शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

राजापुरी,लोणच्या आंब्यासह फणसाला मागणी

By admin | Updated: April 23, 2017 18:21 IST

काकडी ,गाजर,पोकळा वाढला ; हरभरा डाळ वाढली

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २३ : राजापुरी, राघु आंब्यासह लोणचेचे कैरी आंबे आणि करवंदे, जांभूळ या रानमेव्याबरोबर फणसांचे ढिगच बाजारात आले आहेत.त्याला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागली. दुसरीकडे, या आठवड्यात भाज्यांचे दर कमी-अधिक प्रमाणात होते. मात्र, कडक उन्हाळ्याचा परिणाम बाजारपेठेवर झाल्याचे दिसून येते. दूपारच्या वेळेत ग्राहकांनी बाजारात पाठ फिरवली होती. त्यामुळे बाजार ओस पडल्याचे चित्र होते.

शहरातील लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ मार्केट या बाजारासह राजारामपुरीतील नार्वेकर मार्केट या बाजारात आठवडी बाजारामध्ये सकाळपासून ग्राहकांची गर्दी होती. पण, दुपारी १२ नंतर उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने बाजारात गर्दी कमी होत गेली. साधारणत : दूपारी चारनंतर ग्राहकांची वाढण्यास पुन्हा सुरु झाली. रात्री सातपर्यंत खरेदीसाठी तुडूंब गर्दी होती.

लोणच्या आंब्यासह (क ैरी), गुळ आंब्याचा आंबा (राजापुरी), राघु आंब्यांला मागणी होती. राजापुरी शंभर रुपयाला तीन व चार नग तर लोणच्याचे आंबे ४० रुपयांपासून ते ५० रुपयांच्या घरात होते. राघु आंबा दहा रुपयाला एक तर २० रुपयाला तीन असे होते. त्याचबरोबर पावशेर करवंदे २० रुपये, जांभळे ४० रुपयांसह तर कापा फणस ८० रुपयांपासून ते शंभर रुपयांच्या जवळपास होता.

फणसाच्या गराचा पावशेरचा दर २० ते २५ रुपये असा होता. दुसरीकडे, वांगी, कोबी, भेंडी, मेथी, ढबु मिरची , गाजर, फ्लॉवर, कोथिंबीर, पोकळ्याच्या दरात वाढ झाली आहे तर टोमॅटो, ओली मिरची, दर स्थिर आहेत. काकडीचा दर दहा किलोचा दर १०५ रुपयांवरुन तो ७० रुपयांवर आला होता. विशेषत : उन्हाळ्यात काकडी घेण्याऱ्या ग्राहकांची संख्या जास्त असते. त्यामुळे दर उतरणीमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

पोकळ्यात तब्बल दहा किलोला १५० रुपयांनी वाढ होऊन तो ४०० रुपये आला आहे. कोथिंबीरमध्ये शेकडा (पेंढी) दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. ती ९५० रुपये झाली आहे. दरम्यान, हरभरा डाळीमध्ये प्रतिकिलो चार रुपयांनी वाढ होऊन ८४ रुपये झाली आहे तर काजू ८०० रुपयांवरुन तो ८५० रुपये झाला आहे. सर्वप्रकारच्या तांदूळाचे दर जैसे थे होते.

आंब्याचे दर स्थिर...

गेल्या आठवड्यात असणारे हापुस, रायवळ, मद्रास हापूस व मद्रास पायरीचे दर जसे होते.हेच दर या आठवड्यात होते.

डझनाला ३० रुपये...

लोणच्याचे आंबे कापून देण्यासाठी डझनाला ३० रुपये असा दर आहे.त्यासाठी दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये ग्राहकांची गर्दी असते.

आंबा हा दावणगिरी येथून आणला जातो. मार्गशीर्ष महिन्यापासून ते आषाढी महिन्यापर्यंत आंब्याला मागणी असते. सर्व प्रकारचे ग्राहक आंबा खरेदीसाठी येतात.

-मारुती लहू केसरकर,

आंबा विक्रेते, कपिलतीर्थ मार्केट, कोल्हापूर.