शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रंकाळा जलशुद्धिकरणाच्या गप्पाच

By admin | Updated: July 10, 2015 23:50 IST

डिझेलच्या तुटवड्यामुळे प्रकल्पास खीळ : मनपा दुसरे स्थिर ठिकाण ठरविणार

कोल्हापूर : मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेतर्फे (आय.सी.टी.) रंकाळ्यातील पाणी शुद्ध करण्याचा प्रकल्पास १४ जूनपासून सुरुवात झाली. मात्र, ठरल्याप्रमाणे महापालिकेने अद्याप वीज जोडणी दिली नसल्याने डिझेलवरची यंत्रणा बंदसदृश स्थितीतच आहे. यंत्रामुळे दूषित पाणी शुद्धिकरणाचे चांगले परिणाम असूनही धोरण आंधळेपणाचा फटका बसत आहे. उद्घाटनावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह प्रशासनाने रंकाळा शुद्धिकरणाच्या केलेल्या आणाभाका निव्वळ गप्पाच ठरल्याचे चित्र आहे.शुद्धिकरण प्रकल्पाचे आय.सी.टी.चे प्राध्यापक व प्रकल्प संशोधक डॉ. अनिरुद्ध पंडित यांच्या ‘हायड्रो डायनॅमिक कॅव्हिटेशन’ या तंत्रज्ञानावर आधारित रंकाळ्यातील पाणी शुद्धिकरणाची योजना हाती घेण्यात आली. महापालिका या प्रकल्पासाठी फक्त वीज पुरवठा करणार आहे. सेवाभावी निधीतून संस्थेचे कुलगुरू व कोल्हापूरचे सुपुत्र जी. डी. यादव यांनी प्रकल्पासाठी लागणारा २५ लाखांचा निधी जमा केला आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पाचे दिमाखदार उद्घाटनही झाले. त्यावेळी रंकाळ्याला निधी कमी पडू देणार नाही, आदी आश्वासनांची बरसात झाली. मात्र, प्रत्यक्षात जलशुद्धिकरण यंत्र डिझेलचा तुटवडा व विजेच्या जोडणीस होत असलेल्या विलंबामुळे बंद अवस्थेतच आहे. (प्रतिनिधी)जलशुद्धिकरणाचे चांगले परिणाम समोर आले आहेत. त्याची शास्त्रीय चाचणी घेतली जाणार आहे. केंद्र नेमके कुठे लावायचे याची जागा अद्याप निश्चित नाही. यंत्र लावलेल्या खणीमध्ये रंकाळ्यातील पाणी आल्यानेच डिझेलची अधिक मात्रा लागत असल्याची शक्यता आहे. जागा निश्चित झाल्यानंतर वीज जोडणी घेण्यात येणार आहे.- नितीन देसाई (अतिरिक्त आयुक्त, महापालिका)