शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

रेंगाळलेल्या शिवाजी पूलप्रश्नी ‘पुन्हा’ चर्चेचे गुऱ्हाळच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 18:57 IST

शिवाजी पुलाच्या रेंगाळलेल्या बांधकामासंदर्भात मंगळवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने (राष्ट्रीय महामार्ग विभाग) नागरी कृती समिती, पुरातत्त्व विभाग, पर्यावरण समिती, महापालिका यांची संयुक्त बैठक झाली. पण बैठकीत कोणताही ठोस निर्णय न होताच सुमारे तीन तासचर्चेचे गुऱ्हाळच चालू राहीले. पूलाचे काम रेंगाळण्यास प्रत्येक विभागाने आरोप-प्रत्यारोप करत एकमेकांना जबाबदार धरले.

ठळक मुद्देएकमेकावर आरोप-प्रत्यारोप तीन तासाच्या बैठकीनंतरही ठोस निर्णय नाहीआठवड्यात पालकमंत्र्यासह तीन खासदारांची बैठक बोलविण्याची मागणी

कोल्हापूर , दि. २४ : शिवाजी पुलाच्या रेंगाळलेल्या बांधकामासंदर्भात मंगळवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने (राष्ट्रीय महामार्ग विभाग) नागरी कृती समिती, पुरातत्त्व विभाग, पर्यावरण समिती, महापालिका यांची संयुक्त बैठक झाली. पण बैठकीत कोणताही ठोस निर्णय न होताच सुमारे तीन तासचर्चेचे गुऱ्हाळच चालू राहीले. पूलाचे काम रेंगाळण्यास प्रत्येक विभागाने आरोप-प्रत्यारोप करत एकमेकांना जबाबदार धरले.

दरम्यान, कायद्याचे उल्लंघन करुन बाधीत क्षेत्रात पूलासह कोणतेही बांधकाम करता येणार नसल्याचे केंद्रीय पुरातत्व विभाग कोल्हापूरचे संरक्षण सहायक विजय चव्हाण यांनी स्पष्ट केले.

आगामी संसदेच्या अधिवेशनात पुरातत्व कायद्यातील बदलाला मंजूरी मिळणे आवश्यक असल्याने त्यासाठी जनरेटा वाढवावा असेही आवाहन चव्हाण यांनी केले. त्यामुळे नागरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी येत्या आठवड्यात जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह तीन खासदारांची बैठक बोलवून हा प्रश्न तडीस लावण्याचा निर्णय घेतला.

शिवाजी पूलाचे अर्धवट स्थितीत रेंंगाळलेले बांधकाम त्वरीत पूर्ण करावे यासाठी कोल्हापूर जिल्हा नागरी कृती समितीच्यावतीने काही महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग विभाग) यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. यासाठी अधिकाºयांना घेरावा घालणे, जबाब दो आदी आंदोलने केली.

या पूलाच्या बांधकामाची प्रत्येक्ष काय स्थिती आहे, त्यासाठी विरोध कोणी केला, प्रशासनातर्फे काय पाठपुरावा केला, पुरातत्व विभागाची भूमीका काय, पूलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात मंगळवारी विवीध विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेण्यात आली.

यामध्ये कृती समितीच्या कार्यकर्त्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे (राष्ट्रीय  महामार्ग विभाग) कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे, उपअभियंता संपत आबदार, केंद्रीय पुरातत्व कोल्हापूर विभाग संरक्षण सहायक विजय चव्हाण, वृक्षप्राधिकरण समितीचे सदस्य उदय गायकवाड, महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत आदी अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी माजी महापौर आर. के. पोवार यांनी या बैठकीत शिवाजी पूलाबाबत लोकभावना समजून सांगितली, तसेच अधिकाºयांनी उत्तरे दिल्याशिवाय येथून जाणार नसल्याची भूमीका घेतली. या बैठकीत कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी अधिकाºयांवर प्रश्नांचा भडीमार केला. या प्रश्नांना अधिकाºयांनी दिलेल्या उत्तरातून कोणत्याही परवानगीबाबत कागदपत्रांची पूर्तता न करता घाईगडबडीत पूलाचे बांधकाम सुरु करण्यात आल्याचे दिसून आले.

दरम्यान, शिवाजी पूलाच्या बांधकामासाठी परवानगीबाबत पुरातत्व विभागाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने २ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला प्रस्ताव पाठविल्याची माहिती पुरातत्व विभागाचे विजय चव्हाण यांनी यावेळी दिली. त्यानंतर पूलाच्या बांधकामात आडवी येणारी झाडे, हौद, जकात नाका इमारत पाडण्यासाठी परवानगीबाबतच्या कागदपत्रांचा रंगलेला खेळ उपअभियंता संपत आबदार यांनी सर्वासमोर उघड केला.कायद्याचे उल्लंघन करुन बांधकाम करु नकाऐतिहासिक ब्रम्हपुरी टेकडीच्या १०० मीटर परिघातील बाधीत क्षेत्रात कोणतेही बांधकाम करता येणार नसल्याचे स्पष्टपणे सांगताना विजय चव्हाण यांनी, कायद्याचे उल्लंघन करुन शिवाजी पूलासह कोणतेही बांधकाम करता येणार नसल्याचे सांगितले.|आता नवा पूलही हेरीटेजशिवाजी पूलाचे आर्युमान संपल्याने शेजारी ८० टक्के झालेल्या पर्यायी पूलाच्या बांधकामाला जनहित पाहून पुरातत्व विभागाने परवानगी द्यावी, अन्यथा या लाल फितीत हा नवा पूल अडकल्याने तोही आता हेरिटेजच्या होण्याची वेळ आली आहे, असे प्रसाद जाधव म्हणाले.पूलावरही आता अर्धमुंडनचर्चेतून ठोस मार्ग निघत नसल्याने येत्या आठवडाभरात या अर्धवट रेंगाळलेल्या पूलावर छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते डोक्याचे अर्धमुंडन करतील असे संतप्त होऊन फिरोजखान उस्ताद यांनी यावेळी जाहिर केले.

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागroad safetyरस्ते सुरक्षा