शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

जिल्ह्यात पावसाची रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. एकसारख्या सरी कोसळत राहिल्याने हवामानात गारठा जाणवत होता. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. एकसारख्या सरी कोसळत राहिल्याने हवामानात गारठा जाणवत होता. राधानगरी धरणातून मंगळवारी प्रतिसेंकद १४०० घनफुट पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने सोमवारच्या तुलनेत पंचगंगेच्या पातळीत तब्बल दीड फुटाने वाढ झाली.

कोल्हापूरात चार-पाच दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असली तरी त्यात सातत्य नव्हते. पडेल तिथे पडेल असा पाऊस होतो. सोमवारी सायंकाळ पाऊस वातावरणात बदल झाला. मंगळवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. सकाळी अकरानंतर त्यात वाढ होत जाऊन एकसारखी रिपरिप सुरू राहिली. प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हा पाऊस खरीप पिकाला पोषक आहे. माळरान, डोंगरमाथ्यावरील पिकांची वाढ जोमदार होण्यास मदत होणार आहे.

कोल्हापूर शहरातही दिवसभर रिपरिप राहिली. पाऊस व गार वारे वाहत असल्याने वातावरणात कमालीचा गारठा जाणवत होता. बऱ्याच दिवसानंतर एकसारखा पाऊस सुरू झाल्याने नागरिकांना घराबाहेर पडू वाटत नव्हते. धरणक्षेत्रातही जाेरदार पाऊस सुरू आहे. ‘कुंभी’ धरणक्षेत्रात चोवीस तासांत तब्बल ११७ मिलीमीटर पाऊस झाला. राधानगरीसह इतर धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरीतून प्रतिसेंकद १४०० घनफुट पाण्याचा विसर्ग सुरू असून पंचगंगेची पातळी मंगळवारी पाच वाजता १५.७ फुटावर होती.

जिरवण्याची पाऊस...

एकदम धो धो कोसळलेल्या पावसाने मोठे नुकसान होते. बांधफुटीसह पिकांच्या वाढीस असा पाऊस उपयुक्त नसतो. त्यापेक्षा आता ज्या पद्धतीने पाऊस सुरू आहे, तसा जिरवण्याची पाऊस अधिक उपयुक्त आहे.

फोटो ओळी : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. राधानगरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. (फाेटो-०७०९२०२१-कोल-रेन) (छाया- आदित्य वेल्हाळ)