शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

कुरुंदवाडमध्ये जयराम पाटील विरुध्द रामचंद्र डांगे सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:26 IST

गणपती कोळी कुरुंदवाड : येथील पालिका निवडणुका पक्षीय असले तरी गटालाच महत्त्व आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष जयराम ...

गणपती कोळी

कुरुंदवाड : येथील पालिका निवडणुका पक्षीय असले तरी गटालाच महत्त्व आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष जयराम पाटील गट विरुद्ध माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे गट अशीच पारंपरिक लढत होणार हे निश्चित आहे. मात्र, रावसाहेब पाटील गट कोणती भूमिका घेतो यावरच गटनेत्यांचे वर्चस्व राहणार आहे.

शहरात रावसाहेब पाटील, जयराम पाटील व रामचंद्र डांगे अशा तीन गटनेत्यांचे शहरावर वर्चस्व आहे.

तीनही नेत्यांचे शहरावर पकड मजबूत असल्याने पालिका निवडणुकीत आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही गटाला एकतर्फी बहुमत मिळाले नाही. त्यामुळे शहराला त्रिशंकुचा शापच असल्याची टीका होते. त्याचा परिणाम नेत्यांपासून ते नगरसेवकांपर्यंत फुटाफुटीचे राजकारण होत असते.

गतनिवडणुकीत गटातटांच्या राजकारणाला छेद देत पक्षीय चिन्हावर निवडणुका झाल्या. त्यामध्ये भाजपचे डांगे, काँग्रेसचे जयराम पाटील तर राष्ट्रवादी चिन्हावर रावसाहेब पाटील गटाने तिरंगी निवडणूक लढविली. थेट नगराध्यक्ष निवडणुकीत जयराम पाटील यांनी बाजी मारली.

निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करत भाजपला सत्तेबाहेर ठेवले. नगराध्यक्ष पाटील यांच्या वयोमानामुळे फारसे क्रियाशील राहिले नाहीत. त्यामुळे लक्षात राहण्यासारखी विकासकामे करण्यात फारसे यश आले नाही शिवाय आघाडीतील कुरघोडीचे राजकारण झाल्याने सत्ताधारी आघाडीत सत्ता स्थापनेच्या वर्षभरातच फूट पडली. पालिकेत आघाडी सत्तेत असली तरी बिघाडी कायम आहे.

यंदाच्या निवडणुकीत पक्षापेक्षा पुन्हा गटाचीच निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नगराध्यक्ष पाटील व डांगे गट गेल्या काही महिन्यांपासून कार्यरत झाले आहेत. तर रावसाहेब पाटील गट ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे.

शहर काँग्रेसने आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना सापत्न वागणूक देत असल्याने शहरातील रावसाहेब पाटील गट काँग्रेसच्या पक्ष:पातीपणा भूमिकेवर नाराज आहेत शिवाय डांगे गटनेते रामचंद्र डांगे यड्रावकरांच्या संपर्कात अधिक आल्याने डांगे यांनी पालिका निवडणूक यड्रावकर गट व समविचारी गटाला घेऊन आघाडी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेसला सत्ता टिकविण्याचे तर डांगे यांना सत्ता मिळविण्याचे आव्हान राहणार आहे.

-

पालिकेतील बलाबल

काँग्रेस - ६

राष्ट्रवादी - ५

भाजपा - ५

अपक्ष - १

लोकसंख्या - २५०००

मतदारसंख्या - १४०००

प्रभाग - १७

----------------

चौकट -

घडलंय बिघडलंय

* पालिकेतील सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेल्या चार वर्षांत समन्वयाचा अभाव.

* पाच वर्षांत नजरेत भरेल असे कोणतीही कामे नाहीत.

* शहराची सुधारीत नळ पाणीपुरवठा योजना निधी असूनही मार्गी लावण्यात अपयशी

* शहरातील अतिक्रमणे नियमित करणाचा महत्त्वाचा प्रश्न प्रलंबित.

* भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर

* गेल्या दोन वर्षांपासून शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करण्यात अपयशी.

फोटो - २५०८२०२१-जेएवाय-०२-कुरुंदवाड नगरपालिका