शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपचा बुरखा कन्हैयाकुमारने फाडला

By admin | Updated: March 14, 2016 00:42 IST

प्रकाशन सोहळ्यातील सूर : ‘काय म्हणाला कन्हैयाकुमार’ पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर : देशद्रोहाच्या गुन्ह्यात अडकविलेल्या कन्हैयाकुमारने जामिनावर सुटल्यानंतर केलेल्या भाषणातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आर.एस.एस.) व भाजप यांच्या धर्मांधतेचा बुरखा फाडून त्यांचा खरा चेहरा उघड केला, असा सूर रविवारी निघाला. निमित्त होते ‘लोकमत’चे मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी अनुवादित केलेले ‘काय म्हणाला कन्हैयाकुमार’ या पुस्तक प्रकाशनाचे. येथील शाहू स्मारक भवनात श्रमिक प्रतिष्ठानच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे माजी राज्य सचिव सुशील लाड यांची प्रमुख उपस्थिती होती. कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते मिलिंद यादव अध्यक्षस्थानी होते. केंद्र शासनाने दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी प्रतिनिधी कन्हैयाकुमारवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर देशात ‘देशद्रोही विरुद्ध देशभक्त’ अशी चर्चा सुरू झाली. दरम्यान, कारागृहातून जामिनावर सुटल्यानंतर ‘जेएनयू’च्या आवारातील सभेत त्याने भाषण केले. भाषणात संघ, भाजप, मोदी यांच्या कार्यपद्धतीवर त्याने सडकून टीका केली. वास्तवतेवर आधारित त्याने केलेले भाषण देशभर गाजले. ते भाषण सामान्य लोकांपर्यंत जावे यासाठी ‘लोकमत’चे मुख्य बातमीदार पाटील यांनी ‘काय म्हणाला कन्हैयाकुमार’ या नावाने अनुवादित पुस्तक लिहिले. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात लाड म्हणाले, ‘जेएनयू’वर कम्युनिस्टांचा अनेक वर्षांपासून प्रभाव आहे. येथे वेगळा विचार करणारे विद्यार्थी निर्माण होऊ नये, म्हणून मोदी शासन जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे. संघ, भाजपने नियोजनबद्ध कट करून कन्हैयाकुमारला देशद्रोहाच्या गुन्ह्यात अडकविले आहे. भाजप ‘जेएनयू’लाच बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. कन्हैयाकुमारने मोदी सरकारच्या धर्मांध, भांडवलशाही, विघातक प्रवृत्तीची चिरफाड केली आहे. यादव म्हणाले, काँग्रेस, भाजप ही दोन्ही सरकारे एकाच प्रवृत्तीची आहेत. सामान्य माणसाला भाकरीची भ्रांत आहे; त्यामुळे सरकारविरोधी धोरणाविरोधात आवाज कमी पडतो आहे. कन्हैयाकुमारने संघ, भाजपच्या कुटील नीतीचा पोलखोल केला आहे.ज्योती भालकर यांनी स्वागत केले. प्रा. विलास रणसुभे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उमा व मेघा पानसरे, उदय नारकर, आदींसह श्रोत्यांची गर्दी होती. चिंतामणी मगदूम यांनी आभार मानले.'जेएनयू' प्राध्यापकाचे मोबाईलवरुन भाषणकन्हैयाकुमार यांच्यासोबत काम करणारे प्रा. दिनेश वार्सने यांनी प्रा. रणसुभे यांच्या मोबाईलवर कार्यक्रम सुरू असतानाच संपर्क साधला. मोबाईलच्या स्पीकरवरून प्रा. वार्सने यांनी कन्हैयाकुमारला देशद्रोहाच्या गुन्ह्णात कसे अडकवले आहे, याची माहिती देऊन यामागे संघ, भाजप असल्याचे सांगितले.