शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाची रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. एकसारख्या सरी कोसळत राहिल्याने हवामानात गारठा जाणवत होता. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. एकसारख्या सरी कोसळत राहिल्याने हवामानात गारठा जाणवत होता. राधानगरी धरणातून मंगळवारी प्रतिसेंकद १४०० घनफुट पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने सोमवारच्या तुलनेत पंचगंगेच्या पातळीत तब्बल दीड फुटाने वाढ झाली.

कोल्हापूरात चार-पाच दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असली तरी त्यात सातत्य नव्हते. पडेल तिथे पडेल असा पाऊस होतो. सोमवारी सायंकाळ पाऊस वातावरणात बदल झाला. मंगळवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. सकाळी अकरानंतर त्यात वाढ होत जाऊन एकसारखी रिपरिप सुरू राहिली. प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हा पाऊस खरीप पिकाला पोषक आहे. माळरान, डोंगरमाथ्यावरील पिकांची वाढ जोमदार होण्यास मदत होणार आहे.

कोल्हापूर शहरातही दिवसभर रिपरिप राहिली. पाऊस व गार वारे वाहत असल्याने वातावरणात कमालीचा गारठा जाणवत होता. बऱ्याच दिवसानंतर एकसारखा पाऊस सुरू झाल्याने नागरिकांना घराबाहेर पडू वाटत नव्हते. धरणक्षेत्रातही जाेरदार पाऊस सुरू आहे. ‘कुंभी’ धरणक्षेत्रात चोवीस तासांत तब्बल ११७ मिलीमीटर पाऊस झाला. राधानगरीसह इतर धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरीतून प्रतिसेंकद १४०० घनफुट पाण्याचा विसर्ग सुरू असून पंचगंगेची पातळी मंगळवारी पाच वाजता १५.७ फुटावर होती.

जिरवण्याची पाऊस...

एकदम धो धो कोसळलेल्या पावसाने मोठे नुकसान होते. बांधफुटीसह पिकांच्या वाढीस असा पाऊस उपयुक्त नसतो. त्यापेक्षा आता ज्या पद्धतीने पाऊस सुरू आहे, तसा जिरवण्याची पाऊस अधिक उपयुक्त आहे.

फोटो ओळी : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. राधानगरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. (फाेटो-०७०९२०२१-कोल-रेन) (छाया- आदित्य वेल्हाळ)