शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: August 6, 2015 23:49 IST

खासदारांचे निलंबन मागे घ्या : सरकार गरिबांचे नव्हे : पी. एन. पाटील

कोल्हापूर : ललित मोदींना मदत केल्याप्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे तसेच व्यापमं घोटाळ्याप्रकरणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा राजीनामा मागणाऱ्या लोकसभेतील काँग्रेस पक्षाच्या २५ खासदारांचे झालेले निलंबन मागे घ्या, या मागणीसाठी गुरुवारी जिल्हा काँग्रेस कमिटी रस्त्यावर आली. भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.दुपारी स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटी कार्यालयात काँग्रेसचा मेळावा झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भरमू सुबराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.पी. एन. पाटील यांनी भाजप सरकारवर सडकून टीका करीत चांगलाच समाचार घेतला. खासदारांच्या निलंबनाची कारवाई ही देशाच्या इतिहासातील पहिलीच कारवाई आहे. भाजप सरकार हे सर्वसामान्य व गोरगरिबांचे सरकार नाही. कारण संजय गांधी निराधार योजना बंद करण्याचा घाट त्यांनी घातला आहे. अ‍ॅड. सुरेश कुराडे यांनी प्रास्ताविक केले.मेळाव्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. स्टेशन रोड, व्हीनस कॉर्नर मार्गे, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. भर पावसातही कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. या ठिकाणी जोरदार निदर्शने करून परिसर दणाणून सोडण्यात आला. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.आंदोलनात जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, शिक्षण समिती सभापती अभिजित तायशेटे, समाजकल्याण सभापती किरण कांबळे, महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील, पक्षप्रतोद शहाजी पाटील, हिंदुराव चौगले, प्रल्हाद चव्हाण, सरलाताई पाटील, अंजना रेडेकर, उदयानी साळुंखे, संध्या घोटणे, आदी सहभागी झाले होते.