शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

रविकिरण पेपर मिलच्या कामगारांचे रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:26 IST

चंदगड : हलकर्णी औधोगिक वसाहतीमध्ये सूरू असलेल्या रविकिरण पेपर मिलमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कामगारांचा संप सुरू आहे. ...

चंदगड : हलकर्णी औधोगिक वसाहतीमध्ये सूरू असलेल्या रविकिरण पेपर मिलमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कामगारांचा संप सुरू आहे. दरम्यान, आज पाटणेफाटा येथे बेळगाव-वेंगुर्ला राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे दोन तास रस्ता रोखल्यामुळे वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.

गेल्या सहा महिन्यांपासून गांधीगिरी पद्धतीने रविकिरण पेपर मिलच्या कामगारांनी आंदोलन आणि अलीकडे उपोषणाला प्रारंभ केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत कामगारांचा प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन यावेळी पो. नि. बी. ए. तळेकर यांनी दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. रविकिरण पेपर मिलचे जवळपास ६५ कामगार सर्व श्रमिक संघाच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. कंपनीने त्यांची दखल घेतली नाही. कायम कामगारांना कंत्राटी करणे, शासकीय नियमाने देय असलेला महागाई भत्ता न देणे, शासकीय आदेश न पाळणे, बिहारमधून आलेल्या स्थलांतरित कामगारांना घेऊन काम करणे आदी प्रकारचे अन्याय कंपनी करत आहे. अखेर आनंद गणपती पारशे व सोमनाथ गोविंद गावडे पार्ले यांनी सर्व कामगारांच्या वतीने आमरण उपोषण सुरू केले. तालुक्यातील कोणत्याच राजकीय तसेच प्रशासन अधिकाऱ्यांना कंपनीने दाद दिली नाही.

यावेळी बोलताना माजी मंत्री भरमूआण्णा म्हणाले, संप आठ दिवसांत मिटला नाही तर, चंदगड तालुक्याशी गाठ आहे. हा प्रश्न सन्मानाने सोडवावा. अन्यथा मुजोरांना कायमचा धडा शिकवावा लागेल, असा गर्भित इशारा दिला. कामगार संघटनेचे नेते कॉ. अतुल दिघे म्हणाले, स्थानिक भूमिपुत्रांना ८० टक्के रोजगार दिला पाहिजे असा कायदा असताना मालक मानत नाहीत, त्यांची घमेंड उतरावी लागेल. वकील संतोष मळवीकर म्हणाले, एव्हीएचची पुनरावृत्ती करू देऊ नका, आमचा अंत पाहू नका. अन्यथा कृती करून दाखवावी लागेल. प्रा. एन. एस. पाटील, विष्णू गावडे, सुभाष देसाई यांची भाषणे झाली.विलास पाटील, ॲड संतोष मळवीकर तानाजी गडकरी, रुद्राप्पा तेली, जानबा चौगुले, अमित वरपे, पांडुरंग बेनके, सुभाष देसाई, विष्णू कार्वेकर, प्रताप डसके,मनोज रावराणे, विष्णू गावडे आदी उपस्थित होते.

चौकट :

उपोषण करून आम्हीच आमचा बळी ठरू

गांधीगिरी पद्धतीने यापुढे उपोषण बंद, आता तोडफोडीची लढाई करावी लागेल. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा खरा दोषी असतो. त्यामुळे उपोषण बंद करून उपोषणकर्त्यांना लिंबू-पाणी देऊन उपोषण अस्त्र बंद करण्यात आले.

फोटो ओळी: --

पाटणे फाटा : रविकिरण पेपर मिलच्या कामगारांना पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षिय नेते व नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनात बोलताना माजी मंत्री भरमूअण्णा पाटील