शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

राजू शेट्टींनी काशीला जाऊन पापक्षालन करावे - : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 13:45 IST

ज्यांनी शेतकऱ्यांची वाट लावली, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे शेतकऱ्यांना आवडले नाही.

ठळक मुद्देट्टी यांनी केलेले पाप धुण्यासाठी पंचगंगा डोहात स्नान करून दुसरी आत्मक्लेश यात्रा काढावीधैर्यशील माने यांचा विजय त्यांनी शेतकºयांना अर्पण केला.

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आत्मक्लेश यात्रा काढली होती; परंतु याच शेतकऱ्यांनी आता त्यांचा पराभव केला आहे. साखर कारखानदारांशी केलेली अभद्र युती शेतकऱ्यांना आवडली नाही. ज्यांनी शेतकऱ्यांची वाट लावली, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे शेतकऱ्यांना आवडले नाही. तेव्हा शेट्टी यांनी केलेले पाप धुण्यासाठी पंचगंगा डोहात स्नान करून दुसरी आत्मक्लेश यात्रा काढावी. काशीला जाऊन गंगेत स्नान करून तेथे पापक्षालन करावे, अशी बोचरी टीका कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली.

कोल्हापुरातील शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आल्यानंतर सदाभाऊ खोत बिंदू चौक येथील भाजप कार्यालयात विजयोत्सव साजरा करण्याकरिता आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि संजय मंडलिक, धैर्यशील माने यांचा विजय त्यांनी शेतकऱ्यांना अर्पण केला.

शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊन शेतकरी चळवळीचा विश्वासघात केला. ज्यांनी शेतकऱ्यांचे वाटोळे केले, त्या पक्षांशी शेट्टी यांनी अभद्र युती केली हे शेतकऱ्यांना आवडले नाही. राष्ट्रवादी म्हणजे चोरांच्या आळंदीला जाणारी टोळी आहे अशी टीका त्यांनी केली; पण तेच या चोरांच्या टोळीत सामील झाले. शेतकऱ्यांचा हा अपमान होता, असे सांगत खोत म्हणाले की, शेट्टी यांना व्यक्तिद्वेषाने पछाडले होते. ‘मी’ची बाधा त्यांना झाली होती. शेतकऱ्यांना माझ्यामुळेच न्याय मिळतोय, मी देवाचा प्रेषित म्हणून जन्माला आलोय, अशी त्यांची भावना झाली होती. शेतकऱ्यांनी पराभव केल्यामुळे त्यांनी आता काशीला जाऊन पापक्षालन करावे. त्यांनी गंगेत स्नान करून तेथेच थांबावे. शेट्टी दुसरी आत्मक्लेश यात्रा कधी काढतात याची मी वाट पाहतोय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिला तर आपण वाळव्यातून विधानसभेची निवडणूक लढवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालkolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगलेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019