार आहे.