शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरी,लोणच्या आंब्यासह फणसाला मागणी

By admin | Updated: April 23, 2017 18:21 IST

काकडी ,गाजर,पोकळा वाढला ; हरभरा डाळ वाढली

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २३ : राजापुरी, राघु आंब्यासह लोणचेचे कैरी आंबे आणि करवंदे, जांभूळ या रानमेव्याबरोबर फणसांचे ढिगच बाजारात आले आहेत.त्याला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागली. दुसरीकडे, या आठवड्यात भाज्यांचे दर कमी-अधिक प्रमाणात होते. मात्र, कडक उन्हाळ्याचा परिणाम बाजारपेठेवर झाल्याचे दिसून येते. दूपारच्या वेळेत ग्राहकांनी बाजारात पाठ फिरवली होती. त्यामुळे बाजार ओस पडल्याचे चित्र होते.

शहरातील लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ मार्केट या बाजारासह राजारामपुरीतील नार्वेकर मार्केट या बाजारात आठवडी बाजारामध्ये सकाळपासून ग्राहकांची गर्दी होती. पण, दुपारी १२ नंतर उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने बाजारात गर्दी कमी होत गेली. साधारणत : दूपारी चारनंतर ग्राहकांची वाढण्यास पुन्हा सुरु झाली. रात्री सातपर्यंत खरेदीसाठी तुडूंब गर्दी होती.

लोणच्या आंब्यासह (क ैरी), गुळ आंब्याचा आंबा (राजापुरी), राघु आंब्यांला मागणी होती. राजापुरी शंभर रुपयाला तीन व चार नग तर लोणच्याचे आंबे ४० रुपयांपासून ते ५० रुपयांच्या घरात होते. राघु आंबा दहा रुपयाला एक तर २० रुपयाला तीन असे होते. त्याचबरोबर पावशेर करवंदे २० रुपये, जांभळे ४० रुपयांसह तर कापा फणस ८० रुपयांपासून ते शंभर रुपयांच्या जवळपास होता.

फणसाच्या गराचा पावशेरचा दर २० ते २५ रुपये असा होता. दुसरीकडे, वांगी, कोबी, भेंडी, मेथी, ढबु मिरची , गाजर, फ्लॉवर, कोथिंबीर, पोकळ्याच्या दरात वाढ झाली आहे तर टोमॅटो, ओली मिरची, दर स्थिर आहेत. काकडीचा दर दहा किलोचा दर १०५ रुपयांवरुन तो ७० रुपयांवर आला होता. विशेषत : उन्हाळ्यात काकडी घेण्याऱ्या ग्राहकांची संख्या जास्त असते. त्यामुळे दर उतरणीमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

पोकळ्यात तब्बल दहा किलोला १५० रुपयांनी वाढ होऊन तो ४०० रुपये आला आहे. कोथिंबीरमध्ये शेकडा (पेंढी) दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. ती ९५० रुपये झाली आहे. दरम्यान, हरभरा डाळीमध्ये प्रतिकिलो चार रुपयांनी वाढ होऊन ८४ रुपये झाली आहे तर काजू ८०० रुपयांवरुन तो ८५० रुपये झाला आहे. सर्वप्रकारच्या तांदूळाचे दर जैसे थे होते.

आंब्याचे दर स्थिर...

गेल्या आठवड्यात असणारे हापुस, रायवळ, मद्रास हापूस व मद्रास पायरीचे दर जसे होते.हेच दर या आठवड्यात होते.

डझनाला ३० रुपये...

लोणच्याचे आंबे कापून देण्यासाठी डझनाला ३० रुपये असा दर आहे.त्यासाठी दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये ग्राहकांची गर्दी असते.

आंबा हा दावणगिरी येथून आणला जातो. मार्गशीर्ष महिन्यापासून ते आषाढी महिन्यापर्यंत आंब्याला मागणी असते. सर्व प्रकारचे ग्राहक आंबा खरेदीसाठी येतात.

-मारुती लहू केसरकर,

आंबा विक्रेते, कपिलतीर्थ मार्केट, कोल्हापूर.