शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

राजाराम बंधारा पाण्याखाली

By admin | Updated: July 3, 2016 00:37 IST

नद्यांचे पाणी वाढले : गगनबावडा, शाहूवाडीसह धरणक्षेत्रांत अतिवृष्टी

कोल्हापूर/कसबा बावडा : कोल्हापूर शहरात शनिवारी दिवसभर उघडझाप राहिली असली तरी सायंकाळनंतर पावसाची रिपरिप सुरू झाली. गगनबावडा, शाहूवाडीसह सर्वच धरणक्षेत्रांत अतिवृष्टी झाल्याने नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पंचगंगेची पातळी १७ फुटांच्या वर गेल्याने नदीवरील राजाराम बंधारा यंदा पहिल्यांदाच पाण्याखाली गेला आहे. गेले दोन दिवस कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सकाळी नऊ-दहानंतर पाऊस विश्रांती घेत आहे. दुपारी चारनंतर हळूहळू पावसास सुरुवात होऊन रात्री जोर पकडत असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. हातकणंगले, शिरोळ वगळता उर्वरित तालुक्यांत दमदार पाऊस होत आहे. गगनबावड्यात २४ तासांत ८१.५०, तर शाहूवाडी तालुक्यात ५९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगडमध्येही जोरदार पाऊस झाला. जिल्ह्या २४ तासांत ४२७.६० मि.मी. पाऊस झाल्याने लहान-मोठ्या नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. राजाराम बंधाऱ्याचे बरगे दरवर्षी जूनच्या १ तारखेला काढले जातात. यंदामात्र नदीतच पाणी नसल्यामुळे याकामी थोडा विलंब करण्यात आला होता. सध्या बंधाऱ्याचे सर्वच बरगे काढण्यात आल्यामुळे नदीपात्राच्या खालील बाजूस मोठ्या प्रमाणात बंधाऱ्यातून पाणी जात आहे. दरम्यान, या बंधाऱ्यावर पाणी आलेले असतानाही काही मोटारसायकलस्वार या पाण्यातून बंधारा पार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सकाळच्या वेळचे चित्र होते. नंतर मात्र पाणीपातळी वाढत जाईल तशी या मार्गावरील ये-जा बंद झाली. तसेच पाणी पात्राबाहेर पसरू लागल्याने घाटाचा बराचसा भाग पाण्याखाली गेला आहे. बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरून औद्योगिक वसाहतीकडे दररोज कामानिमित्त ये-जा करणाऱ्यांना आता शिवाजी पूलमार्गी लांबच्या पल्ल्याने जावे लागणार आहे. बंधाऱ्याजवळील नदीपात्रातील मंदिराचा कळसही आता दिसायचा बंद झाला आहे. धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असून, सर्वाधिक पाऊस कोदे लघू पाटबंधारे विभागात १७२, तर पाटगाव धरणक्षेत्रात तब्बल १६२ मि.मी. झाला. (प्रतिनिधी) नृसिंहवाडीत कृष्णा-पंचगंगेच्या पाणीपातळीत सहा फुटांने वाढ ४श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत सहा फुटांने वाढ झाली आहे. ४कृष्णा-पंचगंगा संगमामध्ये असलेल्या संगमेश्वर मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे. ४कोल्हापूर, सांगली, सातारा, राधानगरी, गगनबावडा, आदी ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने कोयना, वारणा, पंचगंगा नद्यांचे पाणी येथील नदीपात्रात दाखल होत असून, गेल्या २४ तासांत कृष्णा-पंचगंगा नदीच्या संगमाजवळ नद्यांच्या पाणीपातळीत सहा फुटांने वाढ झाली आहे. ४कृष्णा नदीपेक्षा पंचगंगा नदीतून येणारा पाण्याचा प्रवाह जोरात आहे. नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने शेतकरी वर्ग देखील आनंदात आहे. २४ तासांत २ टी. एम. सी. वाढ ! राधानगरी, दूधगंगा, पाटगाव या प्रमुख धरणक्षेत्रांत धुवाधार पाऊस सुरू असल्याने पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. चोवीस तासांत जलाशयांत तब्बल दोन टी. एम.सी. पाणी वाढले आहे. तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा - करवीर- १७.०९, कागल- २६.६०, पन्हाळा- २९.२८, शाहूवाडी- ५९, हातकणंगले- ३.७५, शिरोळ- ३.४२, राधानगरी- ४७, गगनबावडा- ८१.५०, भुदरगड- ४४.२०, गडहिंग्लज- २५.८५, आजरा- ४८.२५, चंदगड- ४१.६६.