शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याबरोबर ‘राजाराम’ची वीजही तोडली

By admin | Updated: April 23, 2015 01:03 IST

प्रदूषणप्रश्नी ‘महावितरण’ची कारवाई : इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्सनाही दणका

कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या प्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या राजाराम सहकारी साखर कारखाना व इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्सची वीजजोडणी बुधवारी ‘महावितरण’कडून तोडण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाने ‘महावितरण’ने ही कारवाई केली. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्याची तसेच त्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्याची जबाबदारी मुंबई उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्यावर सोपविली आहे. शनिवारी (दि. १८) कोल्हापुरात झालेल्या पंचगंगा नदी प्रदूषण आढावा बैठकीनंतर चोक्कलिंगम यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य डॉ. पी. अनबालगन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर काही तासांत अनबालगन यांनी पंचगंगा प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता दीपक कुमठेकर यांनी सोमवारी कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश राजदीप व इचलकरंजी विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक शिंदे यांना राजाराम साखर कारखाना व इचलकरंजीतील प्रोसेसर्स संबंधितांना चोवीस तासांची नोटीस देऊन मंगळवारी वीज जोडणी तोडण्याची कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. मात्र संंबंधितांकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने बुधवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार ‘महावितरण’च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुपारी एक वाजता कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर कारखान्याचे उच्च दाबाचे कनेक्शन तोडले. तसेच इचलकरंजी येथील नऊ प्रोसेसर्सवरही सायंकाळी कारवाई करीत येथील वीजपुरवठाही तोडण्यात आला. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भातील पुढील कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानेच केली जाईल, असे ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता दीपक कुमठेकर यांनी सांगितले. इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्सचा मंगळवारी पाणीपुरवठा व बुधवारी वीजपुरवठा खंडित केल्याने दररोज होणारी बारा लाख मीटर कापडावरील प्रक्रिया ठप्प झाली आहे.पंचगंगा नदी प्रदूषणप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात कामगार नेते दत्ता माने व सदाशिव मलाबादे यांनी याचिका दाखल केली होती. प्रदूषण रोखण्याविषयी न्यायालयाने वारंवार निर्देश देऊनही मंडळाकडून हलगर्जीपणा होत असल्याबद्दल न्यायालयाने प्रदूषण नियंत्रण मंडळावर ताशेरे ओढले. अखेर त्याची गंभीर दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. बुधवारी दिवसभरात महावितरण कंपनीने राधा-कन्हैय्या, सावंत, अरविंद कॉटसीन, राधामोहन, यशवंत, रघुनंदन, लक्ष्मी, हरिहर व डेक्कन या प्रोसेसर्सचा वीजपुरवठा खंडित केला. या प्रोसेसर्सकडे असलेली वीस स्ट्रेंटर यंत्रावरील कापडावर प्रक्रिया करणारी यंत्रणा आता बंद पडली. त्यामुळे सुमारे दोन हजार कामगार बेरोजगार झाले आहेत.दरम्यान, औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प चालविणाऱ्या वेस्टर्न महाराष्ट्र प्रोसेसर्स असोसिएशनने प्रकल्पात प्रक्रिया केलेले पाणी शेती सिंचनासाठी देण्याची तयारी केली आहे. राणाप्रताप सोसायटीने हे पाणी घेण्याची तयारी दर्शविली असून, सुमारे तीस लाख रुपये खर्च करून थेट नळाद्वारे हे पाणी दीड किलोमीटरवर नेऊन देण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे प्रमुख लक्ष्मीकांत मर्दा यांनी दिली. तसेच आज, गुरुवारी उच्च न्यायालयात प्रदूषणासंदर्भात असलेल्या तारखेसाठी उपस्थित राहण्यास प्रोसेसर्स असोसिएशनचे एक शिष्टमंडळ बुधवारी रात्री उशिरा मुंबईस रवाना झाले. (प्रतिनिधी)