शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठवा

By admin | Updated: December 22, 2015 00:53 IST

कणेगाव येथे महामार्ग रोखला : शर्यत बचाव कृती समितीचे आंदोलन

किणी : प्राणीमित्र संघटनेच्या मागणीनुसार घातलेल्या बैलगाडी शर्यतींवरील बंदी तत्काळ उठवावी, या मागणीसाठी कणेगाव (जि. सांगली) येथे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.२0११ मध्ये प्राणीमित्र संघटनेच्या मागणीनुसार बैलगाडी शर्यतींवर बंदी घालण्यात आली आहे. ती उठविण्याची मागणी शेतकरी वारंवार करीत आहेत. यासाठी अनेक ठिकाणी विविध आंदोलने केली. मात्र, शासनाने ही बंदी उठविली नाही. हा केंद्र शासनाच्या आखत्यारीतील विषय असल्याने चालू अधिवेशनात कायदा करून शर्यती पूर्ववत सुरू करण्यासाठी महामार्गावर रास्ता रोको केला. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, अखिल भारतीय शेतकरी शर्यत बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रसाद धर्माधिकारी, महाराष्ट्र रेंसिंग असोसिएशन तर्फे बैलगाड्यांसह शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरून घोषणाबाजी केली. सुरुवातीला हे आंदोलन किणी येथे होणार होते, तशी घोषणाही केली. मात्र, पूर्वानुभव पाहता आंदोलन कुठेही होईल, असे गृहित धरून कोल्हापूर व सांगली पोलीस दलात दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलकांनी पोलिसांशी चर्चा करून कणेगाव (जि. सांगली) येथे शांततेत आंदोलन केले. या आंदोलनासाठी कोल्हापूरचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक चैतन्य एस. व सांगलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह जलद कृती दलाचे सुमारे अडीचशेहून अधिक पोलीसांचा ताफा येथील बंदोबस्तासाठी तैनात केले होते.शेतकऱ्यांचा इशारा : चार जिल्ह्यांचा सहभागया आंदोलनासाठी सांगली, कोल्हापूर, साताऱ्यासह बेळगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाने बंदी उठविली नाही, तर पुढील काळात आंदोलन तीव्र करू, असा इशारा जेष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला.