शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

‘राजाराम’ची निवडणूक रंगणार

By admin | Updated: October 6, 2014 22:43 IST

सतेज पाटील गट ‘वचपा’ काढणार : दक्षिण मतदारसंघातील राजकारणाच्या प्रतिक्रिया उमटणार

रमेश पाटील -- कसबा बावडा -आमदार महादेव महाडिक यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे सदस्य अमल महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश करून कोल्हापूर-दक्षिण विधानसभा मतदारसंघातून गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकल्याने त्याचे पडसाद डिसेंबरमध्ये होणाऱ्या ‘राजाराम’ साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर सतेज पाटील ‘राजाराम’च्या तयारीला लागतील अशी चर्चा आहे. आॅगस्ट २००९ मध्ये झालेल्या ‘राजाराम’च्या निवडणुकीत आमदार महाडिक यांच्या पॅनेलने ५०० ते ८०० अशा मताधिक्याने जागा जिंकल्या होत्या.नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार महाडिक यांनी कारखान्याच्या निवडणुकीची आपल्याला चिंता नाही, अशी टिप्पणी केली होती. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत पुतणे धनंजय महाडिक यांना मदत करूनही अमल महाडिक भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवित असल्याने सतेज पाटील यांचे कार्यकर्ते आता संतप्त झाले आहेत. केलेली मदत महाडिक विसरले, अशी चर्चा आता सुरू झाली आहे आणि त्यातूनच ‘राजाराम’च्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर सतेज पाटील प्रचंड ताकदीनीशी राजारामच्या निवडणुकीत उतरतील अशी शक्यता आहे.सन २००९ च्या राजारामच्या निवडणुकीत आमदार महाडिक यांच्या सत्ताधारी पॅनेलच्या विरोधात विनय कोरे, मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील, के. पी. पाटील, माजी खासदार निवेदिता माने असे दिग्गज नेते होते. मात्र, त्यांचा निसटता पराभव झाला. या निवडणुकीत संस्था प्रतिनिधी गटातून आमदार महादेवराव महाडिक, तर उत्पादक गट क्र. २ मधून त्यांचे चिरंजीव अमल महाडिक हे दोघे विजयी झाले होते. दरम्यान, या निवडणुका जूनमध्ये होतील, असे समजून सत्तारूढ महाडिक गटाने मोर्चेबांधणी केली होती. मात्र, निवडणुका सहकार प्राधिकरणाची नियुक्ती वेळेत झाली नसल्यामुळे तसेच विधानसभा आॅक्टोबरमध्ये जाहीर झाल्याने पुढे सरकल्या. आता त्या डिसेंबरमध्ये होणार आहेत.यापूर्वीच्या निवडणुका आमदार महाडिक यांनी एकतर्फी जिंकल्या होत्या. २००९ ची निवडणूक महाडिक यांना काहीशी जड गेली होती. कारण विरोधी गटाची धुरा मंत्री सतेज पाटील यांच्याकडे होती. आता तर अमल महाडिक विरोधात उभारल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी मंत्री पाटील आपली सर्व ताकद लावल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असे बोलले जाते. त्यामुळे ‘राजाराम’च्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत कधी झाली नसेल अशी ‘रंगत’ येत्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे, मात्र निश्चित...! १२२ गावांत कार्यक्षेत्रसध्या राजारामचे १५ हजार ८५२ सभासद आहेत. त्यापैकी अनुउत्पादक संस्था सभासद १३६ आहेत. करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, हातकणंगले, राधानगरी, कागल अशा सात तालुक्यांतील १२२ गावांत कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार करताना सर्वांचीच दमछाक होते.