शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नावाची चर्चा

By admin | Updated: November 28, 2015 00:39 IST

त्यामुळे त्यांना अपक्ष म्हणून आव्हान देणे तितकेसे सोपे नाही म्हणून आमदार महादेवराव महाडिक हे स्वत: रिंगणात न उतरता अन्य कुणाला तरी पाठिंबा देतील, असेही बोलले जात आहे.

कोल्हापूर : विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील किंवा जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांना मिळाल्यास शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना सक्षम उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. या हालचालींमागे आमदार महादेवराव महाडिक हेच आहेत. इचलकरंजीतील ‘आवाडे गटाच्या कट्टर विरोधक’ असलेल्या शहर विकास आघाडीने या निवडणुकीत आवाडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय याच घडामोडींचा भाग असल्याचे मानण्यात येत आहे.या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारीतील सतेज पाटील यांचा दावा भक्कम मानला जात आहे. दोन्ही काँग्रेसची सुमारे पावणेतीनशे मते आहेत. सतेज पाटील हे तोडीस तोड ठरू शकतात. त्यामुळे त्यांना अपक्ष म्हणून आव्हान देणे तितकेसे सोपे नाही म्हणून आमदार महादेवराव महाडिक हे स्वत: रिंगणात न उतरता अन्य कुणाला तरी पाठिंबा देतील, असेही बोलले जात आहे. त्यामुळे महाडिक राजकारणात अपराजित राहू शकतात. त्यांचा राजकीय दबदबा कायम राहू शकतो. मग ते नसतील तर सतेज पाटील यांच्या विरोधात लढणार कोण, यासाठी चाचपणी सुरू असून, त्यामध्ये यड्रावकर यांचे नाव सगळ््यात पुढे आहे.यड्रावकर यांचे सतेज पाटील यांच्याशी राजकीय वैर आहे. कुरुंदवाड नगरपालिकेच्या राजकारणात सतेज पाटील यांना मानणारा गट सत्तेत आहे. तिथे आपली सत्ता सतेज पाटील यांनी काढून घेतल्याचा राग यड्रावकर यांना आहे. ‘राष्ट्रवादी’तही यड्रावकर हे आमदार हसन मुश्रीफ यांच्या ‘रेंज’मध्ये सध्या नाहीत. जिल्हा बँकेच्या राजकारणात शिरोळ सेवा संस्था गटातून मुश्रीफ यांनी विठ्ठलराव नाईक यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या यड्रावकर यांनी अपक्ष लढून ही जागा खेचून घेतली. त्यांच्याकडे साखर कारखानदारीचे पाठबळ आहे. जयसिंगपूर नगरपालिकेची सत्ता आहे. त्याशिवाय आवाडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचाही पाठिंबा त्यांना मिळू शकतो. राष्ट्रवादीतील नाराज गटही त्यांना मदत करू शकतो. तसे झाल्यास ते आव्हान उभे करू शकतात.काँग्रेसची उमेदवारी आपल्याला मिळणार नाही याचा अंदाज आल्याने महाडिक यांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी त्यांनी आवाडे कुटुंबीयांची व शहर विकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली. आवाडे यांचे नाव या स्पर्धेत मागे आहे हे महाडिक जाणून आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारीसाठी पाठिंबा द्यायचा. ‘तुम्हाला उमेदवारी मिळाली तर मी तुमच्यासोबतच आहे; परंतु ती नाही मिळाली तर तुम्ही मला पाठिंबा द्या,’ असेही महाडिक यांचे बेरजेचे गणित आहे. यड्रावकर यांच्याबाबतही त्यांचा हाच फॉर्म्युला आहे. ही लढत जिंकण्यासाठी किमान १९१ मते लागतात. महाडिक यांनी अपक्ष म्हणून लढायची तयारी करून शंभर मतांची गोळाबेरीज केली असल्याचे सांगण्यात येते. त्यांना त्याच्या पुढे जायचे असेल तर यड्रावकर किंवा आवाडे हाताला लागावे लागतात. आता त्यांची रणनीती त्यासाठीच काम करीत आहे. (प्रतिनिधी)हे तर नवलच...इचलकरंजीत ‘शविआ’ने आवाडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने त्याचेही इचलकरंजीकरांना मोठे नवलच वाटले. ‘शविआ’च्या पाठिंब्याचा आम्हाला किमान काँग्रेसची उमेदवारी मिळण्यासाठी काही मदत होऊ शकेल, असे आवाडे गटाला वाटते, तर प्रत्येकजण आपली ‘किंमत’ वाढवून घेण्यासाठी झटत आहे.