शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

राजू शेट्टींनी थोडा संयम ठेवावा - पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:24 IST

कोल्हापूर : पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास राज्य सरकार कमी पडणार नाही, थोडा संयम ठेवावा, अशा शब्द मुख्यमंत्री उध्दव ...

कोल्हापूर : पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास राज्य सरकार कमी पडणार नाही, थोडा संयम ठेवावा, अशा शब्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना दिला आहे. त्यामुळे शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून अजून थोडा संयम ठेवावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी केले.

राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना आठ दिवसात नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही तर मंत्र्यांना गाडीतून फिरू देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राजू शेट्टी यांची बैठक झाली आहे. त्यावेळी भरपाई देण्यास सरकार कमी पडणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तेव्हा शेट्टी यांनी आणखी थोडा संयम ठेवावा. आम्हीच तुम्हाला गाडीत घेऊन फिरवू.

राज्यात अद्यापही पाऊस सुरू आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. एकदा पाऊस कमी होऊ द्या, सर्वांचे पंचनामे पूर्ण होऊ द्या. त्यानंतर भरपाई देण्यात येईल. याविषयी मंत्रिमंडळाच्या बैठकीत वारंवार चर्चा झालेली आहे. नुकसान भरपाई देण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही, असे पाटील म्हणाले.