शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
4
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
5
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
6
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
7
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
8
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
9
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
10
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
11
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
12
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
13
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
14
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
15
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
16
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
17
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
18
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
19
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
20
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक

रंकाळ्याचे ‘शुद्धि’करण

By admin | Updated: June 15, 2015 00:42 IST

पहिल्या टप्प्यात खण स्वच्छ : विकासाआड राजकारण नको : पालकमंत्री

डॉ. कुमुद गोसावी - पहाटवाऱ्याचा हळुवार स्पर्श होताच, गोड गुलाबी स्वप्नाचं झुंबर हलताच पापण्यांची पाखरं फडफडली! नि डोळ्यांची दारं उघडली. ‘स्वप्न की वास्तव? नेमकं कोणतं स्वीकारावं?’ या द्वंद्वातच सनईचे मंजूळ स्वर साद घालून गेले! तरीही ते नेमके स्वप्नातील नसतील कशावरून? या समजुतीनं डोळ्यांची कवाडं नुसती पुनश्च किलकिलतच राहिली! हीच तर मनाची द्विधावस्था! बहिणाबाई चौधरींनी मनाला ‘वढाय, वढाय’ का म्हटलंय हे ध्यानी येतं. अर्जुनासारख्या धुरंधर धनुर्धराची, संत-महंतांची, ऋषीमुनींची या द्विधेनं पाठ सोडली नाही तिथं सामान्यांची काय कथा?‘तुज सगुण म्हणु की निर्गुण रे।’सगुण-निर्गुणाच्या द्वैतातून परमेश्वर रूपाचा शोध घेत-घेतच संतांनी अखेर ‘सगुण-निर्गुण अंती एकचि रे।’ असा अद्वैतभाव दिला. देव पाहावया गेलो। देव होऊनची ठेलो। असं अद्वैत अनुभूतीनं स्पष्ट होतं! सामान्यांनाही या अवस्थेनं प्रारंभी चिंतेच्या भोवऱ्यात अडकवलं असलं, तरी सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवण्याचं बळ त्यांना दिलं. पुष्कळ वेळा लहान मुलांची रस्ता ओलांडताना जशी द्विधावस्था होते तशी आयुष्यातील अनेक वाटा पार करताना मोठ्या माणसांचीही होते!सध्याच्या धकाधकीच्या व्यस्त जीवनात आपली द्विधावस्था अनेकवार होते. सुखात सर्व साथी मात्र ज्यावेळी वळवाच्या पावसासारखं एखादं संकट कोसळतं त्यावेळी नेमकं कोण आपलं नि कोण परकं? हे कळतं. प्रत्येक जण स्वत:च्या कोशातच राहण्यात उत्सुक असेल तर दुसऱ्यांच्या सुख-दु:खाची दखल कोण घेणार? बालपणातील निरागस बागडणं, यौवनातील काव्य आस्वादणं वा आयुष्याची सांजवात लावताना समईच्या मंद प्रकाशात आयुष्याकडं मागं वळून पाहणं या साऱ्या अनुभूतीचं आपल्या मनातील द्विधावस्थेशी एक अनामिक नातं असतं. आपल्या जीवनातील कितीतरी ओव्यांना नि अभंगांना या द्विधावस्थेनं घडवलं आहे! कधी रडवलंय तर कधी एखाद्या जीवनदर्शी संदेशानं मढवलंयदेखील. सदाचाराच्या संजीवक स्पर्शानं आपण द्विधावस्थेतून बाहेर येतो, शांत प्रसन्न मनात जाईजुईच्या उमलत्या कळ्यातील गंध घेतो तसा मुक्त मनानं जीवनाचा आनंद लुटतो. वामन अवतारात भगवंतानं बळीराजाला ‘त्रिपाद भूमी’चं दान मागितलं तेव्हा त्यांचे गुरू शुक्राचार्य म्हणाले, ‘हे दान देऊ नकोस! पस्तावशील!’ तेव्हा क्षणभर बळीराजाची द्विधावस्था झाली! परंतु दुसऱ्याच क्षणी बळीराजानं गुरुआज्ञेहूनही दिलेलं वचन श्रेष्ठ मानलं नि दैत्यराज बलीनं आपलं सर्वस्व (वामन रूपानं आलेल्या) भगवान विष्णूच्या चरणी अर्पण केलं! म्हणजे माणसाची सद्सद्विवेकबुद्धी जागृत असेल तर द्विधावस्थेतून बाहेर येता येतं! हे सिद्ध होतं!