शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

‘राजाराम’ची निवडणूक रंगणार

By admin | Updated: October 6, 2014 22:43 IST

सतेज पाटील गट ‘वचपा’ काढणार : दक्षिण मतदारसंघातील राजकारणाच्या प्रतिक्रिया उमटणार

रमेश पाटील -- कसबा बावडा -आमदार महादेव महाडिक यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे सदस्य अमल महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश करून कोल्हापूर-दक्षिण विधानसभा मतदारसंघातून गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकल्याने त्याचे पडसाद डिसेंबरमध्ये होणाऱ्या ‘राजाराम’ साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर सतेज पाटील ‘राजाराम’च्या तयारीला लागतील अशी चर्चा आहे. आॅगस्ट २००९ मध्ये झालेल्या ‘राजाराम’च्या निवडणुकीत आमदार महाडिक यांच्या पॅनेलने ५०० ते ८०० अशा मताधिक्याने जागा जिंकल्या होत्या.नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार महाडिक यांनी कारखान्याच्या निवडणुकीची आपल्याला चिंता नाही, अशी टिप्पणी केली होती. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत पुतणे धनंजय महाडिक यांना मदत करूनही अमल महाडिक भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवित असल्याने सतेज पाटील यांचे कार्यकर्ते आता संतप्त झाले आहेत. केलेली मदत महाडिक विसरले, अशी चर्चा आता सुरू झाली आहे आणि त्यातूनच ‘राजाराम’च्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर सतेज पाटील प्रचंड ताकदीनीशी राजारामच्या निवडणुकीत उतरतील अशी शक्यता आहे.सन २००९ च्या राजारामच्या निवडणुकीत आमदार महाडिक यांच्या सत्ताधारी पॅनेलच्या विरोधात विनय कोरे, मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील, के. पी. पाटील, माजी खासदार निवेदिता माने असे दिग्गज नेते होते. मात्र, त्यांचा निसटता पराभव झाला. या निवडणुकीत संस्था प्रतिनिधी गटातून आमदार महादेवराव महाडिक, तर उत्पादक गट क्र. २ मधून त्यांचे चिरंजीव अमल महाडिक हे दोघे विजयी झाले होते. दरम्यान, या निवडणुका जूनमध्ये होतील, असे समजून सत्तारूढ महाडिक गटाने मोर्चेबांधणी केली होती. मात्र, निवडणुका सहकार प्राधिकरणाची नियुक्ती वेळेत झाली नसल्यामुळे तसेच विधानसभा आॅक्टोबरमध्ये जाहीर झाल्याने पुढे सरकल्या. आता त्या डिसेंबरमध्ये होणार आहेत.यापूर्वीच्या निवडणुका आमदार महाडिक यांनी एकतर्फी जिंकल्या होत्या. २००९ ची निवडणूक महाडिक यांना काहीशी जड गेली होती. कारण विरोधी गटाची धुरा मंत्री सतेज पाटील यांच्याकडे होती. आता तर अमल महाडिक विरोधात उभारल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी मंत्री पाटील आपली सर्व ताकद लावल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असे बोलले जाते. त्यामुळे ‘राजाराम’च्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत कधी झाली नसेल अशी ‘रंगत’ येत्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे, मात्र निश्चित...! १२२ गावांत कार्यक्षेत्रसध्या राजारामचे १५ हजार ८५२ सभासद आहेत. त्यापैकी अनुउत्पादक संस्था सभासद १३६ आहेत. करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, हातकणंगले, राधानगरी, कागल अशा सात तालुक्यांतील १२२ गावांत कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार करताना सर्वांचीच दमछाक होते.