शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

रंकाळ्याचे ‘शुद्धि’करण

By admin | Updated: June 15, 2015 00:42 IST

पहिल्या टप्प्यात खण स्वच्छ : विकासाआड राजकारण नको : पालकमंत्री

डॉ. कुमुद गोसावी - पहाटवाऱ्याचा हळुवार स्पर्श होताच, गोड गुलाबी स्वप्नाचं झुंबर हलताच पापण्यांची पाखरं फडफडली! नि डोळ्यांची दारं उघडली. ‘स्वप्न की वास्तव? नेमकं कोणतं स्वीकारावं?’ या द्वंद्वातच सनईचे मंजूळ स्वर साद घालून गेले! तरीही ते नेमके स्वप्नातील नसतील कशावरून? या समजुतीनं डोळ्यांची कवाडं नुसती पुनश्च किलकिलतच राहिली! हीच तर मनाची द्विधावस्था! बहिणाबाई चौधरींनी मनाला ‘वढाय, वढाय’ का म्हटलंय हे ध्यानी येतं. अर्जुनासारख्या धुरंधर धनुर्धराची, संत-महंतांची, ऋषीमुनींची या द्विधेनं पाठ सोडली नाही तिथं सामान्यांची काय कथा?‘तुज सगुण म्हणु की निर्गुण रे।’सगुण-निर्गुणाच्या द्वैतातून परमेश्वर रूपाचा शोध घेत-घेतच संतांनी अखेर ‘सगुण-निर्गुण अंती एकचि रे।’ असा अद्वैतभाव दिला. देव पाहावया गेलो। देव होऊनची ठेलो। असं अद्वैत अनुभूतीनं स्पष्ट होतं! सामान्यांनाही या अवस्थेनं प्रारंभी चिंतेच्या भोवऱ्यात अडकवलं असलं, तरी सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवण्याचं बळ त्यांना दिलं. पुष्कळ वेळा लहान मुलांची रस्ता ओलांडताना जशी द्विधावस्था होते तशी आयुष्यातील अनेक वाटा पार करताना मोठ्या माणसांचीही होते!सध्याच्या धकाधकीच्या व्यस्त जीवनात आपली द्विधावस्था अनेकवार होते. सुखात सर्व साथी मात्र ज्यावेळी वळवाच्या पावसासारखं एखादं संकट कोसळतं त्यावेळी नेमकं कोण आपलं नि कोण परकं? हे कळतं. प्रत्येक जण स्वत:च्या कोशातच राहण्यात उत्सुक असेल तर दुसऱ्यांच्या सुख-दु:खाची दखल कोण घेणार? बालपणातील निरागस बागडणं, यौवनातील काव्य आस्वादणं वा आयुष्याची सांजवात लावताना समईच्या मंद प्रकाशात आयुष्याकडं मागं वळून पाहणं या साऱ्या अनुभूतीचं आपल्या मनातील द्विधावस्थेशी एक अनामिक नातं असतं. आपल्या जीवनातील कितीतरी ओव्यांना नि अभंगांना या द्विधावस्थेनं घडवलं आहे! कधी रडवलंय तर कधी एखाद्या जीवनदर्शी संदेशानं मढवलंयदेखील. सदाचाराच्या संजीवक स्पर्शानं आपण द्विधावस्थेतून बाहेर येतो, शांत प्रसन्न मनात जाईजुईच्या उमलत्या कळ्यातील गंध घेतो तसा मुक्त मनानं जीवनाचा आनंद लुटतो. वामन अवतारात भगवंतानं बळीराजाला ‘त्रिपाद भूमी’चं दान मागितलं तेव्हा त्यांचे गुरू शुक्राचार्य म्हणाले, ‘हे दान देऊ नकोस! पस्तावशील!’ तेव्हा क्षणभर बळीराजाची द्विधावस्था झाली! परंतु दुसऱ्याच क्षणी बळीराजानं गुरुआज्ञेहूनही दिलेलं वचन श्रेष्ठ मानलं नि दैत्यराज बलीनं आपलं सर्वस्व (वामन रूपानं आलेल्या) भगवान विष्णूच्या चरणी अर्पण केलं! म्हणजे माणसाची सद्सद्विवेकबुद्धी जागृत असेल तर द्विधावस्थेतून बाहेर येता येतं! हे सिद्ध होतं!