शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

‘पुजारी हटाओ’साठी विधानसभेत आवाज उठवू

By admin | Updated: July 9, 2017 00:49 IST

बच्चू कडू : अंबाबाईचे लक्ष्मीकरण धर्मद्रोहच

लोकमत न्यूज नेटवर्क -कोल्हापूर : अंबाबाई देवीचे लक्ष्मीकरण हा धर्मद्रोहच आहे. देवस्थानला येणारा पैसा हा समाजासाठी वापरला गेला पाहिजे. मात्र, राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरातच पुजाऱ्यांकडून देवीच्या पैशांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे भाविकांच्या श्रद्धेला तडा गेला आहे. त्यामुळे शासनाने यात महिन्याभरात हस्तक्षेप करून पुजाऱ्यांच्या संपत्तीचा शोध घ्यावा आणि ती सरकारजमा करावी, यासाठी येत्या २४ तारखेपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवू, असे आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.पन्हाळा-पावनखिंड मोहिमेसाठी ते कोल्हापुरात आले होते. अंबाबाई मंदिर प्रश्नासंबंधी त्यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, या देवीचे स्वरूप शिवपत्नी असल्याचे स्पष्ट आहे. मात्र, तिला विष्णुपत्नी करून तिचे लक्ष्मीकरण करणे चुकीचे आहे. मी कायम अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीच्या बाजूने उभा राहीन आणि वेळ पडली तर रस्त्यावर येऊन लढा देईन, असेही कडू यांनी सांगितले. यावेळी डॉ. सुभाष देसाई, वसंत मुळीक, देवदत्त माने, शरद तांबट, डॉ. जयश्री चव्हाण, अ‍ॅड. चारूलता चव्हाण, डॉ. खंडागळे उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्राची कर्जमाफी...अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे देवस्थान आहे. देवीचे कित्येक वर्षांचे उत्पन्न पुजाऱ्यांकडे आहे. यातून आणि वर्षाकाठी मिळणाऱ्या तीनशे-साडेतीनशे कोटींच्या उत्पन्नातून अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, असेही कडू यांनी सांगितले.