शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
3
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
4
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
5
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
6
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
7
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
8
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
9
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
10
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
11
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
12
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
13
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
15
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
16
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
17
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
18
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
19
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
20
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती

रंकाळा तटबंदीचे काम संथ

By admin | Updated: April 28, 2015 00:55 IST

पावसाळ्यापूर्वी कामाचे आव्हान : किमान पातळीपर्यंत भिंतीचे काम होईल : प्रशासन

कोल्हापूर : शहराचे भूषण आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या रंकाळा तलावाची संरक्षक भिंत गेल्या वर्षभरात चार वेळा कोसळली. यानंतर पर्यावरणप्रेमींसह शहरवासीयांनी रोष व्यक्त करताच पश्चिमेकडील ही पडकी ९२ मीटरची भिंत काढून त्या जागी नवीन भिंत बांधण्याचे काम सुरू झाले. मात्र, कासवगतीने सुरू असलेले काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यास रंकाळ्याच्या दुखण्यात आणखी भर पडणार आहे. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी पाण्याच्या किमान पातळीपर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे कार्यकारी अभियंता एस. के. माने यांनी ‘लोकमत’ला सांगितले.शालिनी पॅलेसच्या बाजूला असलेली रंकाळ्याची तटबंटी ठिसूळ झाल्याने दर दोन-तीन महिन्यांनी कोसळत होती. दगड एकमेकांपासून सुटू लागल्याने संपूर्ण तटबंदीलाच जलसमाधी मिळण्याचा धोका निर्माण झाला. पर्यटक दररोज मोठ्या संख्येने रंकाळ्याकडे उद्यानात फिरायला येतात. तटबंदीच्या बाजूने पर्यटक फिरत असतात. अशा धोकादायक तटबंदीवर लोक बसलेलेही असतात. त्यामुळे पर्यटकांच्या वर्दळीवेळी जर तलावाच्या तटबंदीचा भाग कोसळला, तर मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे. ही तटबंदी उतरवून घ्या, पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करा, असा तगादा नगरसेवकांसह रंकाळाप्रेमींनी प्रशासनाकडे लावला. यानंतर सर्व परिसराची कोल्हापूर इंजिनिअरिंग व आर्किटेक्ट असोसिएशनच्या पथकाने पाहणी केली. ९० मीटरची तटबंदी तत्काळ उतरवून घेऊन भक्कम कॉँक्रीटची भिंत बांधण्याचा सल्ला दिला होता. पावसाळ्यापूर्वी भिंतीचे काम पूर्ण न केल्यास रंकाळ्यातील पाणी बाहेर पडण्याचा धोका सभागृहात सदस्यांनी व्यक्त केला. रंकाळ्याबाबत प्रशासन उदासीन असल्याची टीका झाल्यानंतर अल्पकाळाची निविदा प्रसिद्ध करीत बी. के. पाटील कन्स्ट्रक्शन यांना भिंत बांधण्याचा ठेका देण्यात आला. गेल्या पंधरा दिवसांपासून भिंतीचे कामही सुरू झाले. ९० लाख रुपये खर्चून ९२ मीटर भिंत बांधण्यात येणार आहे. नव्या भिंतीची उंची साडेपाच मीटर आहे, तर रुंदी किमान सहा फूट असणार आहे. मात्र, हे काम कासवगतीने सुरू असून पावसाळ्यात रंकाळ्याचे पाणी पश्चिमेकडील भुसभुशीत जमिनीला अडून झाडे व जमिनीच्या भागास मोठ्या प्रमाणात जलसमाधी मिळण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)रंकाळ्याच्या पश्चिमेकडील भिंतीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा मानस आहे. सध्या फाउंडेशनचे काम सुरू आहे. कॉँक्रीटचा टप्पा झाल्यानंतर दगडी बांधकाम सुरू होईल. पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत पाण्याच्या किमान पातळीपर्यंत काम होईल. यानंतर अंतिम टप्प्यातील काम पावसातही करता येणे शक्य आहे. - एस. के. माने, कार्यकारी अभियंता