शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

रंकाळ्याचे ‘शुद्धि’करण

By admin | Updated: June 15, 2015 00:42 IST

पहिल्या टप्प्यात खण स्वच्छ : विकासाआड राजकारण नको : पालकमंत्री

कोल्हापूर : रंकाळा तलाव प्रदूषणमुक्त करण्याच्या प्रक्रियेचे तंत्र यशस्वी झाल्यास, या प्र्रकल्पाला आर्थिक चणचण भासणार नाही. जिल्ह्यात बुद्धिवाद्यांची कमी नाही, त्यांनी अशा प्रकल्पांची संकल्पना घेऊन पुढे यावे. प्रकल्पांच्या आड राजकारण येऊन त्यांचे मातेरे होणार नाही, याची काळजी घेऊ, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी रंकाळा तलाव प्रदूषणमुक्त प्रक्रिया तंत्रकार्याच्या उद्घाटनप्रसंगी दिली. यावेळी रसायन तंत्रज्ञान संस्थेचे (मुंबई) कुलगुरू डॉ. जी. डी. यादव, प्रक्रियेचे तंत्र विकसित करणारे प्राध्यापक डॉ. अनिरुद्ध पंडित, आयुक्त पी. शिवशंकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, कोल्हापूरचे चित्र पालटण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यासाठी दर तीन महिन्यांनी शहरातील स्वयंसेवी संस्थांची बैठक घेणार आहोत. शहराच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण कल्पना राबविण्यासाठी आवाहन करून आर्थिकदृष्ट्याही पाठबळ देणार आहोत. कोल्हापूरकरांच्या मनात या तंत्राने यशस्विता सिद्ध केली तर या प्रकल्पासाठी लागणारा पैसा उभा राहण्यास अडचण येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. रसायन विज्ञान संस्थेची माहिती देताना कुलगुरू डॉ. जी. डी. यादव म्हणाले, ही संस्था सध्या जगातील चौथ्या क्रमांकाची आहे. संस्थेने आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव सिद्ध केले आहे. संस्थेची गुणवत्ता आय.आय.टी.पेक्षा चांगली असून, तिच्याकडे ३१० पेटंटस् आहेत. संस्थेचे नाणे खणखणीत असून, रंकाळा तलाव प्रदूषणमुक्त प्रक्रिया तंत्रही आपली उपयोगीता सिद्ध करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्राध्यापक डॉ. अनिरुद्ध पंडित यांनी प्रकल्पाची तांत्रिक बाबींची माहिती दिली. आरती ड्रग्जचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रकाश पाटील यांनी या प्रकल्पासाठी २५ लाख रुपयांची मदत केल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे चिटणीस प्रसाद मंत्री यांनी स्वागत केले. प्राध्यापक अमर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. रसायन तंत्रज्ञान संस्थेचे अधिकारी तसेच महानगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी) दादांचा कानमंत्र दररोज भेटणाऱ्या लोकांपैकी ९० टक्के लोक हे बदली व बढतीच्या कामासाठीच भेटतात. बदली व बढतीच्या मागे लागलेले लोक शासकीय सेवेच्या माध्यमातून जनहिताची कामे कशी करणार? बदली व बढतीचा विचार न करता अधिकाऱ्यांनी कामांकडे अधिक लक्ष देणे योग्य राहील. तसेच महापालिके चा प्रशासकीय कामांचा बोजवारा उडाला आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांनी याकडे जातीनिशी लक्ष द्यावे, अशी सूचना पालकमंत्री पाटील यांनी केली.