शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधी यांनी राजकारणापलिकडे देशाच हित पाहिल : यशवंतराव थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 16:38 IST

राजीव गांधी यांनी राजकारणापलिकडे देशाच हित पाहिल. मुक्त अर्थ व्यवस्था ही त्यांची देणं आहे. त्यांनी देशाचा तांत्रिक चेहरा बदलला. राजीव गांधी यांच्यामुळेच देशात साफ्टेवेअर क्रांती झाली, वित्तीय धोरणात बदल झाला, उद्योगाला चालना मिळाली, अशा शब्दांत नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतींना मंगळवारी उजाळा दिला.

ठळक मुद्देराजीव गांधी यांनी राजकारणापलिकडे देशाच हित पाहिल : यशवंतराव थोरातकॉँग्रेसतर्फे राजीव गांधी यांच्या २९व्या शहिद दिनानिमित्त अभिवादन मेळावा

कोल्हापूर : राजीव गांधी यांनी राजकारणापलिकडे देशाच हित पाहिल. मुक्त अर्थ व्यवस्था ही त्यांची देणं आहे. त्यांनी देशाचा तांत्रिक चेहरा बदलला. राजीव गांधी यांच्यामुळेच देशात साफ्टेवेअर क्रांती झाली, वित्तीय धोरणात बदल झाला, उद्योगाला चालना मिळाली, अशा शब्दांत नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतींना मंगळवारी उजाळा दिला.शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूर जिल्हा व शहर कॉँग्रेसतर्फे भारतरत्न माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २९व्या शहिद दिनानिमित्त अभिवादन मेळाव्याचे आयोजन केले होते. थोरात यांनी यावेळी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी जिल्हा कॉँग्रसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. राजीव गांधी यांच्या प्रतिमा पुजनाने मेळाव्याची सुरूवात झाली.राजीव गांधी यांची उज्वल कारकिर्द आज पुन्हा तरुणाईपुढे मांडण्याची गरज प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केली. राज्य कॉँग्रेस समितीचे सरचिटणीस तौफिक मुल्लाणी व प्रकाश सातपुते, शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, उपमहापौर भुपाल शेटे, महिला कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळुंखे, शहर अध्यक्षा संध्याताई घोटणे, आदींसह कॉँग्रसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीkolhapurकोल्हापूर