शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

राखी न विसरणारा भैय्या--

By admin | Updated: August 28, 2015 23:47 IST

रक्षाबंधन विशेष

रत्नागिरी : ‘भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना...’ या काव्य पंक्तीतून बहीण भावाकडे आर्जव करते. बहीण भावाच्या नात्याची विण राखीव्दारे घट्ट बांधून ठेवण्याचा सण अर्थात्च रक्षाबंधन! गेली २२ वर्षे हा सण आंबेडबुद्रुक येथील हसीना ऊर्फ फईमा निसार केळकर साजरा करीत आहेत. त्यांचे बंधुराज खलील युसूफ बावडेकर दरवर्षी न चुकता रक्षाबंधनाला हजर असतात, हे विशेष.आंबेडखुर्द गावातील खलील युसूफ बावडेकर हे दुबईमध्ये नोकरी करीत होते. त्यांच्या लग्नानंतर काही वर्षांतच खलील मानसिक आजारी पडले. तेव्हापासून आतापर्यंत अनेक औषधोपचार करूनसुध्दा खलील बरे झाले नाहीत. परिणामी नोकरी सुटली. खलील यांना सहा बहिणींपैकी त्यांचे हसीनावर भरपूर प्रेम. त्यामुळे हसीनाकडे दरवर्षी ते न चुकता हजर असतात. खलील मानसिक आजारी असल्यामुळे ते आपल्या घरी केव्हा थांबतच नाहीत. त्यांच्या बंधुराजांनी त्यांच्यासाठी खूप प्रयत्न करूनसुध्दा ते सतत पायी फिरत असतात. वैशिष्ट्य म्हणजे ते कोणाकडे काही मागत नाहीत किंवा कोणाकडून काही घेत नाहीत. जेवणाच्या वेळी भूक असेल तर कुणी वाढलेले ते जेवतात. पंचक्रोशीमध्ये खलील यांना ओळखणारी मंडळी खूप आहे. ही व्यक्ती सतत चालत फिरत असल्यामुळे ओळखीची मंडळी त्यांना गाडीत बसवण्याचा प्रयत्न करतात. नातेवाईकही गाडीत बोलावतात. परंतु, ते स्पष्ट नकार देऊन चालतच फिरतात. त्यांच्याकडून कोणालाही उपद्रव होत नसल्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनाही त्यांच्याबद्दल आस्था वाटते. खलील सतत फिरतच असल्यामुळे चिपळूण, माखजन, इतकेच नव्हे; तर ते मुंबईतही पोहोचले होते. शेवटी नातेवाईकांनी शोध घेऊन त्यांना गावी आणले. मानसिक आजारामुळे खलील यांची अशी स्थिती आहे. त्यांना दररोजचा वार किंवा दिनांक याबद्दल काहीच माहीत नाही. इतकेच नव्हे; तर जवळच्या मंडळींनाही ते ओळखत नाहीत. परंतु, काळवेळेचे भान नसलेले खलिल रक्षाबंधनाच्या दिवशी मात्र बहिणीकडे न चुकता येतात. इतकेच नव्हे; तर बहिणीच्या सासू सासऱ्यांसह भाच्याची चौकशी करतात. बहिणीकडून राखी बांधून घेतात. वाढलेले जेवतात व पुन्हा आलेल्या मार्गाने निघून जातात. आपल्या बंधूराजाच्या या परिस्थितीमुळे हसीना व्याकूळ होतात. खलील घरी आलेवर परत जाऊ नयेत यासाठी त्यांनी घराचे दरवाजे बंद करून घेतले होते. त्यांना घरातील एका खोलीत राहण्यासाठी विनंती केली परंतु, खलील ते न जुमानता निघून गेले. गेली २२ वर्षे हसीना त्यांच्यासाठी नवीन कपडे घेतात, त्यांची वाट पहात असतात.कुठल्याच ऋतूंचा खलील यांच्यावर दिनक्रमावर परिणाम होत नाही. त्यांची फिरस्ती सतत सुरू असते. परंतु, रक्षाबंधन मात्र कधीच चुकत नाही. थोड्या वेळासाठी का होईना भाऊ घरी येतो, आपला भाऊ घरीच थांबावा, त्याचेवर आणखी औषधोउपचार व्हावेत व तो बरा व्हावा अशी ईच्छा हसीना व त्यांच्या सर्व बहिणींची आहे मात्र ती असफल ठरत आहे. त्यामुळेच ‘भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना’ ऐवजी हसीना फक्त आपल्या भावासाठी अल्लाहकडे प्रार्थना करतात.