शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रणजितसिंह पाटील भाजपमध्ये

By admin | Updated: January 23, 2017 00:53 IST

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश : डी. सी. पाटील यांच्यासह गाठ, बारदेसकरही दाखल

कोल्हापूर : ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक रणजितसिंह पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांच्यासह अनेकांनी रविवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये उद्योजक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ यांचे चुलतबंधू महावीर गाठ, चंदूरचे विक्रांतसिंह कदम, भुदरगडचे युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष देवराज बारदेसकर यांच्यासह अनेक सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनीही यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेश केलेल्या नेत्यांच्या जयजयकाराने हॉटेल पॅव्हेलियनचा परिसर दुमदुमून गेला. गेले पंधरा दिवस भाजपच्या चमूने केलेल्या प्रयत्नांना यश आल्यानंतर मंत्री पाटील यांनी रविवारी सकाळी भाजप, ताराराणी, जनसुराज्यच्या नेत्यांसमवेत बैठक घेऊन सर्व राजकीय हालचालींचा आढावा घेऊन ही घोषणा केली. तत्पूर्वी, त्यांनी भाजपमधील नेत्यांची बैठक घेऊन विस्तृत चर्चा केली. पाटील म्हणाले, चंदगडमध्ये कुपेकर गट आणि भाजप एकत्रित निवडणूक लढवतील. चंदगड तालुका विकास आघाडीची यासाठी स्थापना करण्यात आली आहे. गोपाळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली चंदगड तालुक्यातील भाजप जिल्हा परिषदेच्या दोन, तर कुपेकर गट दोन जागा लढवील. हातकणंगले तालुक्यात भाजप-ताराराणी आघाडीसोबत आता धैर्यशील माने यांची युवक क्रांती आघाडी आमच्यासोबत येत असून, तिथे ताराराणी आघाडी पाच, तर युवक क्रांती आघाडी दोन जागांवर जिल्हा सुरू आहे. मुंबईतील चर्चेच्या फेऱ्यांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यानुसार या सर्व जागा भाजप आपल्याकडे ठेवून घेणार नाही, तर त्यातील काही जागा समन्वयाने सोबत येतील त्यांच्यासाठी सोडण्यात येणार आहेत. पेठवडगावला आम्ही डॉ. अशोक चौगुले यांना प्रथम प्रवेश दिल्यानंतर नंतर कुणाशीही चर्चा केली नाही. त्यामुळे आम्ही दिलेला शब्द पाळतो; म्हणूनच भाजपकडे अनेकांचा ओढा वाढला आहे. त्यांतील कुणालाही नाराज न करता त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही बांधील आहोत. ताराराणी आघाडीचे अध्यक्ष स्वरूप महाडिक म्हणाले, आम्ही कोल्हापूर महापालिकेपासून भाजपसोबत आहोत. याहीपुढे भाजपसोबतच राहणार आहोत. ‘जनसुराज्य’चे प्रवक्ते विजयसिंह जाधव म्हणाले, आमचे नेते विनय कोेरे आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्यात चर्चा झाली असून, त्यानुसारच पुढचे नियोजन केले जाईल. या पत्रकार परिषदेवेळी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, संघटनमंत्री बाबा देसाई, अरुण इंगवले, सुनील कदम, ‘गोकुळ’चे संचालक रामराजे कुपेकर, अनिल यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेट्टी-खोत अंतर वाढू नयेभाजपच्या पाठिंब्यावरून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात दरी वाढत आहे, याबाबत विचारणा केल्यानंतर पाटील म्हणाले, ही संघटना टिकावी हीच आमची इच्छा आहे. सरकारची गोष्ट वेगळी आहे. मात्र शेतकऱ्यांच्या भल्यासाठी चळवळ कायम राहणे गरजेचे आहे. त्यामुळे शेट्टी आणि खोत यांच्यामधील अंतर वाढावे, अशी आमची इच्छा नाही. .चंदगड तालुका दुर्गम असून तो दुर्लक्षित आहे. पर्यटनाच्या माध्यमातून हा तालुका देशाच्या पातळीवर नेता येईल; परंतु त्यासाठी शासनाच्या पाठबळाची गरज आहे. या सर्व प्रश्नांना गेल्या दोन वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पक्ष, गट न पाहता मदत केली आहे. एव्हीएच प्रकल्पाबाबत तर विरोधात असतानाही आणि नंतर मुख्यमंत्री झाल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या हिताची भूमिका घेतली; म्हणूनच चंदगड तालुक्याच्या विकासाच्या हाळवणकर, तुम्हाला जिल्ह्याचे नेतृत्व करायचेय : चंद्रकांतदादापत्रकार परिषदेला भाजपचे नेते, नवीन प्रवेश केलेले नेते यामुळे मोठी गर्दी झाली. नेत्यांना बसण्यासाठीच खुर्च्या कमी पडल्या. त्यामुळे सुरेश हाळवणकर यांना एका बाजूला बसावे लागले. मात्र, चंद्रकांतदादांनी खुर्ची आणायला लावून ती आपल्याजवळ ठेवून हाळवणकर यांना जवळ बसवले. हाळवणकर कडेला कुठे बसता, उद्याचे जिल्ह्याचे नेतृत्व तुम्हालाच करायचे आहे, अशी टिप्पणी केली. त्यामुळे हाळवणकर यांना पुढच्या काळात मोठी संधी असल्याची चर्चा सुरू होती.