शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

पावसाची दडी, सुगीसाठी शेतकऱ्यांची शिवारात उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:28 IST

कोल्हापूर : हवामान खात्याने आठवडाभर पाऊस दडी मारणार असल्याचे सांगितल्यानंतर एका डोळ्यात हसू तर दुसऱ्यात आसू, अशी शेतकऱ्यांची परिस्थिती ...

कोल्हापूर : हवामान खात्याने आठवडाभर पाऊस दडी मारणार असल्याचे सांगितल्यानंतर एका डोळ्यात हसू तर दुसऱ्यात आसू, अशी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. गेले आठवडाभर दमदार हजेरी लावलेल्या पावसाने घेतलेल्या विश्रांतीचा लाभ उठवत सुगी आटोपण्याची धांदल सुरु आहे. सोयाबीन व भुईमुगाची काढणी सुरु झाली आहे. हळव्या जातीचे भात कापणीस आले आहे, मात्र निमगरवा आणि गरवा जातीच्या भाताला पावसाची गरज आहे. शिवाय उशिरा पेरणी झालेल्या पिकांनाही पाण्याची गरज असल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

जिल्ह्यात गणपती आगमनाबरोबरच पावसाचेही पुनरागमन झाले. तीन-चार दिवसांच्या पावसातच नद्या पात्राबाहेर पडून नदीकाठची पिके पुन्हा एकदा पाण्याखाली गेली. पावसाने संततधार लावल्याने कापणीस आलेल्या सोयाबीनच्या काढणीत अडथळा आला. बुधवारपासून पावसाने उघडीप दिल्याने थांबलेली कापणी, मळणी गुरुवारपासून पुन्हा सुरु झाली आहे. लवकर पेरणी झालेला भुईमूगही काढणीस आला आहे. सोयाबीनला आठ हजारांवर दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी पडलेल्या उन्हाचा लाभ उठवत मळणीचा वेग वाढवला आहे. शेतमजुरांनी ही संधी साधत मजुरीचे दरही वाढवले आहेत. दिवसभरात दोन ते तीन पाळ्यांमध्ये काम सुरु आहे. खंडून घेऊन कापणी करण्याचीही टूम काढण्यात आली असून, एकरी ३ ते ४ हजार रुपये देऊन कापणी करुन घेतली जात आहे. डिझेलचे दर वाढल्याने मळणीसाठीचे दरही यावर्षी वाढविण्यात आले आहेत.

पाऊस पडून गेल्याने जमिनी मऊ झाल्या आहेत, तोपर्यंत भुईमूग काढणी करुन घेण्यासाठी शेतकऱ्यांची घाई सुरु आहे. कुटुंबाला सोबत घेऊन शेंगा तोडणी सुरु आहे. पाऊस कमी होणार आहे, ओल हटले तर शेंगा जमिनीत तुटण्याची शक्यता आहे. उशिरा पेरणी झालेल्या भुईमुगाच्या शेंगा भरत असल्याने आता पावसाची गरज आहे. पण नेमका आता पाऊस होणार नसल्याचे हवामान खात्याने सांगितल्याने शेतकरी हबकला आहे. निमगरवा व गरवा जातीचे भात भरु लागले आहे. त्याला पाण्याची नितांत गरज असल्याने पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी पाटाने पाणी दिले जात आहे.

चौकट

अंदाज पावसाचा

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आठवडाभर पाऊस दडीच मारणार आहे. दि. २३ ते २५ सप्टेंबर याकाळात पडला तर हलका पाऊस पडेल, अन्यथा २८ पर्यंत पाऊस पडणार नाही. २८पासून ५ ऑक्टोबरपर्यंत जोरदार पाऊस होईल, असा अंदाज आहे. त्यानंतर २२पर्यंत पुन्हा पाऊस दडी मारणार आहे. २७ ला हस्त नक्षत्र सुरु होत आहे, या काळात जास्त पाऊस पडतो. पण यावर्षी तो कमी होणार असल्याचा अंदाज आहे.