शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
3
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
4
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
5
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
6
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
7
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
8
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
9
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
10
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
11
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
12
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
13
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
14
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
15
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
16
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
17
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
18
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
19
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
20
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...

भांडवलशाही विरोधात लढा उभारा

By admin | Updated: April 4, 2015 00:14 IST

भाई वैद्य : कणकवली येथील बुद्ध विहारमध्ये ‘जय भीम’ महोत्सवास प्रारंभ

कणकवली : जगात भांडवलशाहीचे लोण फोफावत आहे. या भांडवलशाहीमुळे जगात विषमतेची दरी निर्माण होणार असून, मूठभर लोक जगावर आपले अधिराज्य गाजवतील. ही परिस्थिती उद्भवू नये, म्हणून सर्वांनी या भांडवलशाही विरोधात लढा उभारायला हवा. तसेच भारत देशात पुन्हा वर्णव्यवस्था निर्माण करण्याचा हिंदुत्ववाद्यांचा डाव असून, परिवर्तनवाद्यांसमोर जातिव्यवस्था, जमातवाद, जागतिकीकरण ही आव्हाने आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी परिवर्तनवाद्यांनी सज्ज राहिले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ समाजवादी नेते व माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांनी केले.दर्पण सांस्कृतिक मंचच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त कणकवली येथील बुद्धविहार येथे गुरुवारी ‘जय भीम’ महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जय भीम महोत्सवाचे अध्यक्ष सुनील तांबे, सुप्रसिद्ध चित्रकार, नाटककार, चित्रपट संवाद लेखक संजय पवार, संदेश कदम, महेंद्र कदम, अनिल तांबे, आशिष कदम, आदी उपस्थित होते.यावेळी भाई वैद्य म्हणाले, केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून देशात हिंदुत्ववाद्यांना बळ प्राप्त झाले आहे. हिंदू राष्ट्र बनविण्याबरोबर भारतीय संविधानचे महत्त्व कमी करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी आंबेडकरवादी व परिवर्तन विचारवाद्यांनी लढा उभारणे गरजेचे आहे. भारतीय समाज संस्कृतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तेजस्वी तारा होता. देशातील वर्णव्यवस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोडीत काढून समाजातील दुर्लक्षित व शोषितांना न्याय मिळवून दिला. यावेळी दर्पण मंचातर्फे दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार संजय पवार व प्रा. सिद्धार्थ तांबे, शिल्पा कांबळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)‘दर्पण’च्या उपक्रमाचे कौतुकभारतीय संविधान हे पुस्तक नसून, आपल्या समाजव्यवस्थेचा पाया व आधार आहे. भगवत्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता मिळावी, ही मागणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज करतात, हे कशाचे द्योतक आहे? असा सवाल करत हिंदुत्ववाद्यांचा पुन्हा देशात वर्णव्यवस्था रुजवण्याचा डाव आहे, असे ते म्हणाले.त्यांचा हा डाव परिवर्तनवाद्यांनी हाणून पाडला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. त्याचप्रमाणे गेली २५ वर्षे दर्पण मंच राबवित असलेले उपक्रम स्तुत्य असून, यापुढेही त्यांनी अशाप्रकारचे उपक्रम राबवित रहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.