शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

रंकाळा तटबंदीचे काम संथ

By admin | Updated: April 28, 2015 00:55 IST

पावसाळ्यापूर्वी कामाचे आव्हान : किमान पातळीपर्यंत भिंतीचे काम होईल : प्रशासन

कोल्हापूर : शहराचे भूषण आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या रंकाळा तलावाची संरक्षक भिंत गेल्या वर्षभरात चार वेळा कोसळली. यानंतर पर्यावरणप्रेमींसह शहरवासीयांनी रोष व्यक्त करताच पश्चिमेकडील ही पडकी ९२ मीटरची भिंत काढून त्या जागी नवीन भिंत बांधण्याचे काम सुरू झाले. मात्र, कासवगतीने सुरू असलेले काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यास रंकाळ्याच्या दुखण्यात आणखी भर पडणार आहे. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी पाण्याच्या किमान पातळीपर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे कार्यकारी अभियंता एस. के. माने यांनी ‘लोकमत’ला सांगितले.शालिनी पॅलेसच्या बाजूला असलेली रंकाळ्याची तटबंटी ठिसूळ झाल्याने दर दोन-तीन महिन्यांनी कोसळत होती. दगड एकमेकांपासून सुटू लागल्याने संपूर्ण तटबंदीलाच जलसमाधी मिळण्याचा धोका निर्माण झाला. पर्यटक दररोज मोठ्या संख्येने रंकाळ्याकडे उद्यानात फिरायला येतात. तटबंदीच्या बाजूने पर्यटक फिरत असतात. अशा धोकादायक तटबंदीवर लोक बसलेलेही असतात. त्यामुळे पर्यटकांच्या वर्दळीवेळी जर तलावाच्या तटबंदीचा भाग कोसळला, तर मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे. ही तटबंदी उतरवून घ्या, पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करा, असा तगादा नगरसेवकांसह रंकाळाप्रेमींनी प्रशासनाकडे लावला. यानंतर सर्व परिसराची कोल्हापूर इंजिनिअरिंग व आर्किटेक्ट असोसिएशनच्या पथकाने पाहणी केली. ९० मीटरची तटबंदी तत्काळ उतरवून घेऊन भक्कम कॉँक्रीटची भिंत बांधण्याचा सल्ला दिला होता. पावसाळ्यापूर्वी भिंतीचे काम पूर्ण न केल्यास रंकाळ्यातील पाणी बाहेर पडण्याचा धोका सभागृहात सदस्यांनी व्यक्त केला. रंकाळ्याबाबत प्रशासन उदासीन असल्याची टीका झाल्यानंतर अल्पकाळाची निविदा प्रसिद्ध करीत बी. के. पाटील कन्स्ट्रक्शन यांना भिंत बांधण्याचा ठेका देण्यात आला. गेल्या पंधरा दिवसांपासून भिंतीचे कामही सुरू झाले. ९० लाख रुपये खर्चून ९२ मीटर भिंत बांधण्यात येणार आहे. नव्या भिंतीची उंची साडेपाच मीटर आहे, तर रुंदी किमान सहा फूट असणार आहे. मात्र, हे काम कासवगतीने सुरू असून पावसाळ्यात रंकाळ्याचे पाणी पश्चिमेकडील भुसभुशीत जमिनीला अडून झाडे व जमिनीच्या भागास मोठ्या प्रमाणात जलसमाधी मिळण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)रंकाळ्याच्या पश्चिमेकडील भिंतीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा मानस आहे. सध्या फाउंडेशनचे काम सुरू आहे. कॉँक्रीटचा टप्पा झाल्यानंतर दगडी बांधकाम सुरू होईल. पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत पाण्याच्या किमान पातळीपर्यंत काम होईल. यानंतर अंतिम टप्प्यातील काम पावसातही करता येणे शक्य आहे. - एस. के. माने, कार्यकारी अभियंता