शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

तीन जागा मिळाल्यास आघाडीत जाणार :राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:21 IST

खोची : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणुकीसाठी सात जागांची मागणी केली आहे. त्यातील किमान तीन जागा मिळाल्यास ...

खोची : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणुकीसाठी सात जागांची मागणी केली आहे. त्यातील किमान तीन जागा मिळाल्यास आघाडीत सामील होणार आहे. नांदेड येथे होणाऱ्या महाआघाडीच्या मेळाव्यासाठीे निमंत्रणही मिळाले असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिली. खोची (ता. हातकणंगले) येथे रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनासाठी खासदार राजू शेट्टी आले होते. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी लोकसभा निवडणूक व साखर दर याबाबत सविस्तर चर्चा केली.खासदार शेट्टी म्हणाले, ‘संपूर्ण कर्जमाफी व दीडपट हमीभाव ही मागणी मान्य झाली असून, लोकसभेसाठी सात जागांची मागणी केली आहे. त्यापैकी हातकणंगले, बुलढाणा, वर्धा या किमान जागा मिळल्यास समाधानी आहे. तसे झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी महाघाडीत सहभागी होणार आहे तशी चर्चा सुरू आहे. त्यानुसार लवकरच या महाआघाडीत सहभागी झाल्याचा निर्णय होईल.स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बुलढाण्यातून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, वर्धा येथून माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मला स्वत:ला उमेदवारी दिली जाणार आहे. या तीन जागांसाठी आमचा आग्रह आहे. महाघाडीत सामील झाल्यानंतर सहभागाचे सविस्तर कारण सांगितले जाईल. वास्तविक कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार आघाडीत सहभागी होण्याची चर्चा सुरू आहे. तीन खासदार निवडून आल्यास शेतकºयांसाठी अधिक चांगल्या पद्धतीने काम करता येईल, असे खासदार शेट्टी म्हणाले. साखर कारखानदारांना उसाला एफआरपीप्रमाणे रक्कम द्यावीच लागेल. सध्याच्या स्थितीत त्यापेक्षा जादा दर मिळणे कठीण आहे, असे चित्र आहे.नरेंद्र मोदी पलटलेमोदी सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड नाराजी आहे. सत्तेत नसताना म्हणजे विरोधी पक्षात होते तेव्हा जसे बोलत होते, तसे सत्तेत आल्यावर ते बोलत नाही. त्याचा तोटा त्यांना आगामी काळात होणार आहे, असे खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले.