शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
3
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
4
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
5
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
6
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
7
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
8
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
9
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
10
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
11
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
12
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
13
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
14
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
15
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
16
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
17
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
18
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
19
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
20
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 

रंकाळ्याचे ‘शुद्धि’करण

By admin | Updated: June 15, 2015 00:42 IST

पहिल्या टप्प्यात खण स्वच्छ : विकासाआड राजकारण नको : पालकमंत्री

कोल्हापूर : रंकाळा तलाव प्रदूषणमुक्त करण्याच्या प्रक्रियेचे तंत्र यशस्वी झाल्यास, या प्र्रकल्पाला आर्थिक चणचण भासणार नाही. जिल्ह्यात बुद्धिवाद्यांची कमी नाही, त्यांनी अशा प्रकल्पांची संकल्पना घेऊन पुढे यावे. प्रकल्पांच्या आड राजकारण येऊन त्यांचे मातेरे होणार नाही, याची काळजी घेऊ, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी रंकाळा तलाव प्रदूषणमुक्त प्रक्रिया तंत्रकार्याच्या उद्घाटनप्रसंगी दिली. यावेळी रसायन तंत्रज्ञान संस्थेचे (मुंबई) कुलगुरू डॉ. जी. डी. यादव, प्रक्रियेचे तंत्र विकसित करणारे प्राध्यापक डॉ. अनिरुद्ध पंडित, आयुक्त पी. शिवशंकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, कोल्हापूरचे चित्र पालटण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यासाठी दर तीन महिन्यांनी शहरातील स्वयंसेवी संस्थांची बैठक घेणार आहोत. शहराच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण कल्पना राबविण्यासाठी आवाहन करून आर्थिकदृष्ट्याही पाठबळ देणार आहोत. कोल्हापूरकरांच्या मनात या तंत्राने यशस्विता सिद्ध केली तर या प्रकल्पासाठी लागणारा पैसा उभा राहण्यास अडचण येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. रसायन विज्ञान संस्थेची माहिती देताना कुलगुरू डॉ. जी. डी. यादव म्हणाले, ही संस्था सध्या जगातील चौथ्या क्रमांकाची आहे. संस्थेने आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव सिद्ध केले आहे. संस्थेची गुणवत्ता आय.आय.टी.पेक्षा चांगली असून, तिच्याकडे ३१० पेटंटस् आहेत. संस्थेचे नाणे खणखणीत असून, रंकाळा तलाव प्रदूषणमुक्त प्रक्रिया तंत्रही आपली उपयोगीता सिद्ध करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्राध्यापक डॉ. अनिरुद्ध पंडित यांनी प्रकल्पाची तांत्रिक बाबींची माहिती दिली. आरती ड्रग्जचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रकाश पाटील यांनी या प्रकल्पासाठी २५ लाख रुपयांची मदत केल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे चिटणीस प्रसाद मंत्री यांनी स्वागत केले. प्राध्यापक अमर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. रसायन तंत्रज्ञान संस्थेचे अधिकारी तसेच महानगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी) दादांचा कानमंत्र दररोज भेटणाऱ्या लोकांपैकी ९० टक्के लोक हे बदली व बढतीच्या कामासाठीच भेटतात. बदली व बढतीच्या मागे लागलेले लोक शासकीय सेवेच्या माध्यमातून जनहिताची कामे कशी करणार? बदली व बढतीचा विचार न करता अधिकाऱ्यांनी कामांकडे अधिक लक्ष देणे योग्य राहील. तसेच महापालिके चा प्रशासकीय कामांचा बोजवारा उडाला आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांनी याकडे जातीनिशी लक्ष द्यावे, अशी सूचना पालकमंत्री पाटील यांनी केली.