शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

‘रॅमकी’ कर्मचाऱ्यांचा मनपाच्या दारात ठिय्या

By admin | Updated: December 9, 2014 00:32 IST

किमानवेतनाची मागणी : आश्वासनानंतर माघार

कोल्हापूर : ‘रॅमकी इन्व्हायरो इंडिया लिमिटेड’कडे २००७ ते २०११ या क ालावधीत शहरातील कचरा उठावासाठी कमी मानधनावर राबणाऱ्या सफाई कामगारांना किमानवेतन कायद्याप्रमाणे वेतनातील फरकाचे ३ कोटी ७ लाख रुपये देण्याचे साहाय्यक कामगार आयुक्त सुहास कदम यांनी २ सप्टेंबर २०१४ला आदेश दिले. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने हक्काचे पैसे द्या, या मागणीसाठी आज, सोमवारी ‘रॅमकी’च्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या विठ्ठल रामजी चौकात ठिय्या आंदोलन केले. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी किमानवेतनासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.‘रॅमकी’ने कचरा उठाव करणाऱ्यांना द्यावयाच्या फरकाबाबत रक्कम ठरविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने साहाय्यक कामगार आयुक्तांना दिले होते. महापालिकेतर्फे शहरातील कचरा उठावचा ठेका घेतलेल्या ‘रॅमकी’ने सफाई कर्मचाऱ्यांना अठराशे रुपयांच्या ठोक मानधनावर कामावर घेतले होते. यावेळी ‘रॅमकी’ने किमानवेतन कायद्याचा भंग केल्याची तक्रार मुंबईतील महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनने उच्च न्यायालयात केली होती. न्यायालयाने किमानवेतन अधिनियमन १९४८ कलम (२०) नुसार किमानवेतन देण्याचे आदेश दिले. कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून साहाय्यक कामगार आयुक्तांना किमानवेतनाबाबत निर्णय घेण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या होत्या.याप्रकरणी गेली चार महिने सुहास कदम यांच्याकडे सुनावणी सुरू झाली. ‘रॅमकी’ची महापालिकडे किमान सव्वा कोटी रुपयांची अनामत रक्कम व दीड कोटी रुपयांची वाहने पडून आहेत. ही वाहने व अनामत रक्कम परत द्या किंवा यातून कामगारांचे पैसे भागवा, असा आदेश दिला. मात्र, याबाबत महापालिकेने अद्याप कार्यवाही केली नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या दारातच ठिय्या मारला. अतिरिक्त आयुक्तांच्या आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)