शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांच्या बरोबरीने दर देणार

By admin | Updated: November 9, 2016 00:57 IST

गणपतराव पाटील : शिरोळच्या दत्त साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला प्रारंभ

शिरोळ : चालू गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाला शासनाच्या एफआरपीप्रमाणे २५३७ ही एकरकमी विनाकपात रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. एफआरपी अधिक प्रतिटन १७५ हा झालेला निर्णयही शासनाच्या आदेशाप्रमाणे शेतकऱ्यांना तत्काळ देण्यात येईल. शेतकरी व कामगारांचे हित डोळ्यासमोर ठेवून कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होत आहे, असे प्रतिपादन दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले. शिरोळ दत्त साखर कारखान्याचा ४५ वा ऊस गाळप प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला. यावेळी अध्यक्ष पाटील बोलत होते. प्रारंभी शहीद जवान राजेंद्र तुपारे व नितीन कोळी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संचालक अनिल यादव, श्रेणिक पाटील, अरुणकुमार देसाई, रणजित कदम यांच्या हस्ते काटापूजन झाले. अध्यक्ष पाटील म्हणाले, मागील गळीत हंगामात सभासदांनी दाखविलेल्या प्रचंड विश्वासावर आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने यशस्वीरीत्या हंगाम पार पाडला. यावर्षी पावसाने उशिरा सुरुवात केल्याने उसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तसेच यावर्षीचे ११ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व सभासद शेतकऱ्यांनी कारखान्याची विश्वासार्हता पाहून आपला संपूर्ण ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कारखान्याचे उपाध्यक्ष सिदगोंडा पाटील, जयरामबापू पाटील, बंडा माने, राजू पाटील-टाकवडेकर, सर्जेराव शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली. स्वागत कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी केले. प्रास्ताविक रावसाहेब भोसले यांनी केले.यावेळी शेखर पाटील, इंद्रजित पाटील, रघुनाथ पाटील, प्रमोद पाटील, अण्णासो पवार, विजय सुर्यवंशी, विनया घोरपडे, यशोदा कोळी, संगीता पाटील, महेंद्र बागे, बाबूराव पाटील, सचिव बी. बी. शिंदे, नाना कदम, विश्वजित शिंदे, श्रीशैल्य हेगाण्णा, धोंडिराम दबडे पदाधिकारी, संचालक, कामगार उपस्थित होते. युसुफ मेस्त्री यांनी आभार मानले. दत्त कारखान्याकडून सेंद्रिय शेतीचा प्रयोगदत्त कारखान्याच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर पाच सभासदांच्या ऊसक्षेत्रावर सेंद्रिय शेतीचा प्रयोग हाती घेतला असून शेतकऱ्यांच्या वाढत्या मागणीनुसार या उत्पादनाला चांगला दर मिळणार आहे. तसेच सेंद्रिय शेती केल्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होऊन शेतीतून उत्पन्न जादा मिळणार आहे. शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळावा यासाठी कारखान्याकडून एक पाऊल पुढे येऊन हा कार्यक्रम राबविला जात आहे. शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याच्या ४५ व्या गळीत ऊस गाळपाचा प्रारंभ दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्याहस्ते झाला. यावेळी एम. व्ही. पाटील, युसुफ मेस्त्री, रणजित कदम, इंद्रजित पाटील, सिदगोंडा पाटील, अनिल यादव, सत्येंद्रराजे निंबाळकर, सर्जेराव शिंदे यांच्यासह संचालक, सभासद उपस्थित होते.