शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
3
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
4
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
5
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
6
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
7
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
8
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
9
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
10
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
11
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...
12
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
13
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
14
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
15
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
16
रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये महिला रुग्णावर बलात्कार; गुंगीचं इंजेक्शन दिलं अन्...
17
कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
18
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
19
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
20
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले

रत्नागिरी शहर होणार ‘स्मार्ट सिटी’

By admin | Updated: April 1, 2015 00:00 IST

पनवेलचाही समावेश : पाच वर्षांत स्वयंपूर्ण होणार; राज्यातील १२ पालिकांचा समावेश

प्रकाश वराडकर - रत्नागिरी -‘स्मार्ट सिटी’ योजनेसाठी राज्यातील १२ नगरपालिकांची निवड झाली असून त्यात पनवेल व रत्नागिरी या कोकणातील दोन नगरपालिकांचा समावेश आहे. या योजनेच्या निकषात बसणाऱ्या राज्यातील १२ पालिकांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना मुंबई येथे पालिका प्रशासन संचालकांच्या दालनात योजनेबाबतचे मार्गदर्शन केले असून, येत्या पाच वर्षांत या १२ नगरपालिकांची शहरे सुविधांबाबत स्वयंपूर्ण बनविली जाणार आहेत. स्मार्ट सिटीसाठी काय निकष आहेत, ते पूर्ण करण्याबाबत व कोणत्या विकासाच्या योजना त्यातून साकार करता येतील याबाबतचे मार्गदर्शन संचालकांनी घेतलेल्या बैठकीत करण्यात आले. त्याचबरोबर नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांची त्यांच्या शहरांमधील संभाव्य विकासाबाबतची मतेही जाणून घेण्यात आली. रत्नागिरी शहराची लोकसंख्या ७७ हजार असून हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने दररोज बाहेरगावाहूून येथे नोकरी व शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांमुळे शहरात दररोज लाख ते सव्वा लाख लोकांचा भार पडतो. त्यासाठी सध्याच्या सर्वच मूलभूत सुविधांवर ताण पडत आहे. पाणी व्यवस्थेचे पूर्णत: नूतनीकरण करण्याची आवश्यकता आहे. रत्नागिरी शहरात मध्यमवर्गीयांची संख्या अधिक आहे. मच्छिमारी व आंबा, काजू बागायतीवर अर्थव्यवस्था असलेल्या या शहरातील व्यापारीपेठही मोठी आहे. कोकण रेल्वेमुळे हे शहर मुंबईशी काही तासांच्या अंतराने जोडले गेले आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायही मोठा आहे. शैक्षणिक सुविधांमध्येही रत्नागिरी आघाडीवर आहे.शहरातील भूूमिगत गटारे, वीजवाहिन्या भूमिगत उभारणे, पाण्याची परिपूर्ण सुविधा, वाहतूक, दळणवळणाबाबत सक्षमता आणणे, उद्योगांना चालना देऊन रोजगार निर्मिती करणे व सर्वच बाबतीत शहर स्वयंपूर्ण करण्याबाबतची योजना रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी मांडली आहे.निकषांची पूर्तता केल्यामुळेच निवडस्मार्ट सिटीसाठी घरफाळा व पाणीपट्टी करवसुली ही ९० टक्केवर असणे आवश्यक आहे. तसेच अन्य विकासकामे, सध्याच्या सुविधा याबाबतचे निकष पालिकेकडून पूर्ण होणे आवश्यक होते. या निकषात रत्नागिरी नगरपालिका बसत असल्याने निवड झाली आहे. स्मार्टसिटीअंतर्गत सुविधा भविष्यकालीन दृष्टिकोन समोर ठेवून आखणे, शहर सर्व सुविधांबाबत स्वयंपूर्ण करणे अशी ही योजना असून, त्यासाठी राज्य व केंद्र निधी देणार आहे.