शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

‘पुजारी हटाओ’साठी विधानसभेत आवाज उठवू

By admin | Updated: July 9, 2017 00:49 IST

बच्चू कडू : अंबाबाईचे लक्ष्मीकरण धर्मद्रोहच

लोकमत न्यूज नेटवर्क -कोल्हापूर : अंबाबाई देवीचे लक्ष्मीकरण हा धर्मद्रोहच आहे. देवस्थानला येणारा पैसा हा समाजासाठी वापरला गेला पाहिजे. मात्र, राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरातच पुजाऱ्यांकडून देवीच्या पैशांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे भाविकांच्या श्रद्धेला तडा गेला आहे. त्यामुळे शासनाने यात महिन्याभरात हस्तक्षेप करून पुजाऱ्यांच्या संपत्तीचा शोध घ्यावा आणि ती सरकारजमा करावी, यासाठी येत्या २४ तारखेपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवू, असे आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.पन्हाळा-पावनखिंड मोहिमेसाठी ते कोल्हापुरात आले होते. अंबाबाई मंदिर प्रश्नासंबंधी त्यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, या देवीचे स्वरूप शिवपत्नी असल्याचे स्पष्ट आहे. मात्र, तिला विष्णुपत्नी करून तिचे लक्ष्मीकरण करणे चुकीचे आहे. मी कायम अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीच्या बाजूने उभा राहीन आणि वेळ पडली तर रस्त्यावर येऊन लढा देईन, असेही कडू यांनी सांगितले. यावेळी डॉ. सुभाष देसाई, वसंत मुळीक, देवदत्त माने, शरद तांबट, डॉ. जयश्री चव्हाण, अ‍ॅड. चारूलता चव्हाण, डॉ. खंडागळे उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्राची कर्जमाफी...अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे देवस्थान आहे. देवीचे कित्येक वर्षांचे उत्पन्न पुजाऱ्यांकडे आहे. यातून आणि वर्षाकाठी मिळणाऱ्या तीनशे-साडेतीनशे कोटींच्या उत्पन्नातून अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, असेही कडू यांनी सांगितले.