शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

रंकाळा तटबंदीचे काम संथ

By admin | Updated: April 28, 2015 00:55 IST

पावसाळ्यापूर्वी कामाचे आव्हान : किमान पातळीपर्यंत भिंतीचे काम होईल : प्रशासन

कोल्हापूर : शहराचे भूषण आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या रंकाळा तलावाची संरक्षक भिंत गेल्या वर्षभरात चार वेळा कोसळली. यानंतर पर्यावरणप्रेमींसह शहरवासीयांनी रोष व्यक्त करताच पश्चिमेकडील ही पडकी ९२ मीटरची भिंत काढून त्या जागी नवीन भिंत बांधण्याचे काम सुरू झाले. मात्र, कासवगतीने सुरू असलेले काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यास रंकाळ्याच्या दुखण्यात आणखी भर पडणार आहे. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी पाण्याच्या किमान पातळीपर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे कार्यकारी अभियंता एस. के. माने यांनी ‘लोकमत’ला सांगितले.शालिनी पॅलेसच्या बाजूला असलेली रंकाळ्याची तटबंटी ठिसूळ झाल्याने दर दोन-तीन महिन्यांनी कोसळत होती. दगड एकमेकांपासून सुटू लागल्याने संपूर्ण तटबंदीलाच जलसमाधी मिळण्याचा धोका निर्माण झाला. पर्यटक दररोज मोठ्या संख्येने रंकाळ्याकडे उद्यानात फिरायला येतात. तटबंदीच्या बाजूने पर्यटक फिरत असतात. अशा धोकादायक तटबंदीवर लोक बसलेलेही असतात. त्यामुळे पर्यटकांच्या वर्दळीवेळी जर तलावाच्या तटबंदीचा भाग कोसळला, तर मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे. ही तटबंदी उतरवून घ्या, पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करा, असा तगादा नगरसेवकांसह रंकाळाप्रेमींनी प्रशासनाकडे लावला. यानंतर सर्व परिसराची कोल्हापूर इंजिनिअरिंग व आर्किटेक्ट असोसिएशनच्या पथकाने पाहणी केली. ९० मीटरची तटबंदी तत्काळ उतरवून घेऊन भक्कम कॉँक्रीटची भिंत बांधण्याचा सल्ला दिला होता. पावसाळ्यापूर्वी भिंतीचे काम पूर्ण न केल्यास रंकाळ्यातील पाणी बाहेर पडण्याचा धोका सभागृहात सदस्यांनी व्यक्त केला. रंकाळ्याबाबत प्रशासन उदासीन असल्याची टीका झाल्यानंतर अल्पकाळाची निविदा प्रसिद्ध करीत बी. के. पाटील कन्स्ट्रक्शन यांना भिंत बांधण्याचा ठेका देण्यात आला. गेल्या पंधरा दिवसांपासून भिंतीचे कामही सुरू झाले. ९० लाख रुपये खर्चून ९२ मीटर भिंत बांधण्यात येणार आहे. नव्या भिंतीची उंची साडेपाच मीटर आहे, तर रुंदी किमान सहा फूट असणार आहे. मात्र, हे काम कासवगतीने सुरू असून पावसाळ्यात रंकाळ्याचे पाणी पश्चिमेकडील भुसभुशीत जमिनीला अडून झाडे व जमिनीच्या भागास मोठ्या प्रमाणात जलसमाधी मिळण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)रंकाळ्याच्या पश्चिमेकडील भिंतीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा मानस आहे. सध्या फाउंडेशनचे काम सुरू आहे. कॉँक्रीटचा टप्पा झाल्यानंतर दगडी बांधकाम सुरू होईल. पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत पाण्याच्या किमान पातळीपर्यंत काम होईल. यानंतर अंतिम टप्प्यातील काम पावसातही करता येणे शक्य आहे. - एस. के. माने, कार्यकारी अभियंता