शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठवा

By admin | Updated: December 22, 2015 00:53 IST

कणेगाव येथे महामार्ग रोखला : शर्यत बचाव कृती समितीचे आंदोलन

किणी : प्राणीमित्र संघटनेच्या मागणीनुसार घातलेल्या बैलगाडी शर्यतींवरील बंदी तत्काळ उठवावी, या मागणीसाठी कणेगाव (जि. सांगली) येथे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.२0११ मध्ये प्राणीमित्र संघटनेच्या मागणीनुसार बैलगाडी शर्यतींवर बंदी घालण्यात आली आहे. ती उठविण्याची मागणी शेतकरी वारंवार करीत आहेत. यासाठी अनेक ठिकाणी विविध आंदोलने केली. मात्र, शासनाने ही बंदी उठविली नाही. हा केंद्र शासनाच्या आखत्यारीतील विषय असल्याने चालू अधिवेशनात कायदा करून शर्यती पूर्ववत सुरू करण्यासाठी महामार्गावर रास्ता रोको केला. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, अखिल भारतीय शेतकरी शर्यत बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रसाद धर्माधिकारी, महाराष्ट्र रेंसिंग असोसिएशन तर्फे बैलगाड्यांसह शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरून घोषणाबाजी केली. सुरुवातीला हे आंदोलन किणी येथे होणार होते, तशी घोषणाही केली. मात्र, पूर्वानुभव पाहता आंदोलन कुठेही होईल, असे गृहित धरून कोल्हापूर व सांगली पोलीस दलात दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलकांनी पोलिसांशी चर्चा करून कणेगाव (जि. सांगली) येथे शांततेत आंदोलन केले. या आंदोलनासाठी कोल्हापूरचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक चैतन्य एस. व सांगलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह जलद कृती दलाचे सुमारे अडीचशेहून अधिक पोलीसांचा ताफा येथील बंदोबस्तासाठी तैनात केले होते.शेतकऱ्यांचा इशारा : चार जिल्ह्यांचा सहभागया आंदोलनासाठी सांगली, कोल्हापूर, साताऱ्यासह बेळगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाने बंदी उठविली नाही, तर पुढील काळात आंदोलन तीव्र करू, असा इशारा जेष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला.